शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

पावसाच्या उघाडीने खरिपाचा हंगाम बुडाला नजरा आकाशाकडे : पिके होत आहे नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2015 02:32 IST

गेल्या महिनाभरापाूसन पावसाने दडी मारल्यामुळे नेर तालुक्यातील शेतकरी अडचणीत आला आहे.

सोनखास : गेल्या महिनाभरापाूसन पावसाने दडी मारल्यामुळे नेर तालुक्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावल्याने तालुक्यातील ७० टक्केहून अधिक पेरण्या आटोपल्या. परंतु त्यानंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे या पेरण्या वाया गेल्या आहे. येत्या तीन-चार दिवसात पाऊस न आल्यास दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार आहे. शेतकऱ्यांच्या अंगावर आधीच कर्जाचे ओझे असताना आता दुबार पेरणीसाठी पैसा कसा उभा करावा, या काळजीने त्यांना ग्रासले आहे. जूनमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी पटापट पेरण्या आटोपल्या व त्या साधल्यादेखील. यावर्षी पेरण्या साधल्या नाही. चांगले पीक घरी येईल या आशेत शेतकरी असताना गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे. ऊनही चांगले तापत आहे. प्रचंड उकाडा वातारणात जाणवत आहे. अशा वातावरणामुळे पीक करपताना दिसत आहे. वाळलेली पिके पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी उभे राहात आहे. होते नव्हते ते सर्व खर्च झाले, पुन्हा एकदा कर्ज काढून मोठ्या आशेने यावर्षी खरिपाचा हंगामात लागवड केली होती, परंतु पुन्हा परिस्थिती तीच आहे. सलग तिसरे वर्ष दुष्काळाच्या छायेत शेतकरी आहेत. आधीच कर्जाच्या बोझ्याखाली दबलेला शेतकरी पूर्णत: खचला आहे. खचलेल्या शेतकऱ्याला शासनाने मदत करणे गरजेचे आहे. आता निसर्गानेच डोळे पांढरे केल्यामुळे कोणाकडे पाहावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडणे सहाजीक आहे. सध्या शेतकरी केवळ वरुणराजाला साकडे घालताना दिसत आहे. (वार्ताहर)