शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या शासकीय वास्तू राळेगावात धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 23:57 IST

शहरात व तालुक्यात कोट्यवधी रुपये खर्चून शासनाने महत्वपूर्ण वास्तू उभारल्या. मात्र अद्याप त्या धूळ खात पडून आहे.

ठळक मुद्देलोकार्पण नाही : वीज, पाणी, फर्निचर, कर्मचाऱ्यांचा अभाव

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : शहरात व तालुक्यात कोट्यवधी रुपये खर्चून शासनाने महत्वपूर्ण वास्तू उभारल्या. मात्र अद्याप त्या धूळ खात पडून आहे.नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये केवळ वीज, पाणी, फर्निचर, कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाली नाही. किरकोळ बाबींची पूर्तता न झाल्याने या वास्तू पडून आहे. या वास्तूंचा औपचारिक शुभारंभ करून त्या जनसेवेत उपयोगात आणल्या जाऊ शकतात. उर्वरित कामे शक्य तेवढ्या लवकर मार्गी लावून या वास्तूंचे लोकार्पण होणे गरजेचे आहे. यात तब्बल आठ कोटी २५ लाख रुपये खर्चून प्रशासकीय भवन बांधण्यात आले आहे. मात्र वीज व फर्निचरसारख्या किरकोळ कामांना विलंब लागत आहे. त्यामुळे हे वास्तू धूळ खात पडून आहे.पाच कोटी ९० लाख रुपये खर्चून सुंदर, सुबक सामाजिक न्याय भवनाची इमारत उन्हाळ्यातच बांधून पूर्ण झाली. तेथे वीज जोडणीची कामे सुरू आहे. ही वास्तू आत्तापर्यंत उपयोगात येण्याची अपेक्षा असताना छोट्या-छोट्या करणाने त्यास विलंब होत आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्याकरिता वास्तूच्या लोकार्पणास उशीर होत असल्याची चर्चा आहे. अडीच कोटी रुपयांचे ट्रामा केअर सेंटर अनेक महिन्यांपूर्वीच बांधून पूर्ण झाले. वीज व केवळ त्याकरिता पद भरती झाली नसल्याने ते जनतेच्या उपयोगात येऊ शकले नाही.नुकताच कळंब ते वडकी हा सिमेंट रोड बांधून झाल्यानंतर अपघाताच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. दररोज अपघात घडत आहे. त्यामुळे ट्रामा सेंटर त्वरित सुरू होणे गरजेचे आहे.३० तलाठी भवन ठरले शोभेचेतालुक्यात ३० पटवारी भवन निवासस्थानांसह दोन वर्षांपासून बांधून पूर्ण झाले. मात्र वीज, पाणी नसल्याने ते पटवाऱ्यांकरिता व पर्यायाने जनतेच्या उपयोगात येऊ शकले नाही. चार ते पाच कोटी रुपये खर्च होऊनही विलंबामुळे नव्या इमाारती जीर्ण होण्याच्या मार्गावर आहे. १ जानेवारीला नगरपंचायतीच्या नऊ कामांचे भूमिपूजन झाले होते. त्यापैकी अनेक कामे आठ महिने होऊनही पूर्णत्वास गेले नाही.