शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
3
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
4
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
5
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
6
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
7
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
8
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
10
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
11
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
12
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
13
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
14
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
15
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
16
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
17
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
18
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
20
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम

राष्ट्रीयकृत बँकांचे पीक कर्ज वाटप अर्ध्यावरच

By admin | Updated: July 23, 2015 02:22 IST

जिल्हा सहकारी बँकेच्या तुलनेत राष्ट्रीयकृत बँकांचा कर्ज वाटपाचा आकडा मोठा दिसत असला तरी प्रत्यक्षात उद्दीष्टाच्या तो अर्धाच आहे.

केंद्राच्या पत्राने कोंडी : प्रशासनाचे हात बांधले, कारवाईत अडचणीयवतमाळ : जिल्हा सहकारी बँकेच्या तुलनेत राष्ट्रीयकृत बँकांचा कर्ज वाटपाचा आकडा मोठा दिसत असला तरी प्रत्यक्षात उद्दीष्टाच्या तो अर्धाच आहे. मात्र त्यानंतरही या बँकांविरोधात ब्रसुद्धा काढण्याची सोय आता जिल्हा प्रशासनाकडे राहिलेली नाही. कारण केंद्रीय वित्त सचिवांनी या बँकांना पाठबळ दिले आहे. जिल्ह्यात पीक कर्जाबाबत आजही शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. अनेक शेतकऱ्यांना पहिल्याच पेरणीसाठी कर्ज मिळालेले नाही. त्यांच्या कर्जाचे पुनर्गठणच केले गेले नाही. पाऊस लांबल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. मात्र त्यांच्याकडे या दुबार पेरणीसाठी पैसाच नाही. जिल्ह्यात कर्ज वाटपाची स्थिती समाधानकारक नाही. जिल्हा सहकारी बँकेने आतापर्यंत ३०३ कोटी नऊ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप ५० हजार शेतकऱ्यांना केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या पीक कर्ज वाटपाचा आकडा ४५७ कोटी ७० लाखांवर पोहोचला आहे. ५२ हजार १८६ शेतकऱ्यांना हे कर्ज वाटप केले गेले आहे. गत वर्षीच्या कर्ज वाटपाच्या तुलनेत राष्ट्रीयकृत बँकांचा यंदाचा आकडा वाढलेला दिसतो आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सुरुवातीपासूनच घेतलेली आक्रमक भूमिका महत्वाची ठरली आहे. या वाढलेल्या आकड्याचे संपूर्ण श्रेय सिंह यांना दिले जाते. त्यांनी राष्ट्रीयकृत बँकांच्या जिल्ह्यातील तमाम व्यवस्थापकांची बैठक घेऊन त्यांना तंबी दिली होती. त्यामुळे पीक कर्जाचे वाटप काही प्रमाणात का होईना वाढले. जिल्हा बँकेच्या तुलनेत राष्ट्रीयकृतचा आकडा मोठा असला तरी या बँकांची संख्या डझनावर आहे. एका बँकेचा आकडा आणि १४ बँकांचा आकडा यात फरक आहे. राष्ट्रीयकृत बॅकांची संख्या पाहता हा आकडा कमी आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी आपल्या उद्दीष्टाच्या ५० टक्केच पीक कर्ज वाटप केले आहे. उद्दीष्ट पूर्ण न झाल्यास फौजदारी करू असा इशारा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी काही बँक व्यवस्थापकांना भादंवि १८८ कलमान्वये नोटीसही जारी केल्या. मात्र त्या नोटीसवर पुढे कारवाई करण्याची सोय आता राहिलेली नाही. कारण केंद्र शासनाच्या एका पत्राने जिल्हा प्रशासनाचे कारवाईचे हात बांधले आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयातील सचिव डॉ. हसमुख अडिया यांनी ८ जुलै रोजी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून राष्ट्रीयकृत बँकांना पीक कर्ज वाटपासाठी सक्ती न करण्याचे सूचविले आहे. तशा सूचना तमाम जिल्हा दंडाधिकाऱ्यांना द्याव्या, असेही या पत्रात राज्याच्या मुख्य सचिवांना सांगण्यात आले आहे. या पत्रामुळे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट अर्ध्यावर असूनही राष्ट्रीयकृत बँकांना चांगलेच पाठबळ मिळाले आहे. या उलट स्थिती जिल्हा प्रशासनाची झाली आहे. कारण या पत्रामुळे त्यांना आता राष्ट्रीयकृत बँकांच्या कुण्या व्यवस्थापकावर कारवाई करणे शक्य होणार नाही. राष्ट्रीयकृत बँका गत वर्षीपेक्षा कर्ज वाटप वाढल्याचा डांगोरा पिटत आहे. (जिल्हा प्रतिनिधी) कर्ज पुनर्गठणातही राष्ट्रीयकृत बँका माघारल्या राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांच्या कर्ज पुनर्गठणातही माघारल्या आहेत. जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या तंबीमुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावेच लागेल, याची जाणीव झालेले अनेक बँक व्यवस्थापक दीर्घ रजेवर गेले आहेत. काहींनी पुनर्गठणासाठी मुदतवाढ मागितली आहे. रिझर्व्ह बँकने त्यांना सुरुवातीला ३० जून व नंतर १५ जुलै अशी मुदतवाढ दिली. मात्र या काळातही कर्जाचे पुनर्गठण होऊ शकले नाही. म्हणून आता ३१ जुलै ही तारीख नव्याने देण्यात आली आहे. ही बँकांसाठी अंतिम मुदतवाढ आहे. या काळात उर्वरित सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण पूर्ण करण्याचे आव्हान बँकांपुढे राहणार आहे. ते न झाल्यास आरबीआयकडून कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.