शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयकृत बँकांचे पीक कर्ज वाटप अर्ध्यावरच

By admin | Updated: July 23, 2015 02:22 IST

जिल्हा सहकारी बँकेच्या तुलनेत राष्ट्रीयकृत बँकांचा कर्ज वाटपाचा आकडा मोठा दिसत असला तरी प्रत्यक्षात उद्दीष्टाच्या तो अर्धाच आहे.

केंद्राच्या पत्राने कोंडी : प्रशासनाचे हात बांधले, कारवाईत अडचणीयवतमाळ : जिल्हा सहकारी बँकेच्या तुलनेत राष्ट्रीयकृत बँकांचा कर्ज वाटपाचा आकडा मोठा दिसत असला तरी प्रत्यक्षात उद्दीष्टाच्या तो अर्धाच आहे. मात्र त्यानंतरही या बँकांविरोधात ब्रसुद्धा काढण्याची सोय आता जिल्हा प्रशासनाकडे राहिलेली नाही. कारण केंद्रीय वित्त सचिवांनी या बँकांना पाठबळ दिले आहे. जिल्ह्यात पीक कर्जाबाबत आजही शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. अनेक शेतकऱ्यांना पहिल्याच पेरणीसाठी कर्ज मिळालेले नाही. त्यांच्या कर्जाचे पुनर्गठणच केले गेले नाही. पाऊस लांबल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. मात्र त्यांच्याकडे या दुबार पेरणीसाठी पैसाच नाही. जिल्ह्यात कर्ज वाटपाची स्थिती समाधानकारक नाही. जिल्हा सहकारी बँकेने आतापर्यंत ३०३ कोटी नऊ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप ५० हजार शेतकऱ्यांना केले आहे. राष्ट्रीयकृत बँकांच्या पीक कर्ज वाटपाचा आकडा ४५७ कोटी ७० लाखांवर पोहोचला आहे. ५२ हजार १८६ शेतकऱ्यांना हे कर्ज वाटप केले गेले आहे. गत वर्षीच्या कर्ज वाटपाच्या तुलनेत राष्ट्रीयकृत बँकांचा यंदाचा आकडा वाढलेला दिसतो आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सुरुवातीपासूनच घेतलेली आक्रमक भूमिका महत्वाची ठरली आहे. या वाढलेल्या आकड्याचे संपूर्ण श्रेय सिंह यांना दिले जाते. त्यांनी राष्ट्रीयकृत बँकांच्या जिल्ह्यातील तमाम व्यवस्थापकांची बैठक घेऊन त्यांना तंबी दिली होती. त्यामुळे पीक कर्जाचे वाटप काही प्रमाणात का होईना वाढले. जिल्हा बँकेच्या तुलनेत राष्ट्रीयकृतचा आकडा मोठा असला तरी या बँकांची संख्या डझनावर आहे. एका बँकेचा आकडा आणि १४ बँकांचा आकडा यात फरक आहे. राष्ट्रीयकृत बॅकांची संख्या पाहता हा आकडा कमी आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी आपल्या उद्दीष्टाच्या ५० टक्केच पीक कर्ज वाटप केले आहे. उद्दीष्ट पूर्ण न झाल्यास फौजदारी करू असा इशारा जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी दिला होता. त्यानुसार त्यांनी काही बँक व्यवस्थापकांना भादंवि १८८ कलमान्वये नोटीसही जारी केल्या. मात्र त्या नोटीसवर पुढे कारवाई करण्याची सोय आता राहिलेली नाही. कारण केंद्र शासनाच्या एका पत्राने जिल्हा प्रशासनाचे कारवाईचे हात बांधले आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयातील सचिव डॉ. हसमुख अडिया यांनी ८ जुलै रोजी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून राष्ट्रीयकृत बँकांना पीक कर्ज वाटपासाठी सक्ती न करण्याचे सूचविले आहे. तशा सूचना तमाम जिल्हा दंडाधिकाऱ्यांना द्याव्या, असेही या पत्रात राज्याच्या मुख्य सचिवांना सांगण्यात आले आहे. या पत्रामुळे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट अर्ध्यावर असूनही राष्ट्रीयकृत बँकांना चांगलेच पाठबळ मिळाले आहे. या उलट स्थिती जिल्हा प्रशासनाची झाली आहे. कारण या पत्रामुळे त्यांना आता राष्ट्रीयकृत बँकांच्या कुण्या व्यवस्थापकावर कारवाई करणे शक्य होणार नाही. राष्ट्रीयकृत बँका गत वर्षीपेक्षा कर्ज वाटप वाढल्याचा डांगोरा पिटत आहे. (जिल्हा प्रतिनिधी) कर्ज पुनर्गठणातही राष्ट्रीयकृत बँका माघारल्या राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांच्या कर्ज पुनर्गठणातही माघारल्या आहेत. जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या तंबीमुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावेच लागेल, याची जाणीव झालेले अनेक बँक व्यवस्थापक दीर्घ रजेवर गेले आहेत. काहींनी पुनर्गठणासाठी मुदतवाढ मागितली आहे. रिझर्व्ह बँकने त्यांना सुरुवातीला ३० जून व नंतर १५ जुलै अशी मुदतवाढ दिली. मात्र या काळातही कर्जाचे पुनर्गठण होऊ शकले नाही. म्हणून आता ३१ जुलै ही तारीख नव्याने देण्यात आली आहे. ही बँकांसाठी अंतिम मुदतवाढ आहे. या काळात उर्वरित सर्व शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण पूर्ण करण्याचे आव्हान बँकांपुढे राहणार आहे. ते न झाल्यास आरबीआयकडून कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.