शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

पीक विमा रुपये १५६

By admin | Updated: July 17, 2014 00:19 IST

गाजावाजा करीत विमा कंपनींनी घोषित केलेल्या कपाशी पीक संरक्षणाचे शेतकऱ्यांच्या हातात हेक्टरी केवळ १५६ रुपयेच पडत आहे. विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी एक हजार १० रुपये भरले.

शेतकऱ्यांची थट्टा : हप्ता १०१०, भरपाई ११६६ रुपयेरूपेश उत्तरवार - यवतमाळ गाजावाजा करीत विमा कंपनींनी घोषित केलेल्या कपाशी पीक संरक्षणाचे शेतकऱ्यांच्या हातात हेक्टरी केवळ १५६ रुपयेच पडत आहे. विमा हप्त्यापोटी शेतकऱ्यांनी एक हजार १० रुपये भरले. तर घोषित झालेला विमा एक हजार १६६ रुपये आहे. म्हणजे शेतकऱ्यांना हेक्टर केवळ १५६ रुपयेच मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी विमा कंपनीच्या माध्यमातून पिकांना संरक्षण दिले जाते. शेतकरी आणि शासन विम्याचा हप्ता कंपनीकडे भरतात. गेल्या सात वर्षात शेतकऱ्यांनी आपल्या पिकांना संरक्षित केले. मात्र या विम्याचा लाभच झाला नव्हता. यंदा विमा कंपनीने पिकांच्या नुकसानभरपाईची रक्कम घोषित केली. मात्र ही रक्कम शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणारी आहे. २०१३-१४ मध्ये जिल्ह्यातील दोन लाख ९७ हजार ४१७ शेतकऱ्यांनी दोन लाख ५४ हजार ३३० हेक्टरवरील पीक संरक्षित केले होते. यात सर्वाधिक क्षेत्र कापूस आणि सोयाबीनचे होते. त्या खालोखाल तूर, ज्वारी आणि मूग, उडीदाचे पीकही समाविष्ठ होते. विमा कंपनीने घोषित केलेल्या नुकसानभरपाईस ९७ हजार ९०६ शेतकरी पात्र ठरले. त्यांना ३४ कोटींची मदत मिळणार आहे. मदतीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना ही रक्कम मोठी वाटत असली तरी निकषानुसार मदत कवडीमोल आहे.विमा कंपनीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १ हजार १६६ रुपये नुकसानभरपाई देण्याची तरतूद केली आहे. विशेष म्हणजे कापसाचा एक हेक्टरचा विमा उतरविण्यासाठी निर्धारित दर होता १ हजार १० रुपये विम्याचा हप्ता आणि नुकसानभरपाई खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात हेक्टरी केवळ १५६ रुपयेच पडत आहे. ही रक्कम म्हणजे एक मन कापूस वेचणीची मजुरीच आहे. प्रत्यक्षात एका हेक्टरला ३० हजारा पेक्षा अधिक नुकसानीला सामोरे जावे लागले. विमा उतरविताना कंपनीने २० हजार २० रुपयांच्या नुकसानभरपाईची हमी स्वीकारली होती. प्रत्यक्षात कंपनीने शेतकऱ्यांची निराशा केली.जिल्ह्यातील एक लाख नऊ हजार ८०३ शेतकऱ्यांनी कापूस पिकाच्या संरक्षणासाठी १३ कोटी ५७ लाख रुपयांचा हप्ता भरला होता. प्रत्यक्षात सात हजार ७३३ शेतकऱ्यांंना १५ लाख ३२ हजार २१० रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली. यामध्ये केवळ चार सर्कल मदतीस पात्र ठरले आहे. त्यात महागाव, फुलसावंगी, उमरखेड आणि मुळावा या सर्कलचा समावेश आहे. इतर ९७ सर्कल अपात्र ठरले आहे. या सारखीच स्थिती सोयाबीनची आहे. ७३ हजार ४३८ शेतकऱ्यांनी सोयाबीनचा विमा उतरविला. २९ कोटी ६४ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली. नुकसानभरपाईपोटी दोन हजार ७३७ रुपये निश्चित करण्यात आले. सोयाबीनचा एक हेक्टरचा विमा उतरविण्यासाठी ५५४ रुपयांचा खर्च प्रत्येकला शेतकऱ्याला आला होता. हा खर्च वजा जाता शेतकऱ्याच्या हातात दोन हजार २२३ रुपये पडणार आहे. या पैशात सोयाबीन बियाण्याची एक बॅगही मिळत नाही. त्यासाठी २६०० रुपये मोजावे लागतात. विमा कंपनीने शेतकऱ्यांंना अत्यल्प नुकसानभरपाई दिली असली तरी लोकप्रतिनिधी मात्र बोलायला तयार नाही. तर शेतकरीही निमूटपणे ही मदत घेण्याच्या तयारीत दिसतात. आवाज उठविला गेला नाही तर आगामी काळातही अशीच लूट होण्याची शक्यता आहे. मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम भरली. मात्र हाती मजुरीही पडत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहे.