शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याचे ७९ कोटी आले हो...!

By admin | Updated: June 23, 2015 00:26 IST

गतवर्षीचा खरीप हंगाम अल्प पावसाने उद्ध्वस्त झाला होता.

सव्वालाख शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली : सात दिवसात होणार खात्यात जमायवतमाळ : गतवर्षीचा खरीप हंगाम अल्प पावसाने उद्ध्वस्त झाला होता. या हंगामासाठी पीक विमा काढणाऱ्या सव्वालाख शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी ७९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून ही रक्कम सात दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.जिल्ह्यात २०१४-१५ या खरीप हंगामात एक लाख ३१ हजार ८६४ शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या हप्त्यापोटी नऊ कोटी ६७ लाख १२ हजार ५९९ रुपये भरले होते. त्यातून २०० कोटी ७० लाख ९१ हजार ७९३ रुपयांचे पीक संरक्षित करण्यात आले होते. कोरड्या दुष्काळामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. मोठे नुकसान झाले. यामध्ये पीक विमा उतरविणाऱ्या एक लाख ३१ हजार शेतकऱ्यांपैकी एक लाख २२ हजार ४५७ शेतकरी मदतीस पात्र ठरले. या शेतकऱ्यांना ७८ कोटी ७९ लाख ४८ हजार १३८ रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला आहे. मंजूर करण्यात आलेली पीक विम्याची रक्कम जिल्ह्याकडे वळती करण्यात आली. ही सर्व रक्कम सोमवारी बँकांच्या तालुका शाखांमध्ये जमा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या सर्कलनिहाय याद्या तयार करण्यात येईल. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात पीक विम्याची ही रक्कम जमा होणार आहे. यासाठी आणखी सात दिवस लागणार असून २९ जूनपासून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळण्याची शक्यता बँक स्तरावर व्यक्त करण्यात आली आहे. विम्याच्या मदतीस पात्र ठरलेले सर्वाधिक शेतकरी उमरखेड तालुक्यातील असून २९ हजार ६७९ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. तर सर्वात कमी शेतकरी मारेगाव तालुक्यातील आहे. (शहर वार्ताहर)