शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

पीक विम्याचे ७९ कोटी आले हो...!

By admin | Updated: June 23, 2015 00:26 IST

गतवर्षीचा खरीप हंगाम अल्प पावसाने उद्ध्वस्त झाला होता.

सव्वालाख शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली : सात दिवसात होणार खात्यात जमायवतमाळ : गतवर्षीचा खरीप हंगाम अल्प पावसाने उद्ध्वस्त झाला होता. या हंगामासाठी पीक विमा काढणाऱ्या सव्वालाख शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी ७९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून ही रक्कम सात दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.जिल्ह्यात २०१४-१५ या खरीप हंगामात एक लाख ३१ हजार ८६४ शेतकऱ्यांनी पीक विम्याच्या हप्त्यापोटी नऊ कोटी ६७ लाख १२ हजार ५९९ रुपये भरले होते. त्यातून २०० कोटी ७० लाख ९१ हजार ७९३ रुपयांचे पीक संरक्षित करण्यात आले होते. कोरड्या दुष्काळामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. मोठे नुकसान झाले. यामध्ये पीक विमा उतरविणाऱ्या एक लाख ३१ हजार शेतकऱ्यांपैकी एक लाख २२ हजार ४५७ शेतकरी मदतीस पात्र ठरले. या शेतकऱ्यांना ७८ कोटी ७९ लाख ४८ हजार १३८ रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला आहे. मंजूर करण्यात आलेली पीक विम्याची रक्कम जिल्ह्याकडे वळती करण्यात आली. ही सर्व रक्कम सोमवारी बँकांच्या तालुका शाखांमध्ये जमा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या सर्कलनिहाय याद्या तयार करण्यात येईल. त्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात पीक विम्याची ही रक्कम जमा होणार आहे. यासाठी आणखी सात दिवस लागणार असून २९ जूनपासून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळण्याची शक्यता बँक स्तरावर व्यक्त करण्यात आली आहे. विम्याच्या मदतीस पात्र ठरलेले सर्वाधिक शेतकरी उमरखेड तालुक्यातील असून २९ हजार ६७९ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. तर सर्वात कमी शेतकरी मारेगाव तालुक्यातील आहे. (शहर वार्ताहर)