शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांनी उतरविला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 13:47 IST

राज्यभरात पावसाचा हाहाकार सुरू आहे. काही ठिकाणी बेसुमार पाऊस बरसला आहे. तर काही भाग कोरडा आहे. या नैसर्गिक संकटातून वाचण्यासाठी राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला.

ठळक मुद्देमराठवाडा, विदर्भातील ८० लाख शेतकरी ओल्या आणि कोरड्या दुष्काळाच्या भीतीने सावध पवित्रा

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यभरात पावसाचा हाहाकार सुरू आहे. काही ठिकाणी बेसुमार पाऊस बरसला आहे. तर काही भाग कोरडा आहे. या नैसर्गिक संकटातून वाचण्यासाठी राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला. यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील ८० लाख शेतकऱ्यांनी धाव घेतली आहे. तर उर्वरित २० लाख शेतकरी पाच विभागांतील आहेत. ५३ लाख ४८ हजार हेक्टरवरील पीक संरक्षित झाले आहे. तर ९० लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी विमाच उतरविला नाही. त्यामुळे तेथील पीक रामभरोसे राहणार आहे.कोकण, नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे, सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर २४ जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिली आहे. या स्थितीत राज्यातील सर्वच विभागातील पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील ८० लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला.सर्वाधिक पीक विमा औरंगाबाद विभागातील शेतकऱ्यांनी उतरविला आहे. या ठिकाणी ४१ लाख ८ हजार ४१० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. त्यात सर्वाधिक शेतकरी बिड जिल्ह्यातील आहे. तेथील २० लाख ८३ हजार ८० शेकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. राज्यातला हा सर्वात मोठा आकडा आहे. लातूर विभागातील ३६ लाख ६१ हजार ३०३ शेतकऱ्यांनी, पुणे विभागातील ११ लाख शेतकऱ्यांनी, तर अमरावती विभागात १० लाख ४१ हजार ८३८ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र यवतमाळ जिल्ह्याचे आहे. या ठिकाणी तीन लाख ५४ हजार ३५५ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे.शेतकऱ्यांनी भरले ४४१ कोटीपीक विमा उतरविताना काही वाटा शेतकऱ्यांना भरायचा होता. राज्यातील एक कोटी सात लाख २४ हजार ८५१ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला. ४४१ कोटी ८७ लाख २२ हजार ६८१ रूपये विमा कंपनीकडे वळते केले. यामुळे ५३ लाख ४८ हजार ९८६ हेक्टरवरील पीक संरक्षित झाले. १७ हजार ९९९ कोटी ७७ लाख नऊ हजार ९४० रूपयांच्या नुकसान भरपाईची हमी विमा कंपनीने उचलली आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, धान, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांचा समावेश आहे.गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा वाढला आहे. यावर्षी त्यामध्ये वाढ नोंदविली गेली आहे. यावर्षीची स्थिती पाहता शेतकऱ्यांना याचा लाभ होईल.- डॉ. अनिल बोंडे,कृषीमंत्री

टॅग्स :agricultureशेती