शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांनी उतरविला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 13:47 IST

राज्यभरात पावसाचा हाहाकार सुरू आहे. काही ठिकाणी बेसुमार पाऊस बरसला आहे. तर काही भाग कोरडा आहे. या नैसर्गिक संकटातून वाचण्यासाठी राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला.

ठळक मुद्देमराठवाडा, विदर्भातील ८० लाख शेतकरी ओल्या आणि कोरड्या दुष्काळाच्या भीतीने सावध पवित्रा

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यभरात पावसाचा हाहाकार सुरू आहे. काही ठिकाणी बेसुमार पाऊस बरसला आहे. तर काही भाग कोरडा आहे. या नैसर्गिक संकटातून वाचण्यासाठी राज्यातील एक कोटी शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला. यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील ८० लाख शेतकऱ्यांनी धाव घेतली आहे. तर उर्वरित २० लाख शेतकरी पाच विभागांतील आहेत. ५३ लाख ४८ हजार हेक्टरवरील पीक संरक्षित झाले आहे. तर ९० लाख हेक्टरवर शेतकऱ्यांनी विमाच उतरविला नाही. त्यामुळे तेथील पीक रामभरोसे राहणार आहे.कोकण, नाशिक, पुणे, मुंबई, ठाणे, सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर २४ जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिली आहे. या स्थितीत राज्यातील सर्वच विभागातील पीक धोक्यात आले आहे. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातील ८० लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला.सर्वाधिक पीक विमा औरंगाबाद विभागातील शेतकऱ्यांनी उतरविला आहे. या ठिकाणी ४१ लाख ८ हजार ४१० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. त्यात सर्वाधिक शेतकरी बिड जिल्ह्यातील आहे. तेथील २० लाख ८३ हजार ८० शेकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे. राज्यातला हा सर्वात मोठा आकडा आहे. लातूर विभागातील ३६ लाख ६१ हजार ३०३ शेतकऱ्यांनी, पुणे विभागातील ११ लाख शेतकऱ्यांनी, तर अमरावती विभागात १० लाख ४१ हजार ८३८ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र यवतमाळ जिल्ह्याचे आहे. या ठिकाणी तीन लाख ५४ हजार ३५५ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला आहे.शेतकऱ्यांनी भरले ४४१ कोटीपीक विमा उतरविताना काही वाटा शेतकऱ्यांना भरायचा होता. राज्यातील एक कोटी सात लाख २४ हजार ८५१ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला. ४४१ कोटी ८७ लाख २२ हजार ६८१ रूपये विमा कंपनीकडे वळते केले. यामुळे ५३ लाख ४८ हजार ९८६ हेक्टरवरील पीक संरक्षित झाले. १७ हजार ९९९ कोटी ७७ लाख नऊ हजार ९४० रूपयांच्या नुकसान भरपाईची हमी विमा कंपनीने उचलली आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, धान, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांचा समावेश आहे.गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा वाढला आहे. यावर्षी त्यामध्ये वाढ नोंदविली गेली आहे. यावर्षीची स्थिती पाहता शेतकऱ्यांना याचा लाभ होईल.- डॉ. अनिल बोंडे,कृषीमंत्री

टॅग्स :agricultureशेती