शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

५० हजार हेक्टरवरील पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 21:35 IST

जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीने तब्बल ५० हजार हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला.

ठळक मुद्देवादळ-गारपीट : लासीना येथे घर कोसळले, अनेक ठिकाणी पक्ष्यांचा मृत्यू, विजेचे खांब आडवे

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीने तब्बल ५० हजार हेक्टरवरील रबी पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला. यात शेतकऱ्यांची कोट्यवधींची हानी झाल्याने त्यांच्या डोळ्यात आसवे येऊ लागली आहे.जिल्ह्यात एक लाख एक हजार ९७३ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली. यामध्ये सर्वाधिक ८७ हजार ४५७ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली. हा हरभरा काढणीच्या अवस्थेत आहे. मात्र त्याचवेळी शेतशिवारावर चिकूच्या आकाराच्या प्रचंड गारांचा वर्षाव झाला. यामुळे हरभऱ्याचे घाटे गळून पडले. गारा १२ तास त्या क्षेत्रात विरघळल्या नाही. पहाटेच्या सुमारास त्या गारा शेतात तशाच पडून होत्या.ओलिताचे साहित्यही गारांमुळे फुटले. शेतशिवारातील जनावरे सैरावैरा धावत सुटली. झाडावर आश्रय घेणारे पक्षीही मरून पडले. काही भागात विजेचे पोल आडवे झाले. तारा तुटल्या, यामुळे वीज प्रवाह खंडित झाला. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. काही ठिकाणी सायंकाळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. दूरध्वनी सेवाही ठप्प झाली.यवतमाळ तालुक्यातील जामडोहमध्ये वादळवाऱ्यासह आलेल्या पावसाने झोपड्यांवरचे छत उडून गेले. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नेर तालुक्यातील सोनखास परिसरात गारांसह पाऊस झाला. घुईलाही याचा मोठा फटका बसला.कळंब तालुक्यात वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. राळेगाव तालुक्यात वाऱ्यासह पाऊस झाला. बाभूळगाव तालुक्यात सौजना, घारफळ, वाटखेड, कृष्णापूर, केगाव, बोदड, मांजरा येथे जोरदार पाऊस झाला.आर्णी, दारव्हा तालुक्यात गारांसह पाऊस झाला. उमरखेड तालुक्यातील मुरली, लिंगी, या ठिकाणी गारांसह पाऊस झाला. महागाव तालुक्यातील पिंपळगाव, वडद, देवसरी, लोहारा, कारखेड या ठिकाणी गारपिटीसह पाऊस झाला. घाटंजी, वणी, मारेगाव आणि झरीमध्ये जोरदार पाऊस तर काही प्रमाणात गारपीट झाली. या तालुक्यांमध्ये कोट्यवधीचे पीक शेतशिवारात उभे होते. गारपिटीने तोंडाशी आलेले पीक निसर्ग प्रकोपाने हातातून गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मंगळवारी येळाबारा परिसरात १५ मिनीट गारपीट झाली. दहेली, सायखेडा, रामगाव, रामवाकडी, रोहटेक, दुधाना, नवाटी, वाकी, आकपुरी, वागदा आदी गावांना तडाखा बसला. शेती पिकांचे नुकसान झाले.तृण, गळीत, चारा पिकांचे नुकसानपावसासह आलेल्या गारांमुळे गहू, ज्वारी, मका या तृणधान्यासह मोहरी, करडई, तिळ, सूर्यफुल या गळीत धान्याचे नुकसान झाले. मका, ज्वारी ही चारा पिके आणि भाजीपाल्यासोबत हरभºयाला सर्वाधिक फटका बसला.१४४ मिलीमीटर पावसाची नोंदगत २४ तासांत झालेल्या पावासाने जिल्ह्यात १४४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. यामध्ये यवतमाळ १५ मिमी, कळंब १३, राळेगाव २८, बाभूळगाव ३, आर्णी ६, नेर १२, उमरखेड ५, महागाव २, केळापूर १५, घाटंजी ८, वणी ९, मारेगाव ८, झरीमध्ये २० मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात सरासरी ९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Rainपाऊस