शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

पीक बहरले, प्रकल्प कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:53 IST

उपविभागातील उमरखेड आणि महागाव तालुक्यात रिमझिम पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले

उमरखेड-महागावात रिमझिम पाऊस : इसापूर धरणात तीन टक्के पाणीसाठा लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : उपविभागातील उमरखेड आणि महागाव तालुक्यात रिमझिम पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले तरी अद्यापही सिंचन प्रकल्पात मात्र ठणठणाट आहे. तालुक्यासाठी जीवनदायी ठरणाऱ्या इसापूर धरणात आताही केवळ तीन टक्के पाणी आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान असले तरी अनेक गावात पाणीटंचाईचे संकट कायम आहे. उमरखेड आणि महागाव तालुक्यात यावर्षी कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी आदी पिकांची लागवड केली. मृगात झालेल्या पावसाने पिके चांगली झाली. परंतु पावसाने दडी मारली. पिके करपू लागली होती. अशातच गत आठ दिवसांपासून पावसाने तुषार सिंचन सुरू केले. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यात गत महिनाभरात २२८ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर तीन दिवसात केवळ ३० मिमी पाऊस कोसळला. या पावसामुळे उमरखेड, महागाव तालुक्यातील पिकांना संजीवनी मिळाली. शेतकऱ्यांत आनंद आहे. मात्र यंदा अद्यापही नदी, नाले, विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. प्रकल्पातही पाणी नाही. दमदार पाऊस झाला नाही तर पाणीटंचाई झळ हिवाळ्यापासूनच लागू शकते. पैनगंगा नदीतही अद्याप पाणी वाहले नाही. एकीकडे पीक चांगले असले तरी जमिनीत खोलवर ओल दिसत नाही. उमरखेड तालुक्यातील शेतकरी व नागरिकांसाठी महत्त्वाचे असणारे इसापूर धरण सध्या कोरडे दिसत आहे. प्रकल्पात केवळ तीन टक्के पाणीसाठा आहे. पैनगंगा नदीवरील ६० गावातील पाणीपुरवठा योजना याच प्रकल्पावर अवलंबून आहे. समाधानकारक पाऊस झाला नाही तर पाणीटंचाईचे संकट घोंगावू शकते. पुसद तालुक्यातील पूस धरणात केवळ १८ टक्के जलसाठा पुसद : शहरासह परिसरात गत तीन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. १८ जुलैच्या रात्रीपासून सकाळी ८ वाजेपर्यंत रिमझिम पाऊस बरसत होता. गत २४ तासात २१ मिमी तर आतापर्यंत ५४८ मिमी पावसाची नोंद झाली. पिकांना पोषक पाऊस असला तरी पूस धरणाचा जलसाठा मात्र केवळ १८ टक्केच आहे. पुसद शहरासाठी संजीवनी असलेला पूस प्रकल्प अद्यापही कोरडा आहे. गतवर्षी या प्रकल्पात १८ जुलै रोजी ४२.२२ टक्के जलसाठा होता. परंतु यंदा केवळ १८ टक्केच जलसाठा आहे. मात्र पाऊस रिमझिम का होईना कोसळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.