शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

पीक बहरले, प्रकल्प कोरडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:53 IST

उपविभागातील उमरखेड आणि महागाव तालुक्यात रिमझिम पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले

उमरखेड-महागावात रिमझिम पाऊस : इसापूर धरणात तीन टक्के पाणीसाठा लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : उपविभागातील उमरखेड आणि महागाव तालुक्यात रिमझिम पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले तरी अद्यापही सिंचन प्रकल्पात मात्र ठणठणाट आहे. तालुक्यासाठी जीवनदायी ठरणाऱ्या इसापूर धरणात आताही केवळ तीन टक्के पाणी आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान असले तरी अनेक गावात पाणीटंचाईचे संकट कायम आहे. उमरखेड आणि महागाव तालुक्यात यावर्षी कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, ज्वारी आदी पिकांची लागवड केली. मृगात झालेल्या पावसाने पिके चांगली झाली. परंतु पावसाने दडी मारली. पिके करपू लागली होती. अशातच गत आठ दिवसांपासून पावसाने तुषार सिंचन सुरू केले. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यात गत महिनाभरात २२८ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर तीन दिवसात केवळ ३० मिमी पाऊस कोसळला. या पावसामुळे उमरखेड, महागाव तालुक्यातील पिकांना संजीवनी मिळाली. शेतकऱ्यांत आनंद आहे. मात्र यंदा अद्यापही नदी, नाले, विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. प्रकल्पातही पाणी नाही. दमदार पाऊस झाला नाही तर पाणीटंचाई झळ हिवाळ्यापासूनच लागू शकते. पैनगंगा नदीतही अद्याप पाणी वाहले नाही. एकीकडे पीक चांगले असले तरी जमिनीत खोलवर ओल दिसत नाही. उमरखेड तालुक्यातील शेतकरी व नागरिकांसाठी महत्त्वाचे असणारे इसापूर धरण सध्या कोरडे दिसत आहे. प्रकल्पात केवळ तीन टक्के पाणीसाठा आहे. पैनगंगा नदीवरील ६० गावातील पाणीपुरवठा योजना याच प्रकल्पावर अवलंबून आहे. समाधानकारक पाऊस झाला नाही तर पाणीटंचाईचे संकट घोंगावू शकते. पुसद तालुक्यातील पूस धरणात केवळ १८ टक्के जलसाठा पुसद : शहरासह परिसरात गत तीन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. १८ जुलैच्या रात्रीपासून सकाळी ८ वाजेपर्यंत रिमझिम पाऊस बरसत होता. गत २४ तासात २१ मिमी तर आतापर्यंत ५४८ मिमी पावसाची नोंद झाली. पिकांना पोषक पाऊस असला तरी पूस धरणाचा जलसाठा मात्र केवळ १८ टक्केच आहे. पुसद शहरासाठी संजीवनी असलेला पूस प्रकल्प अद्यापही कोरडा आहे. गतवर्षी या प्रकल्पात १८ जुलै रोजी ४२.२२ टक्के जलसाठा होता. परंतु यंदा केवळ १८ टक्केच जलसाठा आहे. मात्र पाऊस रिमझिम का होईना कोसळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.