शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 05:00 IST

निकृष्ट बियाण्यामुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले. कृषी केंद्र चालकांनी निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले. शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली. शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या नामांकित कंपनीचे बियाणे उगवलेच नाही. शेतकऱ्यांनी दिवसरात्र एक करून शेतीची मशागत करून पेरणी केली. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नसल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे. यामुळे शेतकरी पुरते हवालदिल व पोरके झाले आहे.

ठळक मुद्देउगवलेच नाही : घाटंजीत निकृष्ट बियाण्यांचा कहर

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन व कपाशी पिकांची लागवड करण्यात आली. मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी अव्वाच्या सव्वा दरात नामांकित कंपनीचे बियाणे खरेदी केले. मात्र पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.भरपूर उत्पन होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र निकृष्ट बियाण्यामुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले. कृषी केंद्र चालकांनी निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले. शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली. शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या नामांकित कंपनीचे बियाणे उगवलेच नाही. शेतकऱ्यांनी दिवसरात्र एक करून शेतीची मशागत करून पेरणी केली. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नसल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे. यामुळे शेतकरी पुरते हवालदिल व पोरके झाले आहे.मागीलवर्षीच्या शेतमालाचा मोबदलासुद्धा अनेकांना मिळाला नाही. कर्जमाफीही पदरी पडली नाही. त्यात कोरोनाचे संकट ओढवले. अशा चौफेर संकटांमुळे शेतकरी त्रस्त आहे. त्यात आता पेरलेले उगवलेच नसल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. आधीच बँकेत कर्ज मागायला चकरा माराव्या लागतात. कर्जमाफीचे घोडेसुद्धा अडकून आहे. आता सावकाराकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय नाही. लोकप्रतिनिधीसुद्धा या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुणाकडे मदत मागावी, असा प्रश्न आहे.अंकुरलेल्या पिकांचे नुकसानगेल्या आठवड्यात तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. यात बेलोरा, करमना, दत्तापूर शिवारातील कापूस व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. करमना परिसरात गारपीट झाल्याने कपाशीच्या झाडांचे शेंडे तुटून पडले. पाने गळून गेली. काही ठिकाणी जमीन खरडून गेली. तरीही शेतात कुणी पंचनामा करून कृषी अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला नाही. या समस्येकडे सरकारने वेळीच आणि गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. बोगस बियाणे विक्री करणारे कृषी केंद्र व कंपन्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती