शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 05:00 IST

निकृष्ट बियाण्यामुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले. कृषी केंद्र चालकांनी निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले. शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली. शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या नामांकित कंपनीचे बियाणे उगवलेच नाही. शेतकऱ्यांनी दिवसरात्र एक करून शेतीची मशागत करून पेरणी केली. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नसल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे. यामुळे शेतकरी पुरते हवालदिल व पोरके झाले आहे.

ठळक मुद्देउगवलेच नाही : घाटंजीत निकृष्ट बियाण्यांचा कहर

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन व कपाशी पिकांची लागवड करण्यात आली. मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी अव्वाच्या सव्वा दरात नामांकित कंपनीचे बियाणे खरेदी केले. मात्र पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.भरपूर उत्पन होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र निकृष्ट बियाण्यामुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले. कृषी केंद्र चालकांनी निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले. शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली. शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या नामांकित कंपनीचे बियाणे उगवलेच नाही. शेतकऱ्यांनी दिवसरात्र एक करून शेतीची मशागत करून पेरणी केली. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नसल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे. यामुळे शेतकरी पुरते हवालदिल व पोरके झाले आहे.मागीलवर्षीच्या शेतमालाचा मोबदलासुद्धा अनेकांना मिळाला नाही. कर्जमाफीही पदरी पडली नाही. त्यात कोरोनाचे संकट ओढवले. अशा चौफेर संकटांमुळे शेतकरी त्रस्त आहे. त्यात आता पेरलेले उगवलेच नसल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. आधीच बँकेत कर्ज मागायला चकरा माराव्या लागतात. कर्जमाफीचे घोडेसुद्धा अडकून आहे. आता सावकाराकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय नाही. लोकप्रतिनिधीसुद्धा या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुणाकडे मदत मागावी, असा प्रश्न आहे.अंकुरलेल्या पिकांचे नुकसानगेल्या आठवड्यात तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. यात बेलोरा, करमना, दत्तापूर शिवारातील कापूस व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. करमना परिसरात गारपीट झाल्याने कपाशीच्या झाडांचे शेंडे तुटून पडले. पाने गळून गेली. काही ठिकाणी जमीन खरडून गेली. तरीही शेतात कुणी पंचनामा करून कृषी अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला नाही. या समस्येकडे सरकारने वेळीच आणि गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. बोगस बियाणे विक्री करणारे कृषी केंद्र व कंपन्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती