शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 05:00 IST

निकृष्ट बियाण्यामुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले. कृषी केंद्र चालकांनी निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले. शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली. शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या नामांकित कंपनीचे बियाणे उगवलेच नाही. शेतकऱ्यांनी दिवसरात्र एक करून शेतीची मशागत करून पेरणी केली. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नसल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे. यामुळे शेतकरी पुरते हवालदिल व पोरके झाले आहे.

ठळक मुद्देउगवलेच नाही : घाटंजीत निकृष्ट बियाण्यांचा कहर

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन व कपाशी पिकांची लागवड करण्यात आली. मोठ्या आशेने शेतकऱ्यांनी अव्वाच्या सव्वा दरात नामांकित कंपनीचे बियाणे खरेदी केले. मात्र पेरलेले बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.भरपूर उत्पन होईल, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पेरणी केली. मात्र निकृष्ट बियाण्यामुळे त्यांच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले. कृषी केंद्र चालकांनी निकृष्ट बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले. शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली. शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या नामांकित कंपनीचे बियाणे उगवलेच नाही. शेतकऱ्यांनी दिवसरात्र एक करून शेतीची मशागत करून पेरणी केली. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नसल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे. यामुळे शेतकरी पुरते हवालदिल व पोरके झाले आहे.मागीलवर्षीच्या शेतमालाचा मोबदलासुद्धा अनेकांना मिळाला नाही. कर्जमाफीही पदरी पडली नाही. त्यात कोरोनाचे संकट ओढवले. अशा चौफेर संकटांमुळे शेतकरी त्रस्त आहे. त्यात आता पेरलेले उगवलेच नसल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. आधीच बँकेत कर्ज मागायला चकरा माराव्या लागतात. कर्जमाफीचे घोडेसुद्धा अडकून आहे. आता सावकाराकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय नाही. लोकप्रतिनिधीसुद्धा या गंभीर समस्येकडे लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कुणाकडे मदत मागावी, असा प्रश्न आहे.अंकुरलेल्या पिकांचे नुकसानगेल्या आठवड्यात तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. यात बेलोरा, करमना, दत्तापूर शिवारातील कापूस व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले. करमना परिसरात गारपीट झाल्याने कपाशीच्या झाडांचे शेंडे तुटून पडले. पाने गळून गेली. काही ठिकाणी जमीन खरडून गेली. तरीही शेतात कुणी पंचनामा करून कृषी अधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला नाही. या समस्येकडे सरकारने वेळीच आणि गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. बोगस बियाणे विक्री करणारे कृषी केंद्र व कंपन्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती