शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतेय, सावधगिरी हाच पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST

लॉकडाऊनमुळे सर्व काही ठप्प आहेत. हाताला कामच नसल्याने कुटुंबाची उपजीविका चालवायची कशी याचा पेच निर्माण झाला आहे. सेवाभावी संस्थांनी काही दिवस गोरगरिबांना जगविले. एकीकडे रोजगार नाही आणि दुसरीकडे बेरोजगारांची संख्या वाढते आहे. रोजगाराच्या निमित्ताने जिल्ह्याबाहेर गेलेले हजारो लोक गावात परतले.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम : बेरोजगारी वाढली, झटपट कमाईवर जोर, पोलिसांकडून हवी प्रतिबंधात्मक उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना व लॉकडाऊनमुळे गेले दोन महिने उद्योग-व्यवसाय ठप्प आहेत. त्यातच बाहेर जिल्ह्यातून आलेल्यांंची भर पडली. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला. उपजीविका चालविण्यासाठी बेरोजगारांचे पाय आता गुन्हेगारीकडे वळू लागले आहे. त्यांना पोलिसांनी आधीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करून रोखणे अपेक्षित आहे.लॉकडाऊनमुळे सर्व काही ठप्प आहेत. हाताला कामच नसल्याने कुटुंबाची उपजीविका चालवायची कशी याचा पेच निर्माण झाला आहे. सेवाभावी संस्थांनी काही दिवस गोरगरिबांना जगविले. एकीकडे रोजगार नाही आणि दुसरीकडे बेरोजगारांची संख्या वाढते आहे. रोजगाराच्या निमित्ताने जिल्ह्याबाहेर गेलेले हजारो लोक गावात परतले. त्यामुळे रोजगाराची आणखीच मारामार होताना दिसते. कुटुंब जगवायचे आहे, पण हाताला काम नाही अशा स्थितीत काहींच्या मनात ‘झटपट कमाई’ देणारे गुन्हेगारीचे विचार फिरु लागले. काहींनी या विचारांनुसार अंमलबजावणीही सुरू केली. त्यातूनच गेल्या काही दिवसात प्रॉपर्टी आणि शरीरासंबंधीचे गुन्हे वाढल्याचे दिसून येते. चोरी, घरफोडी, मंगळसूत्र चोरी, वाटमारी, वाहन चोरी, मारहाण या सारखे गुन्हे घडत आहे. बेरोजगारीमुळे वाम मार्गाला लागण्याचे प्रकारही घडण्याची भीती आहे. नागपुरात हा प्रकार उघड झाला. औरंगाबादमध्ये बहीण-भावाचा खून करून दीड किलो सोने लुटले गेले. अशाच पद्धतीने गेल्या काही दिवसात अनेक घटना राज्यात घडल्या आहेत.गुन्हा घडल्यानंतर सहसा पोलिसांची भूमिका सुरू होते. परंतु लॉकडाऊनमुळे वाढलेल्या या बेरोजगारीच्या संकटात पोलिसांनी ‘गुन्हा घडूच नये’ या दृष्टीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अपेक्षित आहे. पोलिसांनी सतर्क राहून व गुन्हेगारांवर वचक निर्माण करून जनतेच्या मनातील वाढत्या गुन्हेगारीची भीती दूर करावी, अशी मागणीही होत आहे.काही भागात रोजगार आहेत, तर कोरोनाच्या भीतीने तेथे मजूर नाहीत आणि गावखेड्यांमध्ये मजूर आहेत तर तेथे रोजगार नाहीत. अशा विसंगत स्थितीमुळे भविष्यात गुन्हेगारी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. मात्र पोलिसांनी वेळीच उपाययोजना करून ही संभाव्य वाढती गुन्हेगारी थांबविणे कठीण नाही. त्यासाठी पोलिसांच्या व्यापक नियोजन, उपाययोजना व त्याच्या अंमलबजावणीची तेवढी गरज आहे.पोलिसांवर अवलंबून राहू नका, स्वत:च स्वत:ची सुरक्षा सांभाळालॉकडाऊनचा परिणाम पुढे किमान वर्ष-दोन वर्षे राहील असा अंदाज आहे. ते पाहता भविष्यात गुन्हेगारीचे प्रमाण आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत प्रत्येक नागरिकाने कायम सावध राहणे हाच पर्याय आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अगदीच तुटपुंजी आहे. त्यामुळे आपल्या सुरक्षेसाठी पोलिसांवर अवलंबून न राहता स्वत:च स्वत:ची सुरक्षा करणे, वेळोवेळी खबरदारी घेणे हाच मार्ग स्पष्ट दिसतो आहे. सायबर गुन्हेगारांकडून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सातत्याने घडत आहे. नागरिकांनी सावध राहून आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्वत:च्या मालमत्तेचे स्वत:च रक्षण करणे गरजेचे झाले आहे. बँक-ऑनलाईन व्यवहाराची गोपनीयता महत्वाची ठरते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी