शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

‘सीआयडी’कडील गुन्हे अकोला-वाशिमकडे वर्ग

By admin | Updated: August 26, 2016 02:23 IST

अमरावती विभागात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडील (सीआयडी) गुन्ह्यांचा प्रचंड असमतोल निर्माण झाला आहे.

असमतोल : एक पोलीस निरीक्षक आणि दहा गुन्ह्यांचा तपासयवतमाळ : अमरावती विभागात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडील (सीआयडी) गुन्ह्यांचा प्रचंड असमतोल निर्माण झाला आहे. कुठे दोन तर कुठे १२ गुन्हे तपासाला आहेत. हा समतोल साधण्यासाठी आता यवतमाळ सीआयडीकडील गुन्हे अकोला आणि वाशिम सीआयडीकडे वर्ग करण्यात आले आहे. यवतमाळ सीआयडीला गेली कित्येक वर्षे पूर्णवेळ तपास अधिकारी उपलब्ध झाले नाही. कधी वाशिम तर कधी अमरावतीच्या अधिकाऱ्याकडे अतिरिक्त प्रभार राहिला. तपासाला अधिकारीच नसल्याने सीआयडीकडील गुन्हे थंडबस्त्यात राहिले. सध्याही सीआयडीकडे डझनावर गुन्हे तपासासाठी दिलेले आहेत. काही महिन्यांपूर्वीच येथे पुण्यावरुन सोमेश्वर खाटपे हे पोलीस निरीक्षक रुजू झाले. त्यांचीही बरीच नोकरी ट्रॅफिक आणि साईड ब्रँचला झाल्याने सीआयडी सारख्या शाखेत आव्हानात्मक व गंभीर गुन्ह्यांचा तपास करताना त्यांची कसोटी लागते आहे. सीआयडीचा अमरावती विभागातील कारभार पुण्यापर्यंत गाजतो आहे. या विभागात गुन्ह्यांच्या तपासात असमतोल निर्माण झाला आहे. अकोला, बुलडाणा, वाशिमकडे अवघे दोन ते तीन गुन्हे तपासाला आहेत. त्या तुलनेत यवतमाळ सीआयडीकडील गुन्ह्यांचा आकडा डझनावर पोहोचला आहे. सहा ते आठ वर्षांपासूनची प्रकरणे यवतमाळ सीआयडीला आतापर्यंत मार्गी लावता आलेली नाही. ‘तपासाला पूर्ण वेळ अधिकारीच नाही’ आणि यंत्रणेची बहुतांश एनर्जी ही अमरावती-नागपूर-पुण्यातील बैठका तसेच उच्च न्यायालयातील तारखांवरील हजेरीतच खर्च होत असल्याचे कारण त्यासाठी सांगितले जाते. डझनांवर गुन्ह्यांचा तपास वेगाने पूर्ण करून दोषारोपपत्र दाखल करणे यवतमाळ सीआयडीच्या आवाक्याबाहेरचे असल्याचे पाहून अखेर येथील काही गुन्हे सीआयडीच्या वाशिम व अकोला युनिटकडे वर्ग करण्यात आले आहे. पहायला हे गुन्हे वर्ग झाले असले तरी त्याच्या कागदपत्रांची ने-आण आणि रेकॉर्ड मेंटेनन्ससाठी यवतमाळ सीआयडीचीच यंत्रणा वापरली जात असल्याने ‘गुन्हे वर्ग करुन उपयोग काय’ अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहे. आजही यवतमाळ सीआयडीकडे सुमारे दहा गुन्ह्यांचा तपास आहे. यातील काही गुन्हे जुने आहेत. अलिकडेच भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेटमधील अडीच कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा सीआयडीकडे तपासाला देण्यात आला आहे. सहसा आर्थिक गुन्हे सीआयडीच्या पुणे मुख्यालयाकडे वर्ग केले जातात. परंतु तेथेही या गुन्ह्यांची प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामुळेच ‘बीएचआर’च्या गुन्ह्याचा तपास यवतमाळ सीआयडीतच करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. (जिल्हा प्रतिनिधी) ३८ ट्रक बोगस पासिंगचा गुन्हा तपासातच !यवतमाळच्या डेप्युटी आरटीओ कार्यालयाने सन २००६ मध्ये ३८ ट्रकचे बोगस पासिंग केले होते. तेव्हापासून या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे आहे. परंतु गेल्या आठ वर्षात सीआयडीला त्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर करता आलेले नाही. सीआयडीने तयार केलेल्या दोषारोपपत्रात पुणे मुख्यालयातून अनेक त्रुट्या काढण्यात आल्या होत्या. सीआयडीने या ट्रक पासिंग घोटाळ्यात चक्क आरटीओच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाच ‘क्लिनचीट’ दिली होती. ‘लोकमत’ने या गंभीर प्रकारावर ‘प्रकाशझोत’ टाकल्यानंतर सीआयडीने या दोषारोपपत्रातील त्रुट्या दूर करण्याचे काम हाती घेतले. बोगस ट्रक पासिंगचा हाच गुन्हा आता वाशिमकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे.