शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

दहन, दफनभूमी नसल्याने अंत्यसंस्कार संकटातमृत्यूनंतर यातना : शेड आणि सौंदर्यीकरण राहिले कागदावरच, गावकऱ्यांमध्ये नाराजी

By admin | Updated: September 19, 2016 01:13 IST

जिल्ह्यातील तब्बल ३९४ ग्रामपंचायतींमध्ये दहनभूमी, दफनभूमी नसल्याने मृतदेहांवरील अंत्यसस्कार उघड्यावरच उरकले जात आहे.

यवतमाळ : जिल्ह्यातील तब्बल ३९४ ग्रामपंचायतींमध्ये दहनभूमी, दफनभूमी नसल्याने मृतदेहांवरील अंत्यसस्कार उघड्यावरच उरकले जात आहे. एकप्रकारे मृत्यूनंतरही या गावातील मृतदेहांना यातनाच सहन कराव्या लागत आहे.जिल्ह्यात सध्या १२0३ ग्रामपंचायती आहे. यापूर्वी १२0५ ग्रामपंचायती होत्या. मात्र गेल्या काही वर्षांत काही ग्रामपंचायतींच्या ठिकाणी नगरपंचायत अस्तित्वात आली. काही ग्रामपंचायती लगतच्या नगरपरिषदेत समाविष्ट झाल्या. त्यामुळे ग्रामपंचायतींची संख्या कमी झाली. तथापि काही गटग्रामपंचायतींचे विभाजन होऊन काही ठिकाणी नवीन ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या. त्यामुळे पूर्वीच्या ग्रामपंचायत संख्येत आता केवळ दोनची घट होऊन जिल्ह्यात सध्या १२0३ ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत.प्रत्येक गावाला दहन अथवा दफन भूमी असते. याच ठिकाणी गावातील मृतदेहांवर अंतिम संस्कार केले जातात. अनेक ठिकाणी आत्तापर्यंत उघड्यावरच अंत्यसंस्कार केले जात होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून शासनाने दहन, दफन भूमिसाठी निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून स्मशानभूमि शेड, स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण आदी कामे सुरू झाली. तथापि काही ठिकाणी मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचे प्रकारही झाले. स्मशानभूमी शेड, सौंदर्यीकरण कागदावरच राहिले. त्याचा निधी मात्र फस्त झाला. मृत्यूनंतर प्रत्येक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केला जातो. हिंदू धर्मीय मृताचा अंतिम संस्कार करताना मृतदेहाला दहन करतात. मुस्लीम बांधव अंत्यविधीत मृतदेहाला दफन करतात. त्यासाठी प्रत्येक गावात एक ठरावीक जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र या पवित्र अंतिम संस्कारासाठीही तब्बल ३९४ गावांमध्ये शेडच नाही. परिणामी तेथील मृतदेहांवर उघड्यावरच अंतिम संस्कार करावे लागतात. उन, पाऊस, थंडी, वारा आणि चारही ॠतूत उघड्यावरच अंतिम संस्कार उरकले जातात. अनेक ठिकाणी तर अंत्ययात्रेत सहभागी ग्रामस्थांना उभे राहण्यासाठीही साधी जागा नसते. दुसरीकडे मृत्यूनंतरही मृतदेहांना यातना सोसाव्या लागतात. काही ठिकाणी पावसाळ्यात अंत्यसंस्कारच संकटात सापडतात. (शहर प्रतिनिधी)शेड बांधकाम निधीच्या चौकशीची गरजशासनाने अनेक ग्रामपंचायतींना स्मशानभूमी शेडसाठी निधी उपलब्ध करून दिला. मात्र अनेक ठिकाणी शेडच उभे झाले नाही. काही ठिकाणी अर्धवट शेड उभे झाले. निधी मात्र पूर्णपणे उचलला गेला. त्यामुळे निधी खर्च होऊनही स्मशानभूमी अर्धवटच राहिली. जिल्हा परिषदेने शेडसाठी निधी उपलब्ध करून दिलेल्या, अशा सर्व ग्रामपंचायतींमधील शेडची पाहणी करण्याची गरज आहे. शेड अर्धवट, अपूर्ण असल्यास संबंधितांना जाब विचारण्याची गरज आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी काही जिल्हा परिषद सदस्यांनीच दुसऱ्याच्या नावे ही कामे केल्याचे सांगितले जात आहे.