शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

दहन, दफनभूमी नसल्याने अंत्यसंस्कार संकटातमृत्यूनंतर यातना : शेड आणि सौंदर्यीकरण राहिले कागदावरच, गावकऱ्यांमध्ये नाराजी

By admin | Updated: September 19, 2016 01:13 IST

जिल्ह्यातील तब्बल ३९४ ग्रामपंचायतींमध्ये दहनभूमी, दफनभूमी नसल्याने मृतदेहांवरील अंत्यसस्कार उघड्यावरच उरकले जात आहे.

यवतमाळ : जिल्ह्यातील तब्बल ३९४ ग्रामपंचायतींमध्ये दहनभूमी, दफनभूमी नसल्याने मृतदेहांवरील अंत्यसस्कार उघड्यावरच उरकले जात आहे. एकप्रकारे मृत्यूनंतरही या गावातील मृतदेहांना यातनाच सहन कराव्या लागत आहे.जिल्ह्यात सध्या १२0३ ग्रामपंचायती आहे. यापूर्वी १२0५ ग्रामपंचायती होत्या. मात्र गेल्या काही वर्षांत काही ग्रामपंचायतींच्या ठिकाणी नगरपंचायत अस्तित्वात आली. काही ग्रामपंचायती लगतच्या नगरपरिषदेत समाविष्ट झाल्या. त्यामुळे ग्रामपंचायतींची संख्या कमी झाली. तथापि काही गटग्रामपंचायतींचे विभाजन होऊन काही ठिकाणी नवीन ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या. त्यामुळे पूर्वीच्या ग्रामपंचायत संख्येत आता केवळ दोनची घट होऊन जिल्ह्यात सध्या १२0३ ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत.प्रत्येक गावाला दहन अथवा दफन भूमी असते. याच ठिकाणी गावातील मृतदेहांवर अंतिम संस्कार केले जातात. अनेक ठिकाणी आत्तापर्यंत उघड्यावरच अंत्यसंस्कार केले जात होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून शासनाने दहन, दफन भूमिसाठी निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून स्मशानभूमि शेड, स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण आदी कामे सुरू झाली. तथापि काही ठिकाणी मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचे प्रकारही झाले. स्मशानभूमी शेड, सौंदर्यीकरण कागदावरच राहिले. त्याचा निधी मात्र फस्त झाला. मृत्यूनंतर प्रत्येक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केला जातो. हिंदू धर्मीय मृताचा अंतिम संस्कार करताना मृतदेहाला दहन करतात. मुस्लीम बांधव अंत्यविधीत मृतदेहाला दफन करतात. त्यासाठी प्रत्येक गावात एक ठरावीक जागा निश्चित करण्यात आली आहे. मात्र या पवित्र अंतिम संस्कारासाठीही तब्बल ३९४ गावांमध्ये शेडच नाही. परिणामी तेथील मृतदेहांवर उघड्यावरच अंतिम संस्कार करावे लागतात. उन, पाऊस, थंडी, वारा आणि चारही ॠतूत उघड्यावरच अंतिम संस्कार उरकले जातात. अनेक ठिकाणी तर अंत्ययात्रेत सहभागी ग्रामस्थांना उभे राहण्यासाठीही साधी जागा नसते. दुसरीकडे मृत्यूनंतरही मृतदेहांना यातना सोसाव्या लागतात. काही ठिकाणी पावसाळ्यात अंत्यसंस्कारच संकटात सापडतात. (शहर प्रतिनिधी)शेड बांधकाम निधीच्या चौकशीची गरजशासनाने अनेक ग्रामपंचायतींना स्मशानभूमी शेडसाठी निधी उपलब्ध करून दिला. मात्र अनेक ठिकाणी शेडच उभे झाले नाही. काही ठिकाणी अर्धवट शेड उभे झाले. निधी मात्र पूर्णपणे उचलला गेला. त्यामुळे निधी खर्च होऊनही स्मशानभूमी अर्धवटच राहिली. जिल्हा परिषदेने शेडसाठी निधी उपलब्ध करून दिलेल्या, अशा सर्व ग्रामपंचायतींमधील शेडची पाहणी करण्याची गरज आहे. शेड अर्धवट, अपूर्ण असल्यास संबंधितांना जाब विचारण्याची गरज आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी काही जिल्हा परिषद सदस्यांनीच दुसऱ्याच्या नावे ही कामे केल्याचे सांगितले जात आहे.