शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सिंचनावरून खडाजंगी

By admin | Updated: June 15, 2015 02:30 IST

जिल्ह्यातील एकाही सिंचन प्रकल्पाचे पाणी टेलपर्यंत पोहोचत नाही. शासकीय अहवालात २२ टक्के सिंचन होत असले तरी प्रत्यक्षात १२ टक्क्यापेक्षा अधिक सिंचन होत नाही.

‘डीपीसी’ : जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती नेमण्याची सूचना यवतमाळ : जिल्ह्यातील एकाही सिंचन प्रकल्पाचे पाणी टेलपर्यंत पोहोचत नाही. शासकीय अहवालात २२ टक्के सिंचन होत असले तरी प्रत्यक्षात १२ टक्क्यापेक्षा अधिक सिंचन होत नाही. पाटचऱ्यांच्या कामावरील कोट्यवधींचा खर्च व्यर्थ जातो, यासह सूक्ष्म सिंचनाचे मिळणारे अनुदान, मत्स्यबीज निर्मिती केंद्राचे रखडलेले काम आदी विषयांवर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली. या प्रकरणाचे वास्तव जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत चौकशी समिती नेमण्याची सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवनात रविवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीला पालकमंत्री संजय राठोड, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, खासदार भावना गवळी, खासदार राजीव सातव, आमदार माणिकराव ठाकरे, आमदार संदीप बाजोरिया, आमदार ख्वाजा बेग, आमदार मनोहरराव नाईक, आमदार मदन येरावार, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार राजू तोडसाम, आमदार डॉ.प्रा. अशोक उईके, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे सदस्य खडसे, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, नियोजनचे उपायुक्त काळे उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध विषयांवर आढावा घेण्यात आला. बैठकीत प्राधान्याने पहिला मुद्दा आला तो पाणी वापर संस्थेचा. जिल्ह्यात ३०८ पाणी वापर संस्था आहे. या पैकी ८५ पाणी वापर संस्था बंद आहे. ४५ अवसायनात निघाल्या आहेत. १५४ पैकी १४ संस्था पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरित झाल्या आहेत. या संस्था सक्षम करण्यासाठी काय प्रयत्न झाले, असा प्रश्न सभागृहात विचारण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावर खासदार भावना गवळी यांनी असमाधान व्यक्त केले. (शहर वार्ताहर)