शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

एसटीच्या अधिकाऱ्यांकडून न्यायालयाचा अवमान

By admin | Updated: February 4, 2015 23:22 IST

कामगारांच्या बदली प्रकरणात औद्योगिक न्यायालयाने दिलेला आदेश एसटीच्या विभागीय कार्यालयाकडून पायदळी तुडविला जात आहे. कामगारांना रुजू करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे.

यवतमाळ : कामगारांच्या बदली प्रकरणात औद्योगिक न्यायालयाने दिलेला आदेश एसटीच्या विभागीय कार्यालयाकडून पायदळी तुडविला जात आहे. कामगारांना रुजू करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. या कामगारांचे गेली तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने त्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. सुभाष राजाराम श्रीवास, अरुण नारायण सानप, विलास बबनराव परडखे, वासुदेव कवडूजी चांदेकर आणि आरती शंकरराव गवळी या यवतमाळ आगारातील वाहकांची बदली करण्यात आली. ही बदली नियमबाह्य असल्याचे सांगत त्यांनी विभाग नियंत्रकांकडे निवेदन, प्रसंगी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र बदली रद्द करण्यात आली नाही. यामुळे त्यांनी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली. या ठिकाणी त्यांच्या बाजूने निर्णय देण्यात आला. न्यायालयाच्या आदेशावरून सदर कामगार रुजू होण्यासाठी कार्यालयात गेले. मात्र त्यांना विविध कारणे सांगत रुजू करून घेण्यात आले नाही. त्यामुळे या कामगारांनी अवमान याचिका दाखल केली. यानंतरही त्यांना रुजू करून घेण्यात आले नाही. गेली तीन महिन्यांपासून या कामगारांचे वेतन झालेले नाही. हा प्रकार जाणिवपूर्वक त्रास देण्याचा असल्याचा आरोप या कामगारांनी केला आहे. औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार पूर्वपदावर रुजू करून घेत गेली तीन महिन्यांचे वेतन मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर काय निर्णय होतो, याकडे एसटी कामगारांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)