शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
6
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
7
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
8
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
9
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
10
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
11
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
12
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
13
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
14
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
15
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
16
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
18
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
19
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
20
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या अधिकाऱ्यांकडून न्यायालयाचा अवमान

By admin | Updated: February 4, 2015 23:22 IST

कामगारांच्या बदली प्रकरणात औद्योगिक न्यायालयाने दिलेला आदेश एसटीच्या विभागीय कार्यालयाकडून पायदळी तुडविला जात आहे. कामगारांना रुजू करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे.

यवतमाळ : कामगारांच्या बदली प्रकरणात औद्योगिक न्यायालयाने दिलेला आदेश एसटीच्या विभागीय कार्यालयाकडून पायदळी तुडविला जात आहे. कामगारांना रुजू करून घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. या कामगारांचे गेली तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने त्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. सुभाष राजाराम श्रीवास, अरुण नारायण सानप, विलास बबनराव परडखे, वासुदेव कवडूजी चांदेकर आणि आरती शंकरराव गवळी या यवतमाळ आगारातील वाहकांची बदली करण्यात आली. ही बदली नियमबाह्य असल्याचे सांगत त्यांनी विभाग नियंत्रकांकडे निवेदन, प्रसंगी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र बदली रद्द करण्यात आली नाही. यामुळे त्यांनी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली. या ठिकाणी त्यांच्या बाजूने निर्णय देण्यात आला. न्यायालयाच्या आदेशावरून सदर कामगार रुजू होण्यासाठी कार्यालयात गेले. मात्र त्यांना विविध कारणे सांगत रुजू करून घेण्यात आले नाही. त्यामुळे या कामगारांनी अवमान याचिका दाखल केली. यानंतरही त्यांना रुजू करून घेण्यात आले नाही. गेली तीन महिन्यांपासून या कामगारांचे वेतन झालेले नाही. हा प्रकार जाणिवपूर्वक त्रास देण्याचा असल्याचा आरोप या कामगारांनी केला आहे. औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानुसार पूर्वपदावर रुजू करून घेत गेली तीन महिन्यांचे वेतन मिळावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर काय निर्णय होतो, याकडे एसटी कामगारांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)