शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
5
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
6
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
7
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
11
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
13
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
14
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
15
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
16
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
17
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
18
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
19
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
20
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच

जरूर येथील शेततळे ‘जीवनदायी’

By admin | Updated: February 20, 2016 00:15 IST

कोणतेही काम करताना, योजना राबविताना ती योग्यरीत्या राबविली आणि मनापासून केली, तर निश्चितच फलदायी ठरते. ...

घाटंजी : कोणतेही काम करताना, योजना राबविताना ती योग्यरीत्या राबविली आणि मनापासून केली, तर निश्चितच फलदायी ठरते. याचे जिवंत उदाहरण म्हणजे, जरूर येथील शेततळे आहे. आजही हे शेततळे अर्धेअधिक भरलेले आहे. मे महिन्यातही यात पाणी असते. एकीकडे उन्हाळा लागण्यापूर्वीच नदी-नाले कोरडे पडतात. विहिरीही आटतात. इतर ठिकाणचे शेततळे केव्हाचेच कोरडे पडले आहे. पण, जरूरच्या शेततळ्याचे गुपितच सारासार विचार करून योजनाबद्धरीतीने तयार करण्यात आले. मोरेश्वर वातीले या शेतकऱ्याच्या कल्पक बुद्धितून त्यांनी त्यांच्या शेतात हे शेततळे तयार केले आहे. कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत १०० टक्के अनुदानावर ८२ हजार २४० रुपये खर्च करून ३० फूट लांब, ३० फूट रूंद व १५ फूट उतार खोली असे त्याचे बांधकाम आहे. हे शेततळे टेकडीच्या पायथ्याशी आहे. टेकडीवरील पावसाचे पाणी सरळ या शेततळ्यात साठविले जाते आणि ते मे महिन्यापर्यंत पुरते. त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना गुरांसाठी पाणी, फवारणीसाठी पाणी उपलब्ध होते. या पाण्यावर शेतमालक कापूस, तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांना पाणी देऊन आपल्या उत्पन्नात वाढ करत आहे. योजना आली म्हणून ती राबविली, पैसा आला, खर्च केला, असे न करता जीव ओतून भविष्याचा वेध घेत काम केले तर ती योजना, तो पैसा याचा निश्चितच फायदा होतो, असे मत मोरेश्वर वातीले यांनी व्यक्त केले. (तालुका प्रतिनिधी)