शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कपाशी, सोयाबिनवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: September 11, 2014 23:52 IST

सुरूवातीला कमी पावसात शेतकऱ्यांनी कपाशीची पिके जगविली. मात्र त्यानंतर अतिपाऊस आणि फुलकिडे, मर रोगासह आता कपाशीवर लाल्या रोगाने, तर सोयाबिनवर चक्रीभुंग्याने आक्रमण केल्याने हाता-तोंडाशी

वणी : सुरूवातीला कमी पावसात शेतकऱ्यांनी कपाशीची पिके जगविली. मात्र त्यानंतर अतिपाऊस आणि फुलकिडे, मर रोगासह आता कपाशीवर लाल्या रोगाने, तर सोयाबिनवर चक्रीभुंग्याने आक्रमण केल्याने हाता-तोंडाशी आलेले पिकही हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. परिणामी शेतकरी देधोधडीला लागण्याची शक्यता बळावली आहे.विदर्भातील नगदी पीक म्हणून कापसाला ओळखले जाते़ परंतु गेल्या तीन-चार वर्षांपासून कपाशीवर केलेला खर्चही शेतकऱ्यांना परवडेनासा झाला आहे़ तथापि शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने आणि शेतीशिवाय दुसरा पर्यायच नसल्याने नाईलाजाने विदर्भातील शेतकरी जादा प्रमाणात कापूस पिकांची लागवड करीत असतात़ त्यातच कापसाला हमी भाव कमी मिळत असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे़ यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या असून या जिल्ह्याला शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून ओळखले जात आहे़यंदा खरीप हंगामात निसर्गाने शेतकऱ्यांचा अंतच पाहिला़ जून-जुलै महिन्यात झालेल्या अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पिके उगवलीच नव्हती़ त्यानंतर शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत दुबार, तिबार पेरणी केली़ परंतु पावसाने १५ ते २० दिवस दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडले. त्यामुळे त्यांना कर्जही घ्यावे लागले़ तरीही शेतकऱ्यांनी पिके जगवली़ आता कपाशीला फुलेही लागली. तथापि गेल्या सप्ताहात तालुक्यात संततधार पाऊस प्झाला. त्यामुळे जमिनीतील ओलावा हटत नसल्यामुळे कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे़ यामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे़यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाअभावी तब्बल २८ हजार ९३३ हेक्टवर कपाशीची दुबार-तिबार पेरणी करावी लागली. सोबतच २३५ हेक्टरवर सोयाबीन, दोन हजार २५५ हेक्टरवर तूर, तर ७३ हेक्टरवर ज्वारीची दुबार पेरणी करावी लागली. तालुक्यात ४१ हजार ४९४ हेक्टरवर कपाशी, सात हजार ५९ हेक्टरवर सोयाबीन, पाच हजार ४४६ हेक्टरवर तूर, तर ५७८ हेक्टरवर ज्वारीची पेरणी पूर्ण झाली.आता कपाशीवरील लाल्या रोगाचा प्रतिबंध कसा करावा, या विवंचनेत शेतकरी सापडले आहे़ बँकाही पुन्हा कर्ज देण्यास नकार देत असल्याने महागडी औषधी घेऊन झाडावर फवारणी कशी करावावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे़ शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)