शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

कपाशी, सोयाबिनवर कीड, रोगांचा प्रादुर्भाव

By admin | Updated: September 11, 2014 23:52 IST

सुरूवातीला कमी पावसात शेतकऱ्यांनी कपाशीची पिके जगविली. मात्र त्यानंतर अतिपाऊस आणि फुलकिडे, मर रोगासह आता कपाशीवर लाल्या रोगाने, तर सोयाबिनवर चक्रीभुंग्याने आक्रमण केल्याने हाता-तोंडाशी

वणी : सुरूवातीला कमी पावसात शेतकऱ्यांनी कपाशीची पिके जगविली. मात्र त्यानंतर अतिपाऊस आणि फुलकिडे, मर रोगासह आता कपाशीवर लाल्या रोगाने, तर सोयाबिनवर चक्रीभुंग्याने आक्रमण केल्याने हाता-तोंडाशी आलेले पिकही हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. परिणामी शेतकरी देधोधडीला लागण्याची शक्यता बळावली आहे.विदर्भातील नगदी पीक म्हणून कापसाला ओळखले जाते़ परंतु गेल्या तीन-चार वर्षांपासून कपाशीवर केलेला खर्चही शेतकऱ्यांना परवडेनासा झाला आहे़ तथापि शेती हाच मुख्य व्यवसाय असल्याने आणि शेतीशिवाय दुसरा पर्यायच नसल्याने नाईलाजाने विदर्भातील शेतकरी जादा प्रमाणात कापूस पिकांची लागवड करीत असतात़ त्यातच कापसाला हमी भाव कमी मिळत असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे़ यवतमाळ जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या असून या जिल्ह्याला शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून ओळखले जात आहे़यंदा खरीप हंगामात निसर्गाने शेतकऱ्यांचा अंतच पाहिला़ जून-जुलै महिन्यात झालेल्या अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पिके उगवलीच नव्हती़ त्यानंतर शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत दुबार, तिबार पेरणी केली़ परंतु पावसाने १५ ते २० दिवस दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडले. त्यामुळे त्यांना कर्जही घ्यावे लागले़ तरीही शेतकऱ्यांनी पिके जगवली़ आता कपाशीला फुलेही लागली. तथापि गेल्या सप्ताहात तालुक्यात संततधार पाऊस प्झाला. त्यामुळे जमिनीतील ओलावा हटत नसल्यामुळे कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे़ यामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे़यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसाअभावी तब्बल २८ हजार ९३३ हेक्टवर कपाशीची दुबार-तिबार पेरणी करावी लागली. सोबतच २३५ हेक्टरवर सोयाबीन, दोन हजार २५५ हेक्टरवर तूर, तर ७३ हेक्टरवर ज्वारीची दुबार पेरणी करावी लागली. तालुक्यात ४१ हजार ४९४ हेक्टरवर कपाशी, सात हजार ५९ हेक्टरवर सोयाबीन, पाच हजार ४४६ हेक्टरवर तूर, तर ५७८ हेक्टरवर ज्वारीची पेरणी पूर्ण झाली.आता कपाशीवरील लाल्या रोगाचा प्रतिबंध कसा करावा, या विवंचनेत शेतकरी सापडले आहे़ बँकाही पुन्हा कर्ज देण्यास नकार देत असल्याने महागडी औषधी घेऊन झाडावर फवारणी कशी करावावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे़ शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)