शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

कापूस उत्पादन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 22:55 IST

यावर्षी मान्सूनचे आगमन २० दिवस लांबले. यामुळे खरिप लागवडीचा कालावधी खोळंबला. यातून कृषी उत्पादनात मोठी घट नोंदविल्या गेली. प्रत्येक पिकाच्या लागवडीसाठी ठराविक कालावधी असतो. या कालावधीच्या पुढे ठराविक पिकांची लागवड झाल्यास त्याचा उत्पादनाला फटका बसतो. त्याचाच प्रत्यय २०१९ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत आहे.

ठळक मुद्देदहा लाख क्ंिवटलची तफावत : सोयाबीन, ज्वारीला पावसाचा तडाखा

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्ग प्रकोपाने शेतशिवाराची हालत अतिशय खराब झाली. कृषी उत्पादनात दरवर्षी मोठ्या प्रमाणात घट नोंदविली जात आहे. निसर्ग प्रकोपाचा सर्वाधिक फटका परंपरागत पिकांना बसला आहे. कापसाचे उत्पादन दहा लाख क्विंटले घटले आहे. तर सोयाबीनच्या उत्पादनातही पाच लाख क्विंटलची घट नोंदविण्यात आली आहे.यावर्षी मान्सूनचे आगमन २० दिवस लांबले. यामुळे खरिप लागवडीचा कालावधी खोळंबला. यातून कृषी उत्पादनात मोठी घट नोंदविल्या गेली. प्रत्येक पिकाच्या लागवडीसाठी ठराविक कालावधी असतो. या कालावधीच्या पुढे ठराविक पिकांची लागवड झाल्यास त्याचा उत्पादनाला फटका बसतो. त्याचाच प्रत्यय २०१९ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत आहे.ऋतुचक्र प्रभावीत झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट नोंदविल्या गेली आहे. कीडींचे आक्रमण, अपुरा पाऊस आणि पावसाचा खंड यातून कोरडवाहू क्षेत्र पूर्णत: कोलमडले आहे. याचा सर्वाधिक फटका कापसाला बसला आहे. एक ते दोन वेच्यातच कोरडवाहू क्षेत्रातील कापसाची उलंगवाडी झाली आहे. सध्या बाजारात केवळ ५ लाख १९ हजार क्विंटल कापूस विक्रीला आला आहे. गतवर्षी या सुमारास १५ लाख क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी झाली आहे. संपूर्ण हंगामात ही खरेदी १८ लाख क्विंटलच्या घरात नोंदविण्यात आली आहे. त्या तुलनेत २०१९ मध्ये १० लाख क्विंटल कापसाची घट नोंदविण्यात आली.सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद या पिकांची अवस्था अशीच आहे. २०१८ मध्ये ९ लाख ७४ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली. आठ हजार ३८६ क्विंटल ज्वारीची खरेदी झाली. ८ हजार १४१ क्विटल उडीद आणि दोन हजार ५०० क्विंटल मुगाची खरेदी झाली आहे. २०१९ मध्ये हे उत्पादन ३० टक्क्याने घटले आहे. यामुळे बाजार समित्यामधील आवक मंदावली आहे.निसर्ग प्रकोपाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यानंतरही कृषी उत्पादनाच्या दरात कुठलीही दरवाढ नोंदविली गेली नाही. याला कांदा अपवाद राहिला आहे. कापसाचे दर २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये हजार रूपयाने कमी आहेत. तर सोयाबीनच्या दरात थोडी वाढ नोंदविण्यात आली आहे. खर्चाच्या तुलनेत ही दरवाढ नाममात्र आहे. यामुळे कृषी उत्पादनावर अवलंबून असणारे कुटुंब अडचणीत सापडले आहेत.शेतीच्या पुनरुज्जीवनाची गरजशेती व्यवसायाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पायाभूत सुविधा पुरविण्याची आवश्यकता आहे. यासोबतच खत, बियाणे, औषधांवर अनुदान देण्याची आवश्यकता आहे. खर्चावर आधारीत दर शेतमालास मिळण्याची गरज आहे. तरच शेतीचे पुनरुज्जीवन शक्य होणार आहे.

टॅग्स :cottonकापूस