शहरं
Join us  
Trending Stories
1
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
2
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला केंद्राचा हिरवा कंदील; प्रवास वेळेत 17 तासांची बचत होणार
3
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
4
Municipal Election 2026: कल्याण, पनवेल, धुळ्यात भाजपाचा 'विजयारंभ'! सहा उमेदवार बनले बिनविरोध 'नगसेवक'
5
गुंतवणूक सोन्यात की शेअर बाजारात? ३ लाखांच्या सोन्यावर पुढील वर्षी किती नफा मिळेल? सोपं गणित
6
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
7
नशीब असावं तर असं! राष्ट्रवादीतून भाजपात आल्या आणि २४ तासांत झाल्या नगरसेविका, धुळ्यात उज्वला भोसले बिनविरोध
8
कोट्यवधीची रोकड, सोने हिऱ्यांनी भरलेली बॅग अन् बरेच काही...; ED च्या हाती कुणाचं लागलं 'घबाड'?
9
'ऑपरेशन सिंदूर'वर लष्कर-ए-तैयबा प्रमुख हाफिज सईदचे मोठे वक्तव्य; म्हणाला- 'भारत पुढील 50 वर्षे...'
10
Happy New Year 2026 Wishes: नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Quotes, Messages, WhatsApp Status शेअर करत स्वागत करा नव्या वर्षाचं!
11
Nimesulide Banned: निमसुलाइड औषधावर सरकारनं घातली बंदी, किडनीसाठी अत्यंत धोकादायक!
12
मुंबई महापालिकेसाठी भाजपाची १३७ उमेदवारांची यादी जाहीर; किती अमराठी उमेदवारांना दिली संधी?
13
शिंदेसेनेचे स्वबळावर ७४ उमेदवार! महायुतीचे जागावाटप बारगळले; निवडणूक होणार चुरशीची
14
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं कमळ, भाजपाचे ३ नगरसेवक बिनविरोध 
15
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
16
धनंजय मुंडे यांना दिलासा! करुणा मुंडे यांची याचिका कोर्टाने फेटाळली, काय होतं प्रकरण?
17
भांडवलशाहीचा 'भीष्म पितामह' निवृत्त! दिवाळखोर कंपनीतून वॉरेन बफेंनी कसे उभारले अब्जावधींचे साम्राज्य?
18
अभिषेक बच्चनचं पत्नीसोबत 'न्यू इयर सेलिब्रेशन', चाहतीसोबत फोटो; ऐश्वर्याच्या सौंदर्यावर सगळेच फिदा
19
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
20
कानात ब्लूटूथ इयरफोन लावल्याने कॅन्सरचा मोठा धोका? एक्सपर्ट्सनी सांगितलं 'सत्य'
Daily Top 2Weekly Top 5

कापूस उत्पादन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 22:55 IST

यावर्षी मान्सूनचे आगमन २० दिवस लांबले. यामुळे खरिप लागवडीचा कालावधी खोळंबला. यातून कृषी उत्पादनात मोठी घट नोंदविल्या गेली. प्रत्येक पिकाच्या लागवडीसाठी ठराविक कालावधी असतो. या कालावधीच्या पुढे ठराविक पिकांची लागवड झाल्यास त्याचा उत्पादनाला फटका बसतो. त्याचाच प्रत्यय २०१९ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत आहे.

ठळक मुद्देदहा लाख क्ंिवटलची तफावत : सोयाबीन, ज्वारीला पावसाचा तडाखा

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : निसर्ग प्रकोपाने शेतशिवाराची हालत अतिशय खराब झाली. कृषी उत्पादनात दरवर्षी मोठ्या प्रमाणात घट नोंदविली जात आहे. निसर्ग प्रकोपाचा सर्वाधिक फटका परंपरागत पिकांना बसला आहे. कापसाचे उत्पादन दहा लाख क्विंटले घटले आहे. तर सोयाबीनच्या उत्पादनातही पाच लाख क्विंटलची घट नोंदविण्यात आली आहे.यावर्षी मान्सूनचे आगमन २० दिवस लांबले. यामुळे खरिप लागवडीचा कालावधी खोळंबला. यातून कृषी उत्पादनात मोठी घट नोंदविल्या गेली. प्रत्येक पिकाच्या लागवडीसाठी ठराविक कालावधी असतो. या कालावधीच्या पुढे ठराविक पिकांची लागवड झाल्यास त्याचा उत्पादनाला फटका बसतो. त्याचाच प्रत्यय २०१९ मध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत आहे.ऋतुचक्र प्रभावीत झाल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट नोंदविल्या गेली आहे. कीडींचे आक्रमण, अपुरा पाऊस आणि पावसाचा खंड यातून कोरडवाहू क्षेत्र पूर्णत: कोलमडले आहे. याचा सर्वाधिक फटका कापसाला बसला आहे. एक ते दोन वेच्यातच कोरडवाहू क्षेत्रातील कापसाची उलंगवाडी झाली आहे. सध्या बाजारात केवळ ५ लाख १९ हजार क्विंटल कापूस विक्रीला आला आहे. गतवर्षी या सुमारास १५ लाख क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी झाली आहे. संपूर्ण हंगामात ही खरेदी १८ लाख क्विंटलच्या घरात नोंदविण्यात आली आहे. त्या तुलनेत २०१९ मध्ये १० लाख क्विंटल कापसाची घट नोंदविण्यात आली.सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद या पिकांची अवस्था अशीच आहे. २०१८ मध्ये ९ लाख ७४ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली. आठ हजार ३८६ क्विंटल ज्वारीची खरेदी झाली. ८ हजार १४१ क्विटल उडीद आणि दोन हजार ५०० क्विंटल मुगाची खरेदी झाली आहे. २०१९ मध्ये हे उत्पादन ३० टक्क्याने घटले आहे. यामुळे बाजार समित्यामधील आवक मंदावली आहे.निसर्ग प्रकोपाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. यानंतरही कृषी उत्पादनाच्या दरात कुठलीही दरवाढ नोंदविली गेली नाही. याला कांदा अपवाद राहिला आहे. कापसाचे दर २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये हजार रूपयाने कमी आहेत. तर सोयाबीनच्या दरात थोडी वाढ नोंदविण्यात आली आहे. खर्चाच्या तुलनेत ही दरवाढ नाममात्र आहे. यामुळे कृषी उत्पादनावर अवलंबून असणारे कुटुंब अडचणीत सापडले आहेत.शेतीच्या पुनरुज्जीवनाची गरजशेती व्यवसायाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी पायाभूत सुविधा पुरविण्याची आवश्यकता आहे. यासोबतच खत, बियाणे, औषधांवर अनुदान देण्याची आवश्यकता आहे. खर्चावर आधारीत दर शेतमालास मिळण्याची गरज आहे. तरच शेतीचे पुनरुज्जीवन शक्य होणार आहे.

टॅग्स :cottonकापूस