शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

..तर कापसाचे लागवड क्षेत्र घटेल, कापूसगाठीच्या निर्यातीवर प्रश्नचिन्ह

By रूपेश उत्तरवार | Updated: April 17, 2023 13:50 IST

कांद्याप्रमाणे कापसाला अनुदान द्या

रूपेश उत्तरवार

यवतमाळ : कापसाचा लागवडखर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यानंतर खुल्या बाजारात कापसाचे दर गडगडले आहेत. यातून कापूस उत्पादकांची मोठी कोंडी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरांत अजूनही कापूस पडून आहे. अशा अवघड परिस्थितीत राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. मात्र यात कुठलाही निर्णय न झाल्याने येणाऱ्या काळात कापसाचे लागवड क्षेत्र घटण्याचा धोका आहे.

२०२१ मध्ये कापसाला १२ हजार रुपये क्विंटलचा भाव होता. यामुळे २०२२ मध्ये कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले. २०२२ मध्ये कापसाचे दर घसरले. यामुळे २०२३ मध्ये त्याचा परिणाम थेट लागवडीवर होण्याचा अंदाज आहे. यामुळे शेतकरी अभ्यासकांनी कांद्याप्रमाणे कापसाला अनुदान देण्याची आवश्यकता असल्याची भूमिका कृषी अभ्यासकांनी घेतली आहे. यातून कापसाच्या अनुदानासाठी थेट पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. मात्र केंद्र शासनाने कापूस गाठीच्या निर्यातीच्या अनुदानासाठी कुठलाही निर्णय अजून घेतला नाही. यामुळे कापूस उत्पादक पट्ट्यात चिंता वाढली आहे.

या वेळी कापूस उत्पादकांना लोकप्रतिनिधींनी वाऱ्यावर सोडल्याचा आरोप होत आहे. कापूस उत्पादकांना अनुदान दिले तर त्याचा मोठा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे. पुढील वर्षी कापसाचे क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे. शेतकरी अभ्यासक विजय जावंधिया यांनी कापूस गाठीच्या अनुदानासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.

कापसाचे उत्पादन करणाऱ्या प्रमुख देशांत कापसाचे उत्पादन या वर्षी वाढले आहे. याचा परिणाम जागतिक बाजारात कापसावर पाहायला मिळत आहे. अमेरिका, ब्राझील आणि चीनमध्ये या वर्षी कापसाचे दर स्थिर आहे. यातून जागतिक बाजारात रुईचे दर स्थिर आहे. शिवाय जागतिक बाजारात कापड उद्योगात मंदी आहे. कापडाच्या किमती वाढल्यानेही कापडखरेदीचा उठाव कमी झाला आहे. या सर्व बाबींचा परिणाम कापसाच्या दरावर झाला आहे. यातून कापसाचे खंडीचे दर ६२००० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. गतवर्षी १२ हजार रुपये क्विंटल असलेला कापूस सध्या ७७०० रुपये क्विंटलपर्यंत खाली आला आहे. यातून शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे.

गतवर्षी ४८ लाख कापूसगाठींची निर्यात

गतवर्षी देशभरातून ४८ लाख कापूसगाठींची निर्यात करण्यात आली होती. या वर्षी १० लाखही कापूसगाठींची निर्यात झाली नाही. जागतिक बाजारात भारतातील कापूसगाठ महागात पडत आहे. यामुळे खरेदी करणारे ग्राहक नाहीत. अशा स्थितीत निर्यातीसाठी अनुदान मिळाले तर त्याचा उपयोग गाठीची निर्यात वाढण्यास हाेणार आहे. यामुळे पुढील वर्षी कापसाच्या गाठी अधिक प्रमाणात राहिल्या तर कापूस दरावर त्याचा थेट परिणाम होणार आहे. यातून दर घसरण्याचाच धोका आहे.

पंतप्रधानांकडे मागणी

कापसाला कांद्याप्रमाणे अनुदान देण्यात यावे. अनुदान देताना ठरावीक क्षेत्रापर्यंतचा नियम आखण्यात यावा. यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक हातभार लागेल. आर्थिक संकटातून त्याची सुटका होईल. साखरेप्रमाणे कापूसगाठीच्या निर्यातीला परवानगी देण्यात यावी, ही मागणी पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे.

- विजय जावंधीया, शेतकरी अभ्यासक

आर्थिक काेंडी फोडायला हवी

शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. या स्थितीत शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मुळात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी फोडायला हवी, याकडे कुणाचे लक्ष नाही. साखर निर्यातीसाठी अनुदान आहे. मग कापूस उत्पादकाला अनुदान का नाही? कांद्याप्रमाणे त्यांना अनुदानाची संधी मिळावी. त्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मागणी करावी.

- मनीष जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अध्यक्ष

क्विंटलमागे ५०० रुपयांचे अनुदान द्या

शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना क्विंटलमागे ५०० रुपयांचे अनुदान देण्यात यावे. याशिवाय खुल्या बाजारात कापूस खरेदीसाठी परवानगी देण्यात यावी. यामुळे शेतकऱ्यांना हातभार लागेल.

- राजाभाऊ देशमुख, पणन महासंघ, अध्यक्ष

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस