शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

कापसाचे दर खासगीच्या तुलनेत सीसीआयकडून अधिक, तरी सीसीआयकडे कल कमी का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 17:45 IST

Yavatmal : कापूस विक्रीची गती मंदावली ; २५० रुपये खासगी व सीसीआयच्या दरात पडतो फरक

के. एस. वर्मा लोकमत न्यूज नेटवर्क राळेगाव : भाववाढीच्या आशेमुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्री थांबविली आहे. विविध आर्थिक गरजांमुळे काही शेतकरी आपला कापूस विक्रीकरिता आणत आहे. राळेगाव मुख्य बाजार, वाढोणा बाजार व खैरी या उपबाजारात दरवर्षीच्या तुलनेत कापसाची आवक जानेवारी महिना सुरू झाला असला तरी कमीच आहे. 

दुष्काळी स्थितीत अल्प उत्पादनाचासुद्धा हा परिणाम आहे. खुल्या बाजारात खासगीत कापूस खरेदीचे दर ७००० ते ७२०० रुपयांच्या आसपास दिला जात आहे. या दिवसात अपवाद वगळता आता बहुतांश शेतकऱ्यांचा कापसाच्या मोजणीत ओलावा आठ टक्के येत असल्याने अशा कापसाला सीसीआयकडून ७४२१ रुपये दर दिला जात आहे.

खासगी व सीसीआयच्या दरात २०० ते २५० रुपये प्रतिक्विंटल इतका मोठा फरक पडत असतानाही अनेक शेतकरी सीसीआयला टाळून खासगीत आपला कापूस विकत आहे. एका वाहनात सरासरी ३० क्विंटल कापूस आणला जातो. यात शेतकऱ्यांना सहा ते सात हजार पाचशे रुपयेपर्यंतचा फटका बसत आहे. तरी अनेक शेतकरी सीसीआयऐवजी खासगीत कापूस विकतात. शेतकऱ्यांचे हितचिंतक म्हणविल्या जाणाऱ्या नेत्यांनी, संस्थांनी व संघटनांनी याचे कारण शोधण्याची गरज आहे. सीसीआयकडे नोंदणीसाठी कागदपत्रे लागतात. आठ दिवसांत चुकारे मिळतात. 

पाच लाख क्विंटल खरेदी खासगीत तीन लाख चाळीस हजार क्विंटल तर, सीसीआयची एक लाख साठ हजार क्विंटल याप्रमाणे आतापर्यंत पाच लाख क्विंटल कापसाची खरेदी राळेगाव तालुक्यातील तीन केंद्रावर झालेली आहे. खासगीत दररोज सहा हजार तर, सीसीआयकडून दररोज अडीच हजार क्विंटल कापसाची खरेदी केली जात आहे.

शेतकऱ्यांना रोख हवी शेतकऱ्यांना कापूस विकल्याबरोबरच नगदी पैसे हवे असतात. त्याकरता वेळप्रसंगी एक, दीड, दोन टक्के पैसे कपात करून देण्यासही ते तयार होतात. कापूस विक्रीतील पैसे घरी आणून दुसऱ्या दिवशी ते बँकेत भरतात. यात मोठ्या रकमेची ने-आण करण्याची जोखीमही त्यांच्याकडून घेतली जाते.

टॅग्स :cottonकापूसfarmingशेतीFarmerशेतकरीYavatmalयवतमाळ