शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
2
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
3
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
4
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
5
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
6
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत
7
IND vs AUS : हिटमॅन रोहितचा आणखी एक हिट शो! सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
8
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
9
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
10
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
11
पुढील वर्षी असं काही होईल, जे यापूर्वी कधीच झालं नाही, बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी
12
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
13
Virat Kohli Celebration : चेहऱ्यावर हसू अन् खातं उघडल्याचा 'विराट' आनंद! व्हिडिओ बघाच
14
Crime: एकेकाळी 'राज्यस्तरीय पैलवान', लग्नानंतर ड्रग्जचं व्यसन जडलं, पैशांसाठी मुलाला विकले!
15
अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
16
भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?
17
IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट
18
जैन बोर्डिंगचा व्यवहार १ तारखेच्या अगोदर रद्द नाही झाला तर संपूर्ण देशभर मोठे आंदोलन; जैन मुनींचा इशारा
19
पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला; UN मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारतानं दाखवला आरसा
20
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?

कापूसही रुसला; सोयाबीनला मिळतोय हमीपेक्षा कमी भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 17:52 IST

शेतकऱ्याची चिंता वाढली : कापूस लागवडीचा खर्चही निघेना

लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे कापूससोयाबीन सध्या चांगले भाव मिळण्याच्या प्रतीक्षेत असून, कापूससोयाबीनचा भाव वाढत आहे ही केवळ चर्चाच आहे. सोयाबीनला व कापसाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंता व्यक्त करू लागले आहेत.

पुसद तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन व कापूस उत्पादन घेतले जाते. ही संख्या मोठी असली, तरी यंदाच्या वर्षात पूर व खराब वातावरणामुळे सोयाबीनचे चांगले उत्पादन मिळाले नाही. शिवाय कमी उत्पादन असताना भाव देखील ३ हजार हजार ३०० पासून ४ हजार २०० पर्यंत एवढा कमी प्रति क्विंटलला मिळत आहे. मागील दसरा, दिवाळी सणापासून सोयाबीनच्या दरामध्ये वाढ झाली नाही. त्यामुळे पुसद बाजार समितीचे आवारामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांच्या आडतीसमोर सोयाबीनचे ढीग दिसून येत आहेत. एकंदरच बाजारभाव हा ४ हजार २०० ते ३०० च्या वर जायला तयार नाही, तर आज ना उद्या भाववाढ होईल या आशेवर शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन तसेच ठेवले आहे. दुसरीकडे सोयाबीनवर शेतकऱ्यांनी अगोदरच उचल घेतलेली राहते, त्या उचलीची परतफेड करणे व नवीन ताळेबंद बसविणे यामध्ये बळीराजा गुंतलेला दिसतो. परंतु यावर्षी बाजारपेठेत सोयाबीनचे दर पडलेले असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी पुसद तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीनचे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्या तुलनेत सोयाबीनचे बाजारातील दर वाढणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे खर्च जास्त आणी उत्पन्न कमी अशी गत झाल्यामुळे सोयाबीन पिक शेतकऱ्यांना परवडले नाही. आता शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाला देखील उतारा कमी आला. त्यातच कापसालाही खूपच कमी दर मिळत असल्याने शेतकरी त्रस्त आहे. मागील काही वर्षात कापसाचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सात हजार इतक्या अल्प दरात कापूस विकणे परवडत नाही. शिवाय वेचणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले असून प्रति किलो १२ रुपये वेचणीला खर्च येत असल्याने जिल्हाभरातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

आता अपेक्षा तुरीच्या पिकाकडून सध्या तुरीचे पीक जोमात बहरलेले आहे. तुरीच्या पिकातून तरी हाती काही पडेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान, सध्या अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. याचा फटका बहरुन आलेल्या तुरीच्या पिकाला बसू नये अपेक्षाही शेतकरी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :YavatmalयवतमाळfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रcottonकापूसSoybeanसोयाबीन