शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कापूसही रुसला; सोयाबीनला मिळतोय हमीपेक्षा कमी भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 17:52 IST

शेतकऱ्याची चिंता वाढली : कापूस लागवडीचा खर्चही निघेना

लोकमत न्यूज नेटवर्क पुसद : शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे कापूससोयाबीन सध्या चांगले भाव मिळण्याच्या प्रतीक्षेत असून, कापूससोयाबीनचा भाव वाढत आहे ही केवळ चर्चाच आहे. सोयाबीनला व कापसाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंता व्यक्त करू लागले आहेत.

पुसद तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन व कापूस उत्पादन घेतले जाते. ही संख्या मोठी असली, तरी यंदाच्या वर्षात पूर व खराब वातावरणामुळे सोयाबीनचे चांगले उत्पादन मिळाले नाही. शिवाय कमी उत्पादन असताना भाव देखील ३ हजार हजार ३०० पासून ४ हजार २०० पर्यंत एवढा कमी प्रति क्विंटलला मिळत आहे. मागील दसरा, दिवाळी सणापासून सोयाबीनच्या दरामध्ये वाढ झाली नाही. त्यामुळे पुसद बाजार समितीचे आवारामध्ये मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांच्या आडतीसमोर सोयाबीनचे ढीग दिसून येत आहेत. एकंदरच बाजारभाव हा ४ हजार २०० ते ३०० च्या वर जायला तयार नाही, तर आज ना उद्या भाववाढ होईल या आशेवर शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन तसेच ठेवले आहे. दुसरीकडे सोयाबीनवर शेतकऱ्यांनी अगोदरच उचल घेतलेली राहते, त्या उचलीची परतफेड करणे व नवीन ताळेबंद बसविणे यामध्ये बळीराजा गुंतलेला दिसतो. परंतु यावर्षी बाजारपेठेत सोयाबीनचे दर पडलेले असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे गत वर्षीच्या तुलनेत यावर्षी पुसद तालुक्यात खरीप हंगामातील सोयाबीनचे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्या तुलनेत सोयाबीनचे बाजारातील दर वाढणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे खर्च जास्त आणी उत्पन्न कमी अशी गत झाल्यामुळे सोयाबीन पिक शेतकऱ्यांना परवडले नाही. आता शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाला देखील उतारा कमी आला. त्यातच कापसालाही खूपच कमी दर मिळत असल्याने शेतकरी त्रस्त आहे. मागील काही वर्षात कापसाचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सात हजार इतक्या अल्प दरात कापूस विकणे परवडत नाही. शिवाय वेचणीसाठी मजूर मिळणे कठीण झाले असून प्रति किलो १२ रुपये वेचणीला खर्च येत असल्याने जिल्हाभरातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

आता अपेक्षा तुरीच्या पिकाकडून सध्या तुरीचे पीक जोमात बहरलेले आहे. तुरीच्या पिकातून तरी हाती काही पडेल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. दरम्यान, सध्या अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. याचा फटका बहरुन आलेल्या तुरीच्या पिकाला बसू नये अपेक्षाही शेतकरी व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :YavatmalयवतमाळfarmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रcottonकापूसSoybeanसोयाबीन