शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

प्राधिकरणाचा खर्चच दुप्पट

By admin | Updated: March 10, 2017 01:10 IST

जीवन प्राधिकरणाच्या उत्पन्नापेक्षा खर्च दुप्पट आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाची हमी आता शासनाने घ्यावी,

कर्मचारी संपावर : वेतनाची हमी शासनाने घ्यावीयवतमाळ : जीवन प्राधिकरणाच्या उत्पन्नापेक्षा खर्च दुप्पट आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनाची हमी आता शासनाने घ्यावी, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला. येथील कर्मचाऱ्यांनीही त्यात सहभाग घेऊन धरणे आंदोलन सुरू केले आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीतर्फे हे आंदोलन सुरू करण्यात आले. कर्मचारी संपावर असले, तरी शहराचा पाणीपुरवठा मात्र सुरळीत सुरू ठेवण्यात येईल. केवळ कार्यालयीन कामकाजात कर्मचारी सहकार्य करणार नाही, असे आंदोलकांनी सांगितले. प्राधिकरणात कार्यरत व सेवानिवृत्तांचे वेतन जीवन प्राधिकरणाच्या उत्पन्नातूनच अदा केले जाते. या उत्पन्नात पाणीपट्टी, तांत्रिक मान्यता शुल्क व भांडवली कामे करण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काचा समावेश आहे. भांडवली कामांसाठी सुरुवातीला प्राधिकरणाला १७.५ टक्के शुल्क मिळत होते. ७३ व ७४ व्या घटना दुरुस्तीनंतर हे शुल्क कमी होत तीन टक्क्यापर्यंत घसरले. या घटना दुरुस्तीमुळे बरीचशी कामे प्राधिकरणाकडून करवून न घेता स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत करण्यात येते. पाणीपट्टी वसुलीपोटी मिळणारे उत्पन्नही अतिशय कमी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेकडे जीवन प्राधिकरणाचे ३५०० कोटी थकबाकी आहे. आजघडीला प्राधिकरणाचे उत्पन्न सरासरी वार्षिक १३५ कोटीपर्यंत आहे. खर्च मात्र सरासरी वार्षिक ४५० कोटी आहे. यात कर्मचारी, अधिकाऱ्यांचे वेतन व इतर आनुषंगिक भत्ते, प्राधिकरणाच्या विविध योजनांच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च समाविष्ट आहे. त्यामुळे प्राधिकरणाच्या स्वउत्पन्नातून खर्च भागविणे अशक्य होत आहे. याकरिता कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यांची हमी शासनाने घ्यावी म्हणून विविध संघटनांनी डिसेंबर २०१५ मध्ये आंदोलन केले. त्यावेळी ३ महिन्यात वेतनाचा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. मात्र अद्याप कार्यवाही न झाल्याने कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)