शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

रेल्वे भूसंपादनाच्या सुनावणीत दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:25 IST

रेल्वे भूसंपादन करताना योग्य मोबदला मिळाला नसल्याच्या शेकडो तक्रारी पुढे आल्या आहेत. या तक्रारीची तत्काळ सोडवणूक करण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली.

ठळक मुद्देअर्धे आत : अर्ध्या शेतकºयांचे प्रस्ताव फेटाळले, संताप व्यक्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रेल्वे भूसंपादन करताना योग्य मोबदला मिळाला नसल्याच्या शेकडो तक्रारी पुढे आल्या आहेत. या तक्रारीची तत्काळ सोडवणूक करण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. सुनावणी दरम्यान अर्ध्या शेतकºयांचे प्रस्ताव फेटाळले गेले तर अर्ध्यांचे गाºहाणे ऐकल्या गेले. यामुळे शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर आहे.वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनासंदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. या सुणावणीला महसूल राज्यमंत्री संजय राठोड, महसूल व वनविभागाचे सहसचिव सुभाष गावडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, खासगी सचिव रवींद्र पवार यांच्यासह सर्व विभागाचे उपविभागीय अधिकारी, रेल्वेचे उपमुख्य अभियंता एच. एल. कावरे, बी. एम. त्रिपाठी, सागर चौधरी उपस्थित होते.भूसंपदनाची प्रकरणे सोडविण्याचे विशेष नियोजन करण्यात आले होते. त्याकरिता राज्यमंत्र्यांच्या कार्यालयात अर्ज स्वीकारण्यात आले. याच अर्जावर या ठिकाणी सुनावणी झाली. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयात दाखल झालेल्या अर्जांची सुनावणीच झाली नाही. यामुळे अनेक शेतकरी आणि भूधारक नाराज झाले. त्यांनी प्रशासनाला याचा जाब विचारला. मात्र योग्य उत्तर मिळाले नाही.मालीराम शर्मा, रूपचंद बत्रा, विजय काळे, रमेश आकोटकर, संतोष शर्मा, प्रमोद यमसनवार, सुजिन मुनगीनवार, अभय बरबडे, सदाशिव नागपुरे, सखरू मोरे, गुलाब चावरे, रवी किल्लारे यांनी सुनावणीमधील दुजाभावावर प्रचंड आक्षेप घेतला. आमचे प्रश्न कधी सुटणार, असे म्हणत जाब विचारला.अनेक शेतकºयांना ओलित आणि बागायती जमीन असतानाही कोरडवाहूचे दर मिळाले. तर काहींच्या जमिनीचे दर दोन हजार रूपये चौरस फुटापेक्षा अधिक आहेत. मात्र ते ग्राह्य न धरता २०० रूपये दरानुसार पैसे दिले गेले. शासनाच्या उफराट्या धोरणावर प्रचंड चिड व्यक्त करण्यात आली.मोबदल्यासाठी पाठपुरावा करणाररेल्वे भूसंपादन प्रकरणात शेतकºयांना योग्य मोबदला मिळावा म्हणून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. याप्रकरणात येणाºया अडचणी सोडविण्यासाठी पूर्ण प्रयत्न होतील, असे आश्वासन यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी शेतकºयांना दिले. यात १०२ तक्रारी निकाली निघाल्या.