शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
"प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
4
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
5
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
6
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
7
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
8
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
9
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
10
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
11
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
12
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
13
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
14
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
15
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
16
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
17
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
18
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
19
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
20
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल

रेल्वे भूसंपादनाच्या सुनावणीत दुजाभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 01:25 IST

रेल्वे भूसंपादन करताना योग्य मोबदला मिळाला नसल्याच्या शेकडो तक्रारी पुढे आल्या आहेत. या तक्रारीची तत्काळ सोडवणूक करण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली.

ठळक मुद्देअर्धे आत : अर्ध्या शेतकºयांचे प्रस्ताव फेटाळले, संताप व्यक्त

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : रेल्वे भूसंपादन करताना योग्य मोबदला मिळाला नसल्याच्या शेकडो तक्रारी पुढे आल्या आहेत. या तक्रारीची तत्काळ सोडवणूक करण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. सुनावणी दरम्यान अर्ध्या शेतकºयांचे प्रस्ताव फेटाळले गेले तर अर्ध्यांचे गाºहाणे ऐकल्या गेले. यामुळे शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर आहे.वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनासंदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. या सुणावणीला महसूल राज्यमंत्री संजय राठोड, महसूल व वनविभागाचे सहसचिव सुभाष गावडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, खासगी सचिव रवींद्र पवार यांच्यासह सर्व विभागाचे उपविभागीय अधिकारी, रेल्वेचे उपमुख्य अभियंता एच. एल. कावरे, बी. एम. त्रिपाठी, सागर चौधरी उपस्थित होते.भूसंपदनाची प्रकरणे सोडविण्याचे विशेष नियोजन करण्यात आले होते. त्याकरिता राज्यमंत्र्यांच्या कार्यालयात अर्ज स्वीकारण्यात आले. याच अर्जावर या ठिकाणी सुनावणी झाली. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय आणि उपविभागीय कार्यालयात दाखल झालेल्या अर्जांची सुनावणीच झाली नाही. यामुळे अनेक शेतकरी आणि भूधारक नाराज झाले. त्यांनी प्रशासनाला याचा जाब विचारला. मात्र योग्य उत्तर मिळाले नाही.मालीराम शर्मा, रूपचंद बत्रा, विजय काळे, रमेश आकोटकर, संतोष शर्मा, प्रमोद यमसनवार, सुजिन मुनगीनवार, अभय बरबडे, सदाशिव नागपुरे, सखरू मोरे, गुलाब चावरे, रवी किल्लारे यांनी सुनावणीमधील दुजाभावावर प्रचंड आक्षेप घेतला. आमचे प्रश्न कधी सुटणार, असे म्हणत जाब विचारला.अनेक शेतकºयांना ओलित आणि बागायती जमीन असतानाही कोरडवाहूचे दर मिळाले. तर काहींच्या जमिनीचे दर दोन हजार रूपये चौरस फुटापेक्षा अधिक आहेत. मात्र ते ग्राह्य न धरता २०० रूपये दरानुसार पैसे दिले गेले. शासनाच्या उफराट्या धोरणावर प्रचंड चिड व्यक्त करण्यात आली.मोबदल्यासाठी पाठपुरावा करणाररेल्वे भूसंपादन प्रकरणात शेतकºयांना योग्य मोबदला मिळावा म्हणून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल. याप्रकरणात येणाºया अडचणी सोडविण्यासाठी पूर्ण प्रयत्न होतील, असे आश्वासन यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी शेतकºयांना दिले. यात १०२ तक्रारी निकाली निघाल्या.