शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

CoronaVirus News: यवतमाळ जिल्ह्यात 16 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 19:17 IST

शुक्रवारी नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 16 जणांमध्ये नऊ पुरूष व सात महिलांचा समावेश आहे.

यवतमाळ: आज जिल्ह्यात 16 नवीन कोरोना पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडली असून दोन जण ॲन्टीजन चाचणीद्वारे पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच आयसोलेशन वॉर्डात भरती असलेले व सुरवातीला पॉझेटिव्ह आलेले 11 जण उपचारामुळे बरे झाल्यावर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

शुक्रवारी नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 16 जणांमध्ये नऊ पुरूष व सात महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ शहरातील तृप्तीनगर येथील एक पुरूष आणि समनानी नगर वडगाव येथील एक पुरुष तसेच तायडे नगर येथील एक महिला असे तीन जण आहेत, दिग्रस शहरातील शंकर नगर येथील एक पुरूष, काझीपुरा येथील चार पुरुष व तीन महिला असे आठ जण आणि दारव्हा येथील दोन पुरुष आणि तीन महिला असे पाच जण आहेत. तसेच ॲन्टीजन चाचणीद्वारे वणी येथील एक आणि भोपाळ येथून एक पॉझेटिव्ह पांढरकवडा येथे स्थलांतरीत झाल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.  

जिल्ह्यात सद्यस्थितीत ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 101 आहे. गत 24 तासात वैद्यकीय महाविद्यालयाला 197 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 16 पॉझेटिव्ह आणि 181 रिपोर्ट निगेटिव्ह आहे. सद्यस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात 120 जण भरती आहे.  

जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत पॉझेटिव्ह रुग्णांचा आकडा 397 वर गेला आहे. यापैकी 283 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली तर जिल्ह्यात 13 जणांच्या मृत्युची नोंद आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आज 139 नमुने तपासणीकरीता प्रयोगशाळेत पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत एकूण 6764 नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून यापैकी 6471 प्राप्त तर 293 रिपोर्ट अप्राप्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 6076 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे.

जिल्हाधिका-यांचे आवाहन :

पावसाळ्याच्या वातावरणात रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन व्हायरल इन्फक्शनचा धोका जास्त असतो. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची प्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक आहे. वय वर्ष 10 पेक्षा कमी व 60 पेक्षा अधिक असणाऱ्यांनी तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह सारखे आजार असणाऱ्या नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी. नागरिकांना मागील 5 महिन्यांपासून मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, हात स्वच्छ धुणे यासारख्या सुचना प्रशासनाकडून वारंवार दिल्या जात आहेत. त्याचे पालन न करणे ही बाब धोकादायक ठरू शकते.

यापुर्वी यवतमाळ शहर पूर्णत: कोरोनामुक्त करण्यात आले होते. त्याचप्रमाणे संपूर्ण जिल्हा देखील कोरोनामुक्त करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. दुचाकी वाहनावर एकच व्यक्ती, दुकानात 5 पेक्षी कमी नागरिकांना प्रवेश, मास्कचा वापर या शासनाच्या नियमांचे पालन करावे व स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.

टॅग्स :YavatmalयवतमाळCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस