सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गाची धास्ती सर्वांनीच घेतली आहे. प्रत्यक्षात कोरोना रुग्णसंख्या आणि कोरोनामुक्त होणारे रुग्ण यांच्या दरात मोठी तफावत आहे. त्यामुळे शंका वाटल्यास निर्धास्तपणे कोरोना चाचणी करून योग्य उपचार घेतल्यास सहज मात करता येते.जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या तपासणीपैकी केवळ ६.४० टक्केच व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्या आहेत. निगेटिव्ह येणाऱ्यांची संख्या ९३.५९ टक्के आहे. बाधितांपैकी २.५५ टक्के जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत ४० हजार ८७५ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये ३८ हजार २५५ जणांचे नमुने निगेटिव्ह आले. केवळ दोन हजार ६२० जणांना कोरोनाची बाधा झाली. यातील बहुतांश जणांमध्ये कोणतीही लक्षणे नाही.इतर आजार आणि शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी असलेल्या लोकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. वेळेत तपासणी करून योग्य उपचार घेतल्यास कोरोनावर सहज मात करता येते. संसर्गाचा धोक वाढू नये यासाठी योग्य ती दक्षता घेण्याची गरज आहे.जिल्ह्यात कोरोना तपासणी दोन पध्दतीने केली जात आहे. रॅपीड अॅन्टिजन टेस्ट किटचा वापर कोविड सेंटरवर केला जात आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळेत आरटीपीसीआर मशिनवर केली जाते. जिल्हा प्रशासनाने माहिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून रविवारी पुरविलेल्या माहितीच्या आधारेच हा आराखडा तयार केला आहे. सध्या कोविड केंद्र, वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वॉर्ड आणि गृह विलगीकरणात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५४६ इतकी आहे. संसर्ग सर्वत्र दिसत असला तरी घाबरण्याचे कारण नाही, केवळ दक्षता बाळगण्याची आवश्यकता आहे.आरटीपीसीआरवर ८.७५ व रॅपीड टेस्टमध्ये ३.३६ टक्केआरटीपीसीआर मशीनवर आतापर्यंत २० हजार २२१ नमुने तपासण्यात आले. यामध्ये एक हजार ८१८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. याची टक्केवारी ८.७५ इतकी आहे. १८ हजार ९५३ नमुने निगेटिव्ह असून, याची टक्केवारी ९१.२४ इतकी आहे. तालुका स्थळावरील कोविड सेंटरवर करण्यात आलेल्या रॅपीड टेस्ट किटमध्ये पॉझिटिव्हची संख्या ३.३६ टक्के आहे. निगेटिव्ह येणाऱ्याचे प्रमाण ९६.६३ टक्के आहे. आतापर्यंत रॅपीड टेस्ट किटद्वारे १७ हजार ५७२ नमुने तपासण्यात आले. यामध्ये केवळ ५९२ नमुने पॉझिटिव्ह निघाले. १६ हजार ९८० नमुने निगेटिव्ह आले आहेत.कोरोनामुक्तीचे प्रमाण ६९ टक्केकोरोना संसर्गाचे रुग्ण ज्या प्रमाणात सापडत आहे, त्यापेक्षा कोरोना आजारातून बरे होणाऱ्यांची संख्या कितीतरी पटीने अधिक आहे. साडेसहा टक्के नमुने पॉझिटिव्ह येत आहेत. तर या आजारातून बरे होणाºयाचे प्रमाण ६८.८१ टक्के आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दोन हजार ६२० रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. यापैकी एक हजार ८०३ जण कोरोनातून पूर्ण पणे बरे झाले आहे. एकवेळा कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा कोरोनाची बाधा झालेला एकही रुग्ण आढळला नाही, हे विशेष.
कोरोनाचा पॉझिटिव्ह दर साडेसहा टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 05:00 IST
इतर आजार आणि शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी असलेल्या लोकांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. वेळेत तपासणी करून योग्य उपचार घेतल्यास कोरोनावर सहज मात करता येते. संसर्गाचा धोक वाढू नये यासाठी योग्य ती दक्षता घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात कोरोना तपासणी दोन पध्दतीने केली जात आहे. रॅपीड अॅन्टिजन टेस्ट किटचा वापर कोविड सेंटरवर केला जात आहे.
कोरोनाचा पॉझिटिव्ह दर साडेसहा टक्के
ठळक मुद्देसंसर्गाची दुसरी बाजू : जिल्ह्यातील बाधितांचा मृत्यू दर अडीच टक्के