शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

कोरोनाचा कल्ला, त्यात पावसाचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST

१८ मार्चपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दररोज कुठल्या ना कुठल्या तालुक्यात पाऊस बरसतो. या सोबत गारपीटही होते. याची धास्ती गाव खेड्यात लोकांना बसली आहे. शेतकऱ्यांनी गतवर्षीचा अंदाज लक्षात घेता यावर्षी गव्हाची उशिरापर्यंत पेरणी केली. हा गहू आता काढणीस तयार झाला आहे. याच सुमारास अवकाळी पावसाने जिल्हाभरात थैमान घातले आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसाने गाव-शिवार उद्ध्वस्त : वैद्यकीय आणीबाणीत निसर्गही कोपला

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाच्या धास्तीमुळे आधीच जनजीवन विस्कळीत झालेले असताना अवकाळी पावसानेही जिल्ह्यात आठवडाभरापासून कहर माजविला आहे. आठवडाभरात चार हजार हेक्टरचे नुकसान झाले आहे. यामध्ये गहू, हरभरा, केळी, भाजी, संत्रा, मोसंबी, लिंबू, आंबा इत्यादी पिकांचा समावेश आहे.१८ मार्चपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दररोज कुठल्या ना कुठल्या तालुक्यात पाऊस बरसतो. या सोबत गारपीटही होते. याची धास्ती गाव खेड्यात लोकांना बसली आहे. शेतकऱ्यांनी गतवर्षीचा अंदाज लक्षात घेता यावर्षी गव्हाची उशिरापर्यंत पेरणी केली. हा गहू आता काढणीस तयार झाला आहे. याच सुमारास अवकाळी पावसाने जिल्हाभरात थैमान घातले आहे. मजुराच्या कमतरतेने शेतशिवारात गहू उभा आहे. त्याला पर्याय म्हणून वापरले जाणारे हार्वेस्टर प्रत्येक ठिकाणी पोहोचणे अशक्य आहे. यामुळे शेतकऱ्यांना डोळ्यादेखत हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या स्वाधीन करावा लागत आहे.गत आठ दिवसात जिल्ह्यात साडेचार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अनेक गावात, अनेक तालुक्यात शेती पिकाचा सर्वे करणारी यंत्रणा पोहोचलीच नसल्याचा आरोप गावकरी करीत आहे. कोरोनाच्या भीतीने कृषी सहाय्यक, तलाठी, शेतशिवारात जात नाही. जाण्यासाठी पोलिसांचा मज्जाव असल्याचे कर्मचारी सांगत आहे. यामुळे नैसर्गिक आपत्तीत नेमके किती नुकसान झाले याचा खरा आकडा अजूनही पुढे आला नाही. नेर, पुसद, उमरखेड आणि आर्णी या चार तालुक्याचाच अहवाल कृषी विभागाकडे प्राप्त झाला आहे. इतर तालुक्याची कुठलीही माहिती कृषी विभागाकडे नाही. सोळाही तालुक्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान उमरखेड तालुक्यात झाल्याची नोंद चार तालुक्याच्या अहवालातून पुढे आली आहे. या ठिकाणी १६०० हेक्टरचे नुकसान झाले आहे. आर्णी तालुक्याला २० हेक्टरचे नुकसान झाले. पुसद तालुक्यात १५२ हेक्टरवर नुकसान झाले. नेर तालुक्यात १२० हेक्टरचे नुकसान झाले.इतर तालुक्यांमध्ये पावसाने मोठे नुकसान केले. त्याची कुठलीही नोंद कृषी विभागाकडे झाली नाही. याच परिस्थितीत शेतकरी आपले पीक वाचविण्यासाठी कामकाज करीत आहे. प्रशासनाची यंत्रणा हा संपूर्ण प्रकार दुरुन पाहत आहे.गारपिटनंतरही नुकसान अहवाल नील कसा?वणी, दारव्हा या दोन तालुक्यांमध्ये गत आठवड्यात आणि रविवारी गारपीटीचा मोठा फटका बसला. प्रत्यक्षात या दोन्ही तालुक्याचा नुकसानीचा अहवाल निरंक आला आहे. मुळात या तालुक्यांमध्ये सर्वे करणारे कर्मचारी पोहोचले नाही.भाजीपाला, फळ पिकांचे मोठे नुकसानगहू आडवा झाला आहे. काही ठिकाणी गारपिटीने हरभºयाच्या घाट्या गळून पडल्या आहे. भाजीपाला पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सांभार, पालक, मेथी, पालेभाज्या, टमाटर, ढेमसे, वांगे, फुलकोबी, पानकोबी, काकडी, आंबा, पपई, संत्रा पिकालाही याचा फटका बसला.

 

टॅग्स :Rainपाऊस