शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेत कोरोना ठरतोय अडसर, शिक्षकांत संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 05:00 IST

जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. अशा वेळी शिक्षकांना शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी दारोदारी फिरण्याचे आदेश मिळाले आहेत. यातून पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढण्यासाठी निमंत्रण मिळणार नाही का असा सवाल शिक्षकांनीच उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे खुद्द यवतमाळचे तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी यवतमाळच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम  ‘जरा सांभाळून’  राबवावी, अशी सूचना केली आहे.

ठळक मुद्देकन्टेन्मेंट झोनमधील मुलांचे काय ?

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना संकटामुळे यावर्षी एक तर शाळाच भरल्या नाही. दुसरे म्हणजे शेकडो मुले शाळांमध्ये दाखलच झाली नाही. अशा शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम १ ते १० मार्चपर्यंत शिक्षण विभागाने सुरू केली आहे. मात्र जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव असल्यामुळे ही शोधमाेहीम राबवताना अनेक अडचणी येत आहे. जिल्ह्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. अशा वेळी शिक्षकांना शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी दारोदारी फिरण्याचे आदेश मिळाले आहेत. यातून पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढण्यासाठी निमंत्रण मिळणार नाही का असा सवाल शिक्षकांनीच उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे खुद्द यवतमाळचे तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी यवतमाळच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना लेखी पत्र देऊन शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम  ‘जरा सांभाळून’  राबवावी, अशी सूचना केली आहे. मात्र शोधमोहिमेसाठी राज्य स्तरावरून समित्या गठित झाल्या आहे. नेर, बाभूळगाव, यवतमाळ सारख्या तालुक्यात ही मोहीम जोरदार राबविली जात आहे. तर काही तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून अद्यापही मोहिमेला सुरुवातच करण्यात आलेली नाही. कोरोनामुळे शाळा बंद आहे. मग शाळाबाह्य मुले शोधून त्यांना दाखल कुठे करणार, कोण शिकवणार याची उत्तरे शिक्षण विभागाकडे नाही. मोहिमेच्या आडून पटनोंदणी होत असल्याची शंका व्यक्त होत आहे. 

तालुकानिहाय पथके 

शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी प्रामुख्याने प्रत्येक शाळेतील शिक्षकांचे एक-एक पथक नेमण्यात आले आहे. मात्र एकाच गावात विविध परिसरासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहे. यात सर्वाधिक शाळांची संख्या पुसद आणि उमरखेड तालुक्यात असल्यामुळे तेथे पथकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय यवतमाळ शहर आणि पांढरकवडा परिसरात पथकांचे प्रमाण अधिक असल्याचे शिक्षण विभागातून सांगितले जात आहे. 

अधिकारी अद्याप फिरकलेच नाही ! 

यवतमाळ शहराबाहेर धामणगाव मार्गावर भटक्या लोकांची राहुटी आहे. तेथे तीन छोट्या मुली आणि सात ते आठ मुले आहेत. या राहुटीला भेट देऊन विचारणा केली असता, तेथील पालक म्हणाले, आमच्या मुलांच्या शाळेबाबत विचारणा करण्यासाठी आजपर्यंत कोणतेही अधिकारी आलेले नाही. शाळा कुठे आहे तेही आम्हाला माहिती नाही. 

दारव्हा मार्गावरील एमआयडीसी परिसरात भटक्या लोकांची आणखी एक राहुटी आहे. तेथेही जवळपास १५ छोटी मुले पालकांसह आहेत. मात्र या ठिकाणीही शाळाबाह्य मुलांचा शोध घेणारे पथक अद्याप पोहोचलेेले नाही. पालकांसोबत पडेल ते काम करणे आणि जमेल तसे उघडे नागडे जगणे असा दिनक्रम सुरू आहे. 

अन्य विभागाचे कर्मचारी मोहिमेत उदासीन

शालेय शिक्षण विभागाने यावेळी पहिल्यांदाच शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी राज्य, विभाग ते जिल्हा व तालुका पातळीपर्यंत नियंत्रण समित्या गठित करण्याचे आदेश दिले आहे. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष खुद्द जिल्हाधिकारी असून या मोहिमेसाठी शिक्षकांसोबतच महसूल व ग्रामविकास विभागाच्या कर्मचाऱ्यांचाही पथकात समावेश करण्याच्या सूचना आहे. मात्र जिल्ह्यात शिक्षकांव्यतिरिक्त कोणत्याही विभागाचे कर्मचारी या मोहिमेत अजून तरी सहभागी झालेले नाही. याबाबत विचारणा केली असता अन्य विभागांचे कर्मचारी कोरोनाच्या कामात गुंतलेले असल्याचे सांगण्यात आले. तर कोरोना संकटात हे सर्वेक्षण का करण्यात येत आहे, असा सवालही अनेक कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. 

सर्वे सुरू - शिक्षणाधिकारी 

प्रत्येक तालुक्यात गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत शिक्षकांचे पथक नेमण्यात आले आहे. त्यांना गावे किंवा परिसर वाटून दिला असून ही पथके डोअर-टू-डोअर जावून शाळाबाह्य मुलांचा सर्वे करीत आहे. मात्र जेथे कन्टेन्मेंट झोन आहे, तेथे सर्वेक्षणासाठी न जाण्याच्या सूचना आहे. - प्रमोद सूर्यवंशी,प्राथमिक शिक्षणाधिकारी 

जिल्हाधिकाऱ्यांची बैठक शाळाबाह्य मुलांच्या शोधमोहिमेबाबत जिल्हास्तरीय समितीची २६ फेब्रुवारी रोजी बैठक पार पडली. समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, सहअध्यक्ष तथा सीईओ डाॅ.श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक डाॅ. दिलीप पाटील-भुजबळ, शिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी व दीपक चवणे उपस्थित होते. 

 

टॅग्स :Educationशिक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्या