शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने बदलल्या रूढी, परंपरा, जीवनशैली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 05:00 IST

संवाद साधण्याच्या पद्धतीतही बदल झाला असून हालहवाल, पीकपाणी, हवामान विचारणारे नातलग फक्त कोरोनाविषयीच बोलताना दिसून येतात. कोरोनाने मानवी जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणला आहे. संपूर्ण देशात कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागात लॉकडाऊन असल्याने सर्वत्र नियमाचे काटेकोर पालन केले जात आहे. त्यामुळे अनेक रूढी, परंपरा खंडित झाल्या आहेत.

ठळक मुद्देचर्चेचे विषय बदलले : पिकपाणी, हवामानाची चर्चा पडली मागे, केवळ कोरोनाचाच उदोउदो

प्रवीण पिन्नमवार ।लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : कोरोना या जागतिक महामारीने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यामुळे एकत्र येऊ नये, जास्त गर्दी करू नये, यासाठी शासनाने अनेक नियम लागू केले आहेत. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील अनेक रूढी, परंपरा पार बदलून गेल्या आहेत.अनेकांचे खानपान, पेहराव, सवयीत बदल झाल्याचे दिसून येत आहे. मंदिरेही ओस पडली असून धार्मिक विधीसुद्धा बंद झाल्या आहेत. लग्नकार्येही अगदी थोडक्यात आटोपली जात आहेत.संवाद साधण्याच्या पद्धतीतही बदल झाला असून हालहवाल, पीकपाणी, हवामान विचारणारे नातलग फक्त कोरोनाविषयीच बोलताना दिसून येतात. कोरोनाने मानवी जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणला आहे. संपूर्ण देशात कोरोनाने कहर केला आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागात लॉकडाऊन असल्याने सर्वत्र नियमाचे काटेकोर पालन केले जात आहे. त्यामुळे अनेक रूढी, परंपरा खंडित झाल्या आहेत. भजन, पारायण, सप्ताहदेखील यंदा आयोजित करण्यात आले नाही. ठिकठिकाणची मंदिरेदेखील ओस पडली आहेत.नातलगांकडून हालहवाल, पीकपाणी, हवामान विचारणारे किंवा सहज म्हणून खुशाली विचारणारे संवाद करताना, काय म्हणते कोरोना? तुमच्या भागात प्रादूर्भाव आहे का? लॉकडाऊनची परिस्थिती कशी आहे? यासह कोरोनाविषयी इतर प्रश्न विचारले जात आहेत.त्यामुळे कोरोना हाच विषय सर्वांच्या संभाषणचा मुख्य विषय बनला आहे. जीवन जगणाच्या पद्धतीत संवादातील शब्दरचनाही बदलू लागल्या आहेत. मुंबई, पुणे येथील पाहुण्यांना दुरूनच मोबाईलनेच खुशाली सांगत अंतर ठेवूनच संपर्क ठेवला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या