शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना ईज बॅक ; जिल्ह्यात 40 तासांची संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 05:00 IST

शुक्रवारी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी हा मिनी लाॅकडाऊनचा आदेश जारी केला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांनी अधिक रुग्ण आढळणाऱ्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययाेजना प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध निर्बंध लागू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमिनी लाॅकडाऊन : शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ९ पर्यंत व्यवहार बंद, केवळ दूध, पेट्रोल, गॅस, औषधी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा रोग जेवढा खतरनाक तेवढाच लाॅकडाऊनचा इलाजही त्रासदायक अशी नागरिकांची भावना झाली आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करताना प्रशासनाची अवस्थाही दोलायमान झाली आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत कोरोनाला रोखायचे या निर्धाराने जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी ५ वाजतापासून ते सोमवारी सकाळी ९ वाजतापर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी हा मिनी लाॅकडाऊनचा आदेश जारी केला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांनी अधिक रुग्ण आढळणाऱ्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययाेजना प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यानुसारच जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार २७ फेब्रुवारीच्या सायंकाळी ५ वाजतापासून ते सोमवार १ मार्चच्या सकाळी ९ वाजतापर्यंत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी घोषित केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता या ४० तासात जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना आणि दळणवळण बंद राहणार आहे. शनिवारी सायंकाळपासून संचारबंदी लागू होणार असल्याने शनिवारी दिवसभर बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियोजन केले आहे. संचारबंदीच्या काळात नियमांचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथरोग नियंत्रण अधिनियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

२४१ जणांना लागण, तिघांचा घेतला बळी

डिसेंबरमध्ये किंचित ढिला पडलेला कोरोनाचा विळखा आता पुन्हा एकदा घट्ट होत चालला आहे. फेब्रुवारीत तर या विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. शुक्रवारी दिवसभरात तब्बल २४१ जणांना कोरोनाची लागण झाली; तर एकाच दिवसात तीनजणांचे बळी गेले.  शुक्रवारी दगावलेल्या तिघांमध्ये यवतमाळ येथील ६० वर्षीय व ८२ वर्षीय पुरुष, तर मानोरा (जि. वाशिम) येथील ८१ वर्षीय पुरुषाचा  समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, पॉझिटिव्ह आलेल्या २४१ जणांमध्ये १४१ पुरुष आणि १०० महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ येथील ११३ रुग्ण, दिग्रस येथील ४४, पुसद येथील ३६, घाटंजी येथील ९, नेर येथील ७, पांढरकवडा येथील ६, दारव्हा येथील ६, उमरखेड, वणी आणि झरी जामणी येथील प्रत्येकी ५, आर्णी, कळंब आणि महागाव येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.  शुक्रवारी प्रशासनाला एकूण १३७४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यांपैकी २४१ जण नव्याने पॉझिटिव्ह आले; तर ११३३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्य:स्थितीत जिल्ह्यात १४२७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७ हजार ९७ झाली आहे. गेल्या २४ तासांत १५४ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १५ हजार २१३ झाली आहे. जिल्ह्यात एकूण ४५७ जणांच्या मृत्यूची प्रशासनाने नोंद केली आहे.  सुरुवातीपासून आतापर्यंत १ लाख ६० हजार ४१ नमुने पाठविले असून यांपैकी एक लाख ५९ हजार ३२४ अहवाल प्राप्त झाले; तर १७१७ अहवाल अप्राप्त आहेत. तसेच १ लाख ४१ हजार २२७ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कळविले आहे.  १५४ जण कोरोनामुक्त कोरोनाचे संकट गडद होत असतानाच कोरोनाविरुद्धच्या युद्धालाही गती आली आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दरदिवशी वाढत आहे. शुक्रवारी सुमारे २५० नवे रुग्ण आढळले असले तरी तब्बल १५४ रुग्ण कोरोनामुक्तही झाले. या १५० रुग्णांना शुक्रवारी रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या