शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

कोरोना ईज बॅक ; जिल्ह्यात 40 तासांची संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 05:00 IST

शुक्रवारी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी हा मिनी लाॅकडाऊनचा आदेश जारी केला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांनी अधिक रुग्ण आढळणाऱ्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययाेजना प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध निर्बंध लागू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमिनी लाॅकडाऊन : शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ९ पर्यंत व्यवहार बंद, केवळ दूध, पेट्रोल, गॅस, औषधी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा रोग जेवढा खतरनाक तेवढाच लाॅकडाऊनचा इलाजही त्रासदायक अशी नागरिकांची भावना झाली आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करताना प्रशासनाची अवस्थाही दोलायमान झाली आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत कोरोनाला रोखायचे या निर्धाराने जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी ५ वाजतापासून ते सोमवारी सकाळी ९ वाजतापर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी हा मिनी लाॅकडाऊनचा आदेश जारी केला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांनी अधिक रुग्ण आढळणाऱ्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययाेजना प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यानुसारच जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार २७ फेब्रुवारीच्या सायंकाळी ५ वाजतापासून ते सोमवार १ मार्चच्या सकाळी ९ वाजतापर्यंत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी घोषित केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता या ४० तासात जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना आणि दळणवळण बंद राहणार आहे. शनिवारी सायंकाळपासून संचारबंदी लागू होणार असल्याने शनिवारी दिवसभर बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियोजन केले आहे. संचारबंदीच्या काळात नियमांचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथरोग नियंत्रण अधिनियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

२४१ जणांना लागण, तिघांचा घेतला बळी

डिसेंबरमध्ये किंचित ढिला पडलेला कोरोनाचा विळखा आता पुन्हा एकदा घट्ट होत चालला आहे. फेब्रुवारीत तर या विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. शुक्रवारी दिवसभरात तब्बल २४१ जणांना कोरोनाची लागण झाली; तर एकाच दिवसात तीनजणांचे बळी गेले.  शुक्रवारी दगावलेल्या तिघांमध्ये यवतमाळ येथील ६० वर्षीय व ८२ वर्षीय पुरुष, तर मानोरा (जि. वाशिम) येथील ८१ वर्षीय पुरुषाचा  समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, पॉझिटिव्ह आलेल्या २४१ जणांमध्ये १४१ पुरुष आणि १०० महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ येथील ११३ रुग्ण, दिग्रस येथील ४४, पुसद येथील ३६, घाटंजी येथील ९, नेर येथील ७, पांढरकवडा येथील ६, दारव्हा येथील ६, उमरखेड, वणी आणि झरी जामणी येथील प्रत्येकी ५, आर्णी, कळंब आणि महागाव येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.  शुक्रवारी प्रशासनाला एकूण १३७४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यांपैकी २४१ जण नव्याने पॉझिटिव्ह आले; तर ११३३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्य:स्थितीत जिल्ह्यात १४२७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७ हजार ९७ झाली आहे. गेल्या २४ तासांत १५४ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १५ हजार २१३ झाली आहे. जिल्ह्यात एकूण ४५७ जणांच्या मृत्यूची प्रशासनाने नोंद केली आहे.  सुरुवातीपासून आतापर्यंत १ लाख ६० हजार ४१ नमुने पाठविले असून यांपैकी एक लाख ५९ हजार ३२४ अहवाल प्राप्त झाले; तर १७१७ अहवाल अप्राप्त आहेत. तसेच १ लाख ४१ हजार २२७ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कळविले आहे.  १५४ जण कोरोनामुक्त कोरोनाचे संकट गडद होत असतानाच कोरोनाविरुद्धच्या युद्धालाही गती आली आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दरदिवशी वाढत आहे. शुक्रवारी सुमारे २५० नवे रुग्ण आढळले असले तरी तब्बल १५४ रुग्ण कोरोनामुक्तही झाले. या १५० रुग्णांना शुक्रवारी रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या