शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना ईज बॅक ; जिल्ह्यात 40 तासांची संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 05:00 IST

शुक्रवारी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी हा मिनी लाॅकडाऊनचा आदेश जारी केला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांनी अधिक रुग्ण आढळणाऱ्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययाेजना प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध निर्बंध लागू करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमिनी लाॅकडाऊन : शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ९ पर्यंत व्यवहार बंद, केवळ दूध, पेट्रोल, गॅस, औषधी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा रोग जेवढा खतरनाक तेवढाच लाॅकडाऊनचा इलाजही त्रासदायक अशी नागरिकांची भावना झाली आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करताना प्रशासनाची अवस्थाही दोलायमान झाली आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत कोरोनाला रोखायचे या निर्धाराने जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी ५ वाजतापासून ते सोमवारी सकाळी ९ वाजतापर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी हा मिनी लाॅकडाऊनचा आदेश जारी केला. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांनी अधिक रुग्ण आढळणाऱ्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययाेजना प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यानुसारच जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवार २७ फेब्रुवारीच्या सायंकाळी ५ वाजतापासून ते सोमवार १ मार्चच्या सकाळी ९ वाजतापर्यंत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी घोषित केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता या ४० तासात जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना आणि दळणवळण बंद राहणार आहे. शनिवारी सायंकाळपासून संचारबंदी लागू होणार असल्याने शनिवारी दिवसभर बाजारपेठेत नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियोजन केले आहे. संचारबंदीच्या काळात नियमांचे उल्लंघन झाल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथरोग नियंत्रण अधिनियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 

२४१ जणांना लागण, तिघांचा घेतला बळी

डिसेंबरमध्ये किंचित ढिला पडलेला कोरोनाचा विळखा आता पुन्हा एकदा घट्ट होत चालला आहे. फेब्रुवारीत तर या विषाणूने अक्षरश: थैमान घातले आहे. शुक्रवारी दिवसभरात तब्बल २४१ जणांना कोरोनाची लागण झाली; तर एकाच दिवसात तीनजणांचे बळी गेले.  शुक्रवारी दगावलेल्या तिघांमध्ये यवतमाळ येथील ६० वर्षीय व ८२ वर्षीय पुरुष, तर मानोरा (जि. वाशिम) येथील ८१ वर्षीय पुरुषाचा  समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, पॉझिटिव्ह आलेल्या २४१ जणांमध्ये १४१ पुरुष आणि १०० महिलांचा समावेश आहे. यात यवतमाळ येथील ११३ रुग्ण, दिग्रस येथील ४४, पुसद येथील ३६, घाटंजी येथील ९, नेर येथील ७, पांढरकवडा येथील ६, दारव्हा येथील ६, उमरखेड, वणी आणि झरी जामणी येथील प्रत्येकी ५, आर्णी, कळंब आणि महागाव येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.  शुक्रवारी प्रशासनाला एकूण १३७४ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यांपैकी २४१ जण नव्याने पॉझिटिव्ह आले; तर ११३३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. सद्य:स्थितीत जिल्ह्यात १४२७ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७ हजार ९७ झाली आहे. गेल्या २४ तासांत १५४ जण कोराेनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १५ हजार २१३ झाली आहे. जिल्ह्यात एकूण ४५७ जणांच्या मृत्यूची प्रशासनाने नोंद केली आहे.  सुरुवातीपासून आतापर्यंत १ लाख ६० हजार ४१ नमुने पाठविले असून यांपैकी एक लाख ५९ हजार ३२४ अहवाल प्राप्त झाले; तर १७१७ अहवाल अप्राप्त आहेत. तसेच १ लाख ४१ हजार २२७ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कळविले आहे.  १५४ जण कोरोनामुक्त कोरोनाचे संकट गडद होत असतानाच कोरोनाविरुद्धच्या युद्धालाही गती आली आहे. जिल्ह्यात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या दरदिवशी वाढत आहे. शुक्रवारी सुमारे २५० नवे रुग्ण आढळले असले तरी तब्बल १५४ रुग्ण कोरोनामुक्तही झाले. या १५० रुग्णांना शुक्रवारी रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या