शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

सर्वसामान्यांच्या सोयीसाठी समाधान शिबिराचे आयोजन

By admin | Updated: September 12, 2015 02:20 IST

सामान्य नागरिकांना आवश्यक असणाऱ्या बाबी ग्रामस्तरावरच उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सुवर्ण जयंती महाराजस्व

यवतमाळ : सामान्य नागरिकांना आवश्यक असणाऱ्या बाबी ग्रामस्तरावरच उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिराचा उपक्रम सुरु केला आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा व आपली कामे ग्रामपातळीवरच करून घ्यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.आर्णी तालुक्यातील सावळी सदोबा येथे गुरूवारी समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा परिषद सदस्य सोनबाजी मंगाम, पंचायत समिती सदस्य शारदा शिंदे, प्रताप आडे, सरपंच अभिजित शिंदे यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.शासनाने शिबिराच्या माध्यमातून ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना रुजविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसारच जिल्हा व तालुकास्तरावरील अधिकारी, कर्मचारी ग्रामपातळीवर जाऊन सर्वसामान्यांची कामे करीत आहे. लोकशाही प्रणालीत नागरिक मालक असून शासन, प्रशासन या नागरिकांसाठी काम करते. शिबिराच्या माध्यमातून सदर काम खऱ्या अर्थाने दिसून येत आहे. सामान्यांच्या कल्याणासाठी शासनस्तरावर मोठ्या प्रमाणावर काम केले जात आहे. प्रत्येक नागरिकात कष्ट करण्याची ताकद आहे. आत्मविश्वासाने समोर गेल्यास प्रत्येकजण आपले भविष्य चांगल्या पद्धतीने घडवू शकतो. यासाठी प्रयत्न आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी शासनाच्या विविध योजनेंतर्गत जिल्ह्यात होत असलेल्या कामांची माहिती दिली. घरकुल योजना, धडक सिंचन, वीज जोडणी आदी कामांना जिल्ह्यात गती आली असल्याचे ते म्हणाले. सुरुवातीस उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकातून त्यांनी शिबिराच्या आयोजनामागची भूमीका विषद केली. शिबिरानिमित्त सावळी सदोबा येथे विविध शासकीय कार्यालयांची माहिती देणारे स्वतंत्र दालणे लावण्यात आली होती. या प्रत्येक दालणास भेट देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी दालणांचे उद्घाटन करण्यासोबतच माहिती जाणून घेतली. (प्रतिनिधी)