शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

कंत्राटी कर्मचाऱ्यांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:18 IST

जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत अनेक कंत्राटी कर्मचारी एकाच पंचायत समितीमध्ये ठाण मांडून बसले आहे. त्यांची बदली का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देसर्वशिक्षा अभियान : १२ वर्षांपासून एकाच ठिकाणी नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियानांतर्गत अनेक कंत्राटी कर्मचारी एकाच पंचायत समितीमध्ये ठाण मांडून बसले आहे. त्यांची बदली का केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.२००६ पासून सर्वशिक्षा अभियान राबविले जात आहे. त्यासाठी अनेकांना कंत्राटी कर्मचारी म्हणून नियुक्ती देण्यात आली. मात्र १२ वर्षांपासून काही पंचायत समितींमध्ये हे कंत्राटी कर्मचारी ठाण मांडून बसले आहे. त्यांची एकदाही बदली करण्यात आली नाही. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता विकासावर परिणाम होत असल्याची ओरड होत आहे. १२ वर्षांपासून एकाच पंचायत समितीत ठाण मांडून बसल्यामुळे या कर्मचाऱ्यांचे अनेक शिक्षकांशी स्रेहाचे संबंध निर्माण झाले आहे. यातून हे कर्मचारी प्रत्यक्षात शाळांना भेट न देता घरूनच गुणवत्तावाढीचे काम करीत असल्याची ओरड होत आहे.जिल्ह्यातील यवतमाळ, कळंब, बाभूळगाव आदी तालुक्यातील हे साधन व्यक्ती शाळा भेटीला जातच नाही, अशी ओरड सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी केल्यास सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे. कंत्राटी कर्मचाºयांना दरवर्षी नियुक्ती आदेश दिले जाते. मात्र १२ वर्षांपासून त्यांना एकच पंचायत समिती मिळत असल्याने ते निर्धास्त झाले आहे. सध्या नवनियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परभणी जिल्हा परिषदेने त्याबाबत परिपत्रकही जाहीर केले आहे.मात्र येथील सर्वशिक्षा अभियान नवनियुक्ती आदेश देण्यापूर्वी संबंधितांच्या बदल्या करतील का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेषत: तीन तालुक्यातील साधन व्यक्तींची बदली होत नसल्याने इतर तालुक्यातील साधन व्यक्तींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तथापि, शिक्षण विभाग मात्र या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पाठिशी घालत असल्याचे दिसून येत आहे.अध्यक्षांनी दिले सीईओंना पत्रकाही तालुक्यातील साधन व्यक्ती १२ वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून असल्याने जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे यांनी त्यांच्या बदल्या करण्यासंबंधीचे पत्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती आहे. नवनियुक्ती आदेश देण्यापूर्वी परभणी जिल्हा परिषदेप्रमाणे यवतमाळनेही बदल्यांचा निर्णय घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली आहे. या पत्राचे बुधवारी होणाºया स्थायी समिती सभेत पडसाद उमटण्याची शक्यता आहे.