शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

‘मजीप्रा’तील ३० कर्मचाऱ्यांची शासनाविरुध्द अवमान याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 16:08 IST

Yawatmal News 'Majipra' Court ‘मजीप्रा’तील ३० कर्मचाऱ्यांनी सरकारविरुध्द अवमान याचिका दाखल केली आहे. मजीप्राच्या सदस्य सचिवांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊनही लाभ नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जात नसल्याने ‘मजीप्रा’तील ३० कर्मचाऱ्यांनी सरकारविरुध्द अवमान याचिका दाखल केली आहे. मजीप्राच्या सदस्य सचिवांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशातील बहुतांश बाबींचे लाभ देण्यात आले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे.शासनाकडून प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जात नसल्याने कर्मचाऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. यावर १९ सप्टेंबर २०१८ रोजी कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय देण्यात आला. यातील काही लाभ कर्मचाऱ्यांना मिळाले. परंतु २००६ ते २००९ या काळात सुधारीत दराने निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन, वाढीव वाहतूक भत्ता, २३ वर्षांची कालबध्द पदोन्नती आदी लाभापासून कर्मचाऱ्यांना वंचित ठेवले. हे सर्व लाभ दिले जातील, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात देण्यात आले. प्रत्यक्षात र्पूतता झाली नाही.नगरविकास विभागाच्या ३१ ऑगस्ट १९८१ आणि २ ऑक्टोबर १९८१ च्या शासन निर्णयात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे सर्व लाभ मजीप्रा कर्मचाऱ्यांनाही देण्यात यावे, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांकडून मात्र यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना न्यायालयाचे दार ठोठावले. आदेशानंतरही पालन होत नाही. अवमान याचिकेत महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव, वित्त विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव आदींना प्रतिवादी करण्यात आले आहे.‘मजीप्रा’ने ८० कोटी वाटलेउच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला २०० कोटी रुपये जानेवारी २०२० मध्ये दिले. यातील केवळ ८० कोटी रुपये कर्मचाºयांना देण्यात आले. उर्वरित रक्कम इतरत्र वापरण्यात आली. कर्मचाऱ्यांसाठी दिलेल्या पैशाचा उपयोग त्यांच्याचसाठी करावा, असे मत व्यक्त होत आहे.कायद्याच्या चौकटीत राहूनच लाभ मागितले जात आहे. त्यालाही शासनाची नकारघंटा आहे. त्यामुळेच न्यायालयात जावे लागले.आर.एन. विठाळकर, सरचिटणीस‘मजीप्रा’ निवृत्त कर्मचारी संघटना

टॅग्स :Maharahtra Jivan Pradhikaranमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणCourtन्यायालय