शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

‘मजीप्रा’तील ३० कर्मचाऱ्यांची शासनाविरुध्द अवमान याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 16:08 IST

Yawatmal News 'Majipra' Court ‘मजीप्रा’तील ३० कर्मचाऱ्यांनी सरकारविरुध्द अवमान याचिका दाखल केली आहे. मजीप्राच्या सदस्य सचिवांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊनही लाभ नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जात नसल्याने ‘मजीप्रा’तील ३० कर्मचाऱ्यांनी सरकारविरुध्द अवमान याचिका दाखल केली आहे. मजीप्राच्या सदस्य सचिवांनाही प्रतिवादी करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशातील बहुतांश बाबींचे लाभ देण्यात आले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ही भूमिका घेतली आहे.शासनाकडून प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जात नसल्याने कर्मचाऱ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. यावर १९ सप्टेंबर २०१८ रोजी कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय देण्यात आला. यातील काही लाभ कर्मचाऱ्यांना मिळाले. परंतु २००६ ते २००९ या काळात सुधारीत दराने निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन, वाढीव वाहतूक भत्ता, २३ वर्षांची कालबध्द पदोन्नती आदी लाभापासून कर्मचाऱ्यांना वंचित ठेवले. हे सर्व लाभ दिले जातील, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात देण्यात आले. प्रत्यक्षात र्पूतता झाली नाही.नगरविकास विभागाच्या ३१ ऑगस्ट १९८१ आणि २ ऑक्टोबर १९८१ च्या शासन निर्णयात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे सर्व लाभ मजीप्रा कर्मचाऱ्यांनाही देण्यात यावे, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांकडून मात्र यासाठी टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना न्यायालयाचे दार ठोठावले. आदेशानंतरही पालन होत नाही. अवमान याचिकेत महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव, वित्त विभागाचे प्रधान सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव आदींना प्रतिवादी करण्यात आले आहे.‘मजीप्रा’ने ८० कोटी वाटलेउच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला २०० कोटी रुपये जानेवारी २०२० मध्ये दिले. यातील केवळ ८० कोटी रुपये कर्मचाºयांना देण्यात आले. उर्वरित रक्कम इतरत्र वापरण्यात आली. कर्मचाऱ्यांसाठी दिलेल्या पैशाचा उपयोग त्यांच्याचसाठी करावा, असे मत व्यक्त होत आहे.कायद्याच्या चौकटीत राहूनच लाभ मागितले जात आहे. त्यालाही शासनाची नकारघंटा आहे. त्यामुळेच न्यायालयात जावे लागले.आर.एन. विठाळकर, सरचिटणीस‘मजीप्रा’ निवृत्त कर्मचारी संघटना

टॅग्स :Maharahtra Jivan Pradhikaranमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणCourtन्यायालय