शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

वणीत विनापरवाना टोलचे बांधकाम

By admin | Updated: January 11, 2017 00:42 IST

करंजी ते चंद्रपूर या मार्गाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीने वणीत पालिकेची कोणतीही परवानगी न घेता टोल नाक्याचे बांधकाम केले

वसुली सुरू : प्रकरण पोहोचले सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या दरबारात वणी : करंजी ते चंद्रपूर या मार्गाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीने वणीत पालिकेची कोणतीही परवानगी न घेता टोल नाक्याचे बांधकाम केले असून त्यामुळे पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याविषयात पालिकेने संबंधित कंपनीशी अनेकदा पत्र व्यवहार केला. मात्र कंपनीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. विशेष म्हणजे हे प्रकरण आता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात पोहचले आहे. त्यामुळे या विषयात काय कार्यवाही होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. करंजी ते चंद्रपूर व्हाया वणी या रस्त्याच्या कामाचे कंत्राट चंद्रपूर येथील आयव्हीआरसीएल या कंपनीकडे आहे. या कंपनीने वरोरा मार्गावरील रेल्वे गेट ते लालगुडा रस्त्यावर टोल नाका उभारला आहे. सदर मार्ग वणी नगरपरिषदेच्या हद्दीतून जात असल्यामुळे व वणी हद्दीत टोल नाका उभारताना कंपनीने पालिकेची परवानगी घेणे आवश्यक होती. मात्र सदर कंपनीने बांधकाम करताना अशी कोणतीही परवानगी घेतली नाही. परिणामी वणी पालिकेला अडीच लाख रुपयांचा करापोटी फटका बसला. त्यापेक्षाही गंभीर बाब ही की, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या कंपनीने भोगवटा प्रमाणपत्रदेखील घेतले नाही. अशाही परिस्थितीत संबंधित कंत्राटदाराने टोल टॅक्स वसुली सुरू केली आहे. याबाबत माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक पी.के.टोंगे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह बांधकाम विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत. हा मार्ग महाराष्ट्र शासनाच्या निधीतून बांधण्यात आला आहे. कार तथा लहान चार चाकी वाहनांना येथे टोल टॅक्स लागू नाही. त्यामुळे अशा वाहनांना तेथून जाण्यासाठी वेगळा मार्ग तयार करणे गरजेचे होते. मात्र कंत्राटदाराने हा रस्ता ड्रम आडवे टाकून बंद केला आहे. त्यामुळे टोल फ्री वाहनांचा खोळंबा होत आहे. हा रस्ता बंद करण्याची परवानगी कंत्राटदाराला कुणी दिली, असा सवाल तक्रारीतून उपस्थित करण्यात आला आहे. या संदर्भात नगरपालिेकेने आयव्हीआरसीएल कंपनीच्या व्यवस्थापकांना १८ मार्च २०१६ ला पत्र लिहून बांधकाम परवानगी घेण्याबाबत कळविले. मात्र कंपनीने बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रेच सादर केली नाहीत. त्याबाबतही पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी कंपनीला कळविले. मात्र अद्यापही कंपनीने कागदपत्रांची पूर्तता केली नाही. कंपनी म्हणते, आम्ही प्रक्रिया पूर्ण करायला तयार वणी नगरपालिकेने कंपनीला नोटीस बजावल्यानंतर कंपनीने पत्राद्वारे आपली बाजू मांडली. टोल प्लाझाचे बांधकाम करताना पालिकेची परवानगी घ्यावी लागते, ही बाब आम्हाला माहित नव्हती. मात्र सदर बांधकाम पांढरकवडा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या आदेशाने सुरू करण्यात आले, असे कंपनीने पत्रात म्हटले आहे. या उपरांतही परवानगी मिळविण्यासाठी आवश्यक असलेले सर्व सोपस्कर पूर्ण करण्यास कंपनी तयार आहे, असे कंपनीने पत्रातून स्पष्ट केले आहे. या पत्रानंतर वणी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पुन्हा पत्र पाठवून कोणकोणती कागदपत्रे सादर करायची, ते कळविले. मात्र अद्यापही कंपनीने वणी नगरपालिकेकडे कागदपत्रे सादर केली नाहीत.