शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

रूई येथील सभागृहाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 05:00 IST

रुई येथे महादजीबुवा संस्थानच्या सभागृहाचे बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे सुरु आहे. या सभागृहासाठी शासनाने २५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. निधीनंतर रितसर निविदा प्रक्रिया काढण्यात आली. त्यातून एका कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली. मात्र कंत्राटदार बांधकामासाठी दर्जाहिन विटा, वाळू व लोखंडाचा वापर करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. वाळू ऐवजी सर्रास चुरीचा वापर केला जात आहे. इतर साहित्यसुद्धा दर्जाहीन आहे.

ठळक मुद्देसरपंचासह ग्रामस्थांची तक्रार : गुणनियंत्रण विभागामार्फत चौकशी करा

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : तालुक्यातील रुई (मोठी) येथील महादजीबुवा संस्थानच्या सभागृहाचे बांधकाम सुरू आहे. मात्र हे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून त्यात अनियमितता असल्याचा आरोप सरपंचासह ग्रामस्थांनी केला आहे. या कामाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी तक्रारीतून केली आहे.रुई येथे महादजीबुवा संस्थानच्या सभागृहाचे बांधकाम जिल्हा परिषद बांधकाम विभागातर्फे सुरु आहे. या सभागृहासाठी शासनाने २५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. निधीनंतर रितसर निविदा प्रक्रिया काढण्यात आली. त्यातून एका कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली.मात्र कंत्राटदार बांधकामासाठी दर्जाहिन विटा, वाळू व लोखंडाचा वापर करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. वाळू ऐवजी सर्रास चुरीचा वापर केला जात आहे. इतर साहित्यसुद्धा दर्जाहीन आहे.याबाबत सरपंच राजेश हटकर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली आहे. या तक्रारीतून बांधकामाची गुणनियंत्रण विभागामार्फत त्वरित चौकशी करण्याची मागणी केली. तसेच सदर कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून दुसऱ्या कंत्राटदाराची नेमणूक करावी, अशीही मागणी केली. सरपंच राजेश हटकर, विष्णूपंत यादव, श्रीरंग इंगोले, रमेश गोदमले, भीमराव ढगे, धनराज हटकर, आकाश खेकाडे, नारायण डहाणे, नरेश डहाणे, शिवराम गोदमले, साहेबराव मिरासे, सुभाष गोदमले, गजानन नांदे, किशोर यादव, शंकर गरडे, मनोज हाळसे, तुकाराम खंदारे, गजानन हजारे, आकाश काळे, प्रेम लावरे आदींसह ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व गुणनियंत्रण विभागाकडे तक्रार केली आहे.अधिकारी एकदाही फिरकले नाहीजिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत हे बांधकाम केले जात आहे. देवस्थानचे सभागृह असल्याने गावकऱ्यांना त्याबद्दल उत्सुकता आहे. त्यामुळे गावकरी आपल्या परीने बांधकामाला हातभार लावत आहे. मात्र संबंधित अधिकारी एकदाही या बांधकामाकडे फिरकले नाही. अभियंत्यांनीसुद्धा भेट दिली नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Socialसामाजिक