शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

पुलांचे बांधकाम ठरले वादग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:00 IST

सुरूवातीला या तिनही मार्गावर येणारे जुने पूल तोडून, तर काही ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम, पाईप टाकणे तसेच ठिकठिकाणी मोऱ्या तयार करण्याचे काम करण्यात आले. पुलांचे बांधकाम करताना बांधकामाच्या बाजूने वळण रस्ते काढण्यात आले. परंतु राज्यमार्ग दर्जाचे निकषाप्रमाणे आवश्यक रुंदीचे खडीकरण करुन सर्व ठिकाणी सूचना फलक लावलेले रस्ते तयार करण्यात आले नाही.

ठळक मुद्देदारव्हा तालुका : निकष डावलून कामे, वाहनधारक त्रस्त, अपघाताची शक्यता

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यात राज्य मार्गावरील पुलांचे बांधकाम निकषाप्रमाणे वळण रस्ते न करताच सुरू करण्यात आले आहे. याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या आहे. काही पुलांवरुन आता वाहतूक सुरु झाली. निमार्णाधीन पुलांच्या बाजूला वळण रस्तेही काढण्यात आले. मात्र दोन्ही कच्चे रस्ते असल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून अपघाताची शक्यता बळावली आहे.कोणत्याही रस्त्यावरील पुलांचे बांधकाम करताना किमान खडीकरण, आवश्यक रुंदी व योग्य सूचनाफलक असलेले वळण रस्ते तयार करणे आवश्यक आहे. परंतु यवतमाळ, नेरसह कुपटा रस्त्यावरील कामात नियमांना बगल देण्यात आल्याचे सांगितले जाते. दारव्हा ते यवतमाळ ३९ किलोमीटर, दारव्हा-नेर २४ किलोमीटर आणि दारव्हा-कुपटा फाटा २३ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण, खडीकरण व डांबरीकरणाचे काम सुरु आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात पुलांची संख्या आहे. सुरूवातीला या तिनही मार्गावर येणारे जुने पूल तोडून, तर काही ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम, पाईप टाकणे तसेच ठिकठिकाणी मोऱ्या तयार करण्याचे काम करण्यात आले.पुलांचे बांधकाम करताना बांधकामाच्या बाजूने वळण रस्ते काढण्यात आले. परंतु राज्यमार्ग दर्जाचे निकषाप्रमाणे आवश्यक रुंदीचे खडीकरण करुन सर्व ठिकाणी सूचना फलक लावलेले रस्ते तयार करण्यात आले नाही. त्याऐवजी थातुरमातुर रस्ता काढून त्यावर साईड शोल्डरच्या खोदकामातील माती टाकण्यात आल्याची तक्रार आहे. त्याचबरोबर काही बांधकामाच्या ठिकाणी रिबीनसुद्धा लावण्यात आले नाही. याप्रमाणे रस्त्यावरुन जाणाºया वाहनधारकांना त्रास होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली नाही. तिनही मार्गावरील बांधकाम झालेल्या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र पुलावर माती तशीच आहे. बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळ कच्चे रस्ते पाहायला मिळतात. त्यामुळे वाहनधारकांना कच्च्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. कच्च्या रस्त्यामुळे धुळीचा त्रास होतो. रात्री बांधकाम लक्षात न आल्यास अपघात होण्याची भीती आहे. सध्या पावसामुळे या रस्त्यावर चिखल होत असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच वाहन घसरुन अपघाताची शक्यता बाळावली आहे.एवढा सगळा त्रास होत असताना कंत्राटदार कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत आहे. खुलेआमपणे हा गंभीर प्रकार सुरु असून या कामावर नियंत्रण असणारी यंत्रणा मुग गिळून का बसली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अत्यंत वर्दळीच्या या रस्त्यांवर हलगर्जीपणा होत असल्याने प्रवास करताना एखाद्या वाहनधारकाच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.बांधकामाच्या चौकशीची मागणीनागरिकांच्या तक्रारीनंतर बांधकाम झालेल्या पुलावरून वाहतूक सुरु करण्यात आली. मात्र त्या ठिकाणी माती तशीच पडून आहे. निमार्णाधीन पुलाशेजारी कच्चा वळण रस्ता आहे. या कामांची चौकशी झाल्यास सत्यता बाहेर येईल. त्यामुळे सदर सर्व वळण रस्ते राज्यमार्ग दर्जाच्या निकषाप्रमाणे झाले का, याची प्रशासकीय यंत्रणेने तपासणी करुन नियमानुसार संबंधितांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग