शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

पुलांचे बांधकाम ठरले वादग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:00 IST

सुरूवातीला या तिनही मार्गावर येणारे जुने पूल तोडून, तर काही ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम, पाईप टाकणे तसेच ठिकठिकाणी मोऱ्या तयार करण्याचे काम करण्यात आले. पुलांचे बांधकाम करताना बांधकामाच्या बाजूने वळण रस्ते काढण्यात आले. परंतु राज्यमार्ग दर्जाचे निकषाप्रमाणे आवश्यक रुंदीचे खडीकरण करुन सर्व ठिकाणी सूचना फलक लावलेले रस्ते तयार करण्यात आले नाही.

ठळक मुद्देदारव्हा तालुका : निकष डावलून कामे, वाहनधारक त्रस्त, अपघाताची शक्यता

मुकेश इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यात राज्य मार्गावरील पुलांचे बांधकाम निकषाप्रमाणे वळण रस्ते न करताच सुरू करण्यात आले आहे. याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या आहे. काही पुलांवरुन आता वाहतूक सुरु झाली. निमार्णाधीन पुलांच्या बाजूला वळण रस्तेही काढण्यात आले. मात्र दोन्ही कच्चे रस्ते असल्याने वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून अपघाताची शक्यता बळावली आहे.कोणत्याही रस्त्यावरील पुलांचे बांधकाम करताना किमान खडीकरण, आवश्यक रुंदी व योग्य सूचनाफलक असलेले वळण रस्ते तयार करणे आवश्यक आहे. परंतु यवतमाळ, नेरसह कुपटा रस्त्यावरील कामात नियमांना बगल देण्यात आल्याचे सांगितले जाते. दारव्हा ते यवतमाळ ३९ किलोमीटर, दारव्हा-नेर २४ किलोमीटर आणि दारव्हा-कुपटा फाटा २३ किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण, खडीकरण व डांबरीकरणाचे काम सुरु आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात पुलांची संख्या आहे. सुरूवातीला या तिनही मार्गावर येणारे जुने पूल तोडून, तर काही ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम, पाईप टाकणे तसेच ठिकठिकाणी मोऱ्या तयार करण्याचे काम करण्यात आले.पुलांचे बांधकाम करताना बांधकामाच्या बाजूने वळण रस्ते काढण्यात आले. परंतु राज्यमार्ग दर्जाचे निकषाप्रमाणे आवश्यक रुंदीचे खडीकरण करुन सर्व ठिकाणी सूचना फलक लावलेले रस्ते तयार करण्यात आले नाही. त्याऐवजी थातुरमातुर रस्ता काढून त्यावर साईड शोल्डरच्या खोदकामातील माती टाकण्यात आल्याची तक्रार आहे. त्याचबरोबर काही बांधकामाच्या ठिकाणी रिबीनसुद्धा लावण्यात आले नाही. याप्रमाणे रस्त्यावरुन जाणाºया वाहनधारकांना त्रास होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात आली नाही. तिनही मार्गावरील बांधकाम झालेल्या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र पुलावर माती तशीच आहे. बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळ कच्चे रस्ते पाहायला मिळतात. त्यामुळे वाहनधारकांना कच्च्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. कच्च्या रस्त्यामुळे धुळीचा त्रास होतो. रात्री बांधकाम लक्षात न आल्यास अपघात होण्याची भीती आहे. सध्या पावसामुळे या रस्त्यावर चिखल होत असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच वाहन घसरुन अपघाताची शक्यता बाळावली आहे.एवढा सगळा त्रास होत असताना कंत्राटदार कंपनीचे याकडे दुर्लक्ष होत आहे. खुलेआमपणे हा गंभीर प्रकार सुरु असून या कामावर नियंत्रण असणारी यंत्रणा मुग गिळून का बसली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. अत्यंत वर्दळीच्या या रस्त्यांवर हलगर्जीपणा होत असल्याने प्रवास करताना एखाद्या वाहनधारकाच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.बांधकामाच्या चौकशीची मागणीनागरिकांच्या तक्रारीनंतर बांधकाम झालेल्या पुलावरून वाहतूक सुरु करण्यात आली. मात्र त्या ठिकाणी माती तशीच पडून आहे. निमार्णाधीन पुलाशेजारी कच्चा वळण रस्ता आहे. या कामांची चौकशी झाल्यास सत्यता बाहेर येईल. त्यामुळे सदर सर्व वळण रस्ते राज्यमार्ग दर्जाच्या निकषाप्रमाणे झाले का, याची प्रशासकीय यंत्रणेने तपासणी करुन नियमानुसार संबंधितांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग