शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

राहुल गांधीवरील दडपशाहीचा मुद्दा कॉंग्रेस नेणार घराघरांत; जय भारत सत्याग्रह मोहीम

By विशाल सोनटक्के | Updated: March 31, 2023 12:04 IST

मोदी-अदानी संबंधांवर प्रश्न विचारणारी पोस्ट कार्डही पाठविणार

यवतमाळ : राहुल गांधी यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर अवघ्या २४ तासांत त्यांच्या खासदारकी रद्दचे नोटिफिकेशनही निघाले. हा सत्तेचा दुरुपयोग असल्याचा आरोप करीत सरकारकडून होत असलेल्या विरोधकांसह राहुल गांधी यांच्या कोंडी विरोधात कॉंग्रेसकडून आता विशेष मोहीम राबविली जाणार आहे. या अंतर्गत राज्यभरात जय भारत सत्याग्रह करतानाच मोदी-अदानी संबंधांवर प्रश्न विचारणारी पोस्ट कार्डही कार्यकर्त्यांकडून लिहिली जाणार आहेत.

कर्नाटकातील कोलार येथील सभेत कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ललित मोदी, नीरव मोदी यांची नावे घेत सगळेच मोदी चोर कसे, असा सवाल केला होता. या वक्तव्याबाबत गुजरातमधील न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर २४ तासांतच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्दचे नोटिफिकेशनही निघाले. पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर अशा पद्धतीने कारवाई करून एकप्रकारे विरोधकांची कोंडी केली जात असल्याचा आरोप करीत कॉंग्रेसने या विरोधात विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

राहुल गांधी यांच्यावरील कारवाईनंतर नवी दिल्ली येथील लालकिल्ला येथून लोकतंत्र बचाओ, मशाल शांती मार्च काढण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ नेत्यांसह सुकाणू समितीचे सदस्य आणि खासदारही सहभागी झाले होते. त्यानंतर २८ आणि २९ मार्च रोजी कॉंग्रेसने देशभरातील ३५ प्रमुख शहरांमध्ये राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांची पत्रकार परिषद घेतली. आता पुढचा टप्पा म्हणून पक्षातर्फे जय भारत सत्याग्रह हाती घेण्यात आला आहे. ८ एप्रिलपर्यंत हे आंदोलन करण्यात येणार असून, या अंतर्गत ब्लॉक तसेच मंडल स्तरावर चौक सभा घेऊन जनतेला संबोधित करण्यात येणार आहे. त्याचवेळी समाज माध्यमांवर राहुल गांधी यांचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची मोहीम राबविली जाणार आहे.

अन्यायाविरुद्ध नेता-पदाधिकारी बोलणार

या मोहिमेंतर्गत शुक्रवार ३१ मार्च रोजी जिल्हा मुख्यालय स्तरावर कॉंग्रेसचे राज्यस्तरीय नेते पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांच्यावरील अन्यायाचा मुद्दा मांडतील. शनिवार १ एप्रिल रोजी प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक नेते ब्लॉकनिहाय पत्रकार परिषद घेतील. त्याचवेळी एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक विभागाच्या वतीने मुंबई येथे निदर्शने करण्यात येतील. ३ एप्रिलपासून युवक कॉंग्रेस, तसेच विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने पोस्ट कार्ड मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर महिला कॉंग्रेसच्या वतीने दिल्ली येथे निदर्शनेही करण्यात येणार आहेत तर १५ ते २० एप्रिल या काळात जिल्हा मुख्यालयात एकाच वेळी जय भारत सत्याग्रह बैठक आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव आंदोलन करण्यात येणार आहे.

काॅंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निर्देशानुसार राज्यात कॉंग्रेसतर्फे ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. मोदी-अदानी यांनी चालविलेल्या राष्ट्रीय संपत्तीच्या लुटीविरुद्ध राहुल गांधी यांच्या लढाईत त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहण्यासाठी पक्षातर्फे हे आंदोलन करण्यात येणार आहे. या माध्यमातून राहुल गांधी यांच्यासह विरोधकांवर केंद्र सरकाराकडून होत असलेल्या दडपशाहीचा मुद्दा आम्ही जनतेत घेऊन जाणार आहोत.

- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी