शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा तालुक्यात काँग्रेसची पुर्ववैभवासाठी धडपड;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:48 IST

बैठका, मेळावे, आंदोलनाने कार्यकर्ते झाले सक्रिय दारव्हा : तालुक्यात कमकुवत झालेल्या काँग्रेसने पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी तयारी सुरू केल्याचे ...

बैठका, मेळावे, आंदोलनाने कार्यकर्ते झाले सक्रिय

दारव्हा : तालुक्यात कमकुवत झालेल्या काँग्रेसने पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी तयारी सुरू केल्याचे दिसून येते. प्रदीर्घ कालावधीनंतर विविध उपक्रमांमुळे नेते, कार्यकर्त्यांची सक्रियता वाढली आहे. पक्षाला पूर्ववैभव प्राप्त करण्यासाठी ही धडपड असून, यात पक्ष कितपत यशस्वी होईल, हे येणारा काळच ठरवणार आहे.

एकेकाळी हा तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. १९६७ व १९७८ ची विधानसभा निवडणूक सोडली, तर १९६२ पासून काँग्रेसचेच वर्चस्व राहिले. परंतु २००४ च्या निवडणुकीत संजय राठोड यांनी तब्बल २० वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला आणि काँग्रेसच्या या किल्ल्याचा बुरुज ढासळायला सुरुवात झाली. फेररचनेत दिग्रस मतदार संघ झाल्यानंतर दोनदा काँग्रेस, एकदा राष्ट्रवादी तसेच वर्तमान लोकसभा निवडणुकीतही पक्षाचा पराभव झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांसह सहकार क्षेत्रातसुध्दा पिछेहाट झाली. यामुळे काँग्रेसची अवस्था बिकट झाली होती. परंतु सध्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारात काँग्रेसची घोडदौड सुरू आहे.

पक्षांतर्गत कार्यक्रम, कार्यकर्ता बैठका, मेळाव्याचे आयोजन शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने केले जात आहे. पक्ष लाईमलाईट ठेवला जात असल्याने त्याचा लाभ होताना दिसत आहे. अपवाद वगळता अनेक स्थानिक नेते काँग्रेसमधे टिकून आहेत. माणिकराव ठाकरे यांच्यासारखे अनुभवी नेतृत्व, प्रत्येक गावात कार्यकर्ते, युवकांची फळी, अनेक ग्रामपंचायत, सोसायटीवर वर्चस्व या पक्षाच्या जमेच्या बाजू आहे.

आगामी संस्थांच्या निवडणुकीसाठी मेळावा घेऊन काँग्रेसने आघाडी घेतली आहे. यावेळी माणिकराव ठाकरे यांनी जोश भरल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. आता या सर्व बाबींचा पक्षाला लाभ होतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बाॅक्स

सत्तेच्या लाभापासून वंचित

राज्यात सत्तेत सहभाग असला, तरी तालुक्यात मात्र काँग्रेस सत्तेच्या लाभापासून वंचित आहे. मंडळ, महामंडळ सोडा, साध्या तालुका समित्यांवर कुणालाही संधी मिळाली नाही. कोणतीही कामे होत नसल्याचे शल्य आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांना सामावून घेतल्यास पक्षाची ताकद वाढेल, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहे.

कोट

तालुक्यात काँग्रेसचे संघटन मजबूत आहे. विविध उपक्रम राबवून चालना दिल्याने सक्रियता वाढली. पक्षाची स्थिती सुधारल्याने येणाऱ्या निवडणुकांत चांगला फायदा होईल

प्रकाश नवरंगे, तालुकाध्यक्ष, काँग्रेस दारव्हा