शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

दारव्हा तालुक्यात काँग्रेसची पुर्ववैभवासाठी धडपड;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:48 IST

बैठका, मेळावे, आंदोलनाने कार्यकर्ते झाले सक्रिय दारव्हा : तालुक्यात कमकुवत झालेल्या काँग्रेसने पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी तयारी सुरू केल्याचे ...

बैठका, मेळावे, आंदोलनाने कार्यकर्ते झाले सक्रिय

दारव्हा : तालुक्यात कमकुवत झालेल्या काँग्रेसने पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी तयारी सुरू केल्याचे दिसून येते. प्रदीर्घ कालावधीनंतर विविध उपक्रमांमुळे नेते, कार्यकर्त्यांची सक्रियता वाढली आहे. पक्षाला पूर्ववैभव प्राप्त करण्यासाठी ही धडपड असून, यात पक्ष कितपत यशस्वी होईल, हे येणारा काळच ठरवणार आहे.

एकेकाळी हा तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. १९६७ व १९७८ ची विधानसभा निवडणूक सोडली, तर १९६२ पासून काँग्रेसचेच वर्चस्व राहिले. परंतु २००४ च्या निवडणुकीत संजय राठोड यांनी तब्बल २० वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेल्या माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला आणि काँग्रेसच्या या किल्ल्याचा बुरुज ढासळायला सुरुवात झाली. फेररचनेत दिग्रस मतदार संघ झाल्यानंतर दोनदा काँग्रेस, एकदा राष्ट्रवादी तसेच वर्तमान लोकसभा निवडणुकीतही पक्षाचा पराभव झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांसह सहकार क्षेत्रातसुध्दा पिछेहाट झाली. यामुळे काँग्रेसची अवस्था बिकट झाली होती. परंतु सध्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पुढाकारात काँग्रेसची घोडदौड सुरू आहे.

पक्षांतर्गत कार्यक्रम, कार्यकर्ता बैठका, मेळाव्याचे आयोजन शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने केले जात आहे. पक्ष लाईमलाईट ठेवला जात असल्याने त्याचा लाभ होताना दिसत आहे. अपवाद वगळता अनेक स्थानिक नेते काँग्रेसमधे टिकून आहेत. माणिकराव ठाकरे यांच्यासारखे अनुभवी नेतृत्व, प्रत्येक गावात कार्यकर्ते, युवकांची फळी, अनेक ग्रामपंचायत, सोसायटीवर वर्चस्व या पक्षाच्या जमेच्या बाजू आहे.

आगामी संस्थांच्या निवडणुकीसाठी मेळावा घेऊन काँग्रेसने आघाडी घेतली आहे. यावेळी माणिकराव ठाकरे यांनी जोश भरल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. आता या सर्व बाबींचा पक्षाला लाभ होतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बाॅक्स

सत्तेच्या लाभापासून वंचित

राज्यात सत्तेत सहभाग असला, तरी तालुक्यात मात्र काँग्रेस सत्तेच्या लाभापासून वंचित आहे. मंडळ, महामंडळ सोडा, साध्या तालुका समित्यांवर कुणालाही संधी मिळाली नाही. कोणतीही कामे होत नसल्याचे शल्य आहे. प्रमुख पदाधिकाऱ्यांना सामावून घेतल्यास पक्षाची ताकद वाढेल, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या आहे.

कोट

तालुक्यात काँग्रेसचे संघटन मजबूत आहे. विविध उपक्रम राबवून चालना दिल्याने सक्रियता वाढली. पक्षाची स्थिती सुधारल्याने येणाऱ्या निवडणुकांत चांगला फायदा होईल

प्रकाश नवरंगे, तालुकाध्यक्ष, काँग्रेस दारव्हा