शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
5
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
6
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
7
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
8
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
9
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
10
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
11
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
12
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
13
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
14
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
15
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
16
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
17
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
18
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
19
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
20
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन

गृहजिल्ह्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची कसोटी

By admin | Updated: October 9, 2014 23:10 IST

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांची आपल्या यवतमाळ या गृहजिल्ह्यातच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पक्षाच्या सातही जागा निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्यापुढे राहणार आहे.

यवतमाळ : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांची आपल्या यवतमाळ या गृहजिल्ह्यातच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पक्षाच्या सातही जागा निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्यापुढे राहणार आहे. त्यातच मुलगा राहूलच्या उमेदवारीने जणू माणिकरावांच्या राजकीय अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. माणिकरावांनी सातही मतदारसंघात पक्षाचे स्टार प्रचारक व अन्य वरिष्ठ नेत्यांच्या जाहीर सभा, रोड शो, प्रचार रॅली याचे नियोजन करणे अपेक्षित आहे. स्वत: माणिकरावांनी सातही मतदारसंघात भेटी देऊन काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात माणिकराव ठाकरे यांनी जिल्ह्यातील उमरखेडपासून वणीपर्यंतचे सहा विधानसभा मतदारसंघ जणू वाऱ्यावर सोडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. माणिकराव आपली संपूर्ण शक्ती केवळ यवतमाळातच वापरत आहे. कारण त्यांचा मुलगा राहुल ठाकरे येथून काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवित आहे. माणिकरावांनी येथील विद्यमान आमदार नंदिनी नीलेश पारवेकर यांचे तिकीट अखेरच्या क्षणी कापले. नंदिनींच्या तिकीटासाठी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, शिवराज पाटील चाकुरकर, जितेंद्र सिंग यांनी दिल्लीत पक्ष श्रेष्ठींकडे अखेरपर्यंत प्रयत्न केले. नंदिनी नीलेश पारवेकरांचे तिकीट कापण्यास खासदार विजय दर्डा यांनी तीव्र विरोध केला होता. केवळ नंदिनी पारवेकरांचेच तिकीट कापत असाल तर योग्य नाही, अशी भूमिका दर्डा यांनी घेतली. सर्वत्रच उमेदवारात बदल होत असतील आणि नंदिनी पारवेकरांमध्ये इलेक्टीव्ह मेरिट नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांचा पर्याय उपलब्ध आहे, असे विजय दर्डा यांनी पक्ष श्रेष्ठींना सूचविले होते, हे विशेष! मात्र अखेरच्या क्षणी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची धमकी देऊन मुलगा राहुलसाठी माणिकरावांनी यवतमाळचे तिकीट खेचून आणले. आता तिकीट आणले मात्र विजयाचे काय, असा प्रश्न आहे. जिल्ह्यात काँग्रेसने रिपीट केलेले सर्वच उमेदवार निवडून येतील काय?, स्वत: माणिकराव मुलगा राहुलच्या विजयाची शंभर टक्के खात्री देऊ शकतात काय ?, असे प्रश्न कार्यकर्त्यांमधून उपस्थित केले जात आहेत. मुलाच्या विजयासाठी माणिकराव महाराष्ट्र आणि यवतमाळ जिल्हा हे आपले कार्यक्षेत्र बाजूला ठेऊन केवळ यवतमाळ मतदारसंघात फिरत आहेत. वॉर्डावॉर्डातील लहान-मोठ्या नेत्यांच्या घरी भेटी देताना माणिकराव दिसत आहे. यावरून त्यांना मुलाच्या विजयाची पक्की खात्री नसल्याचे व मतदार काँग्रेसवर नाराज असल्याचे जाणवते. माणिकरावांनी पुत्रप्रेमापोटी अन्य पक्षातीलही पदाधिकाऱ्यांना आपल्या राजकीय ‘शक्ती’च्या बळावर फितूर करण्याचा प्रयत्न चालविला आहे. माणिकराव केवळ यवतमाळ मतदारसंघात लक्ष देत असल्याने काँग्रेसच्या अन्य उमेदवारांमधून नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. माणिकरावांनी आपल्या दिग्रस-दारव्हा या गृह मतदारसंघाकडेही पाठ फिरविली आहे. सहा महिन्यांपूर्वी विद्यमान मंत्री-आमदार आणि त्यांच्या पुत्रांना विधानसभेची तिकीट काँग्रेसने देऊ नये म्हणून जाहीर भूमिका घेणाऱ्या दुसऱ्या फळीतील प्रमुख बंडखोरांपैकीच एकाला माणिकरावांनी आपल्या गृहमतदारसंघाचे काँग्रेसचे तिकीट दिले. मोघे विरोधक हा या तिकिटासाठीचा मुख्य निकष होता, हे विशेष.