शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
3
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
4
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
5
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
6
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
7
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
8
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
9
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
10
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
11
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
12
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
13
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
14
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
15
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
16
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
17
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
18
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
19
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
20
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण

गृहजिल्ह्यातच काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची कसोटी

By admin | Updated: October 9, 2014 23:10 IST

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांची आपल्या यवतमाळ या गृहजिल्ह्यातच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पक्षाच्या सातही जागा निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्यापुढे राहणार आहे.

यवतमाळ : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांची आपल्या यवतमाळ या गृहजिल्ह्यातच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पक्षाच्या सातही जागा निवडून आणण्याचे आव्हान त्यांच्यापुढे राहणार आहे. त्यातच मुलगा राहूलच्या उमेदवारीने जणू माणिकरावांच्या राजकीय अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. माणिकरावांनी सातही मतदारसंघात पक्षाचे स्टार प्रचारक व अन्य वरिष्ठ नेत्यांच्या जाहीर सभा, रोड शो, प्रचार रॅली याचे नियोजन करणे अपेक्षित आहे. स्वत: माणिकरावांनी सातही मतदारसंघात भेटी देऊन काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात माणिकराव ठाकरे यांनी जिल्ह्यातील उमरखेडपासून वणीपर्यंतचे सहा विधानसभा मतदारसंघ जणू वाऱ्यावर सोडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. माणिकराव आपली संपूर्ण शक्ती केवळ यवतमाळातच वापरत आहे. कारण त्यांचा मुलगा राहुल ठाकरे येथून काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवित आहे. माणिकरावांनी येथील विद्यमान आमदार नंदिनी नीलेश पारवेकर यांचे तिकीट अखेरच्या क्षणी कापले. नंदिनींच्या तिकीटासाठी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, शिवराज पाटील चाकुरकर, जितेंद्र सिंग यांनी दिल्लीत पक्ष श्रेष्ठींकडे अखेरपर्यंत प्रयत्न केले. नंदिनी नीलेश पारवेकरांचे तिकीट कापण्यास खासदार विजय दर्डा यांनी तीव्र विरोध केला होता. केवळ नंदिनी पारवेकरांचेच तिकीट कापत असाल तर योग्य नाही, अशी भूमिका दर्डा यांनी घेतली. सर्वत्रच उमेदवारात बदल होत असतील आणि नंदिनी पारवेकरांमध्ये इलेक्टीव्ह मेरिट नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांचा पर्याय उपलब्ध आहे, असे विजय दर्डा यांनी पक्ष श्रेष्ठींना सूचविले होते, हे विशेष! मात्र अखेरच्या क्षणी दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची धमकी देऊन मुलगा राहुलसाठी माणिकरावांनी यवतमाळचे तिकीट खेचून आणले. आता तिकीट आणले मात्र विजयाचे काय, असा प्रश्न आहे. जिल्ह्यात काँग्रेसने रिपीट केलेले सर्वच उमेदवार निवडून येतील काय?, स्वत: माणिकराव मुलगा राहुलच्या विजयाची शंभर टक्के खात्री देऊ शकतात काय ?, असे प्रश्न कार्यकर्त्यांमधून उपस्थित केले जात आहेत. मुलाच्या विजयासाठी माणिकराव महाराष्ट्र आणि यवतमाळ जिल्हा हे आपले कार्यक्षेत्र बाजूला ठेऊन केवळ यवतमाळ मतदारसंघात फिरत आहेत. वॉर्डावॉर्डातील लहान-मोठ्या नेत्यांच्या घरी भेटी देताना माणिकराव दिसत आहे. यावरून त्यांना मुलाच्या विजयाची पक्की खात्री नसल्याचे व मतदार काँग्रेसवर नाराज असल्याचे जाणवते. माणिकरावांनी पुत्रप्रेमापोटी अन्य पक्षातीलही पदाधिकाऱ्यांना आपल्या राजकीय ‘शक्ती’च्या बळावर फितूर करण्याचा प्रयत्न चालविला आहे. माणिकराव केवळ यवतमाळ मतदारसंघात लक्ष देत असल्याने काँग्रेसच्या अन्य उमेदवारांमधून नाराजीचा सूर ऐकायला मिळत आहे. माणिकरावांनी आपल्या दिग्रस-दारव्हा या गृह मतदारसंघाकडेही पाठ फिरविली आहे. सहा महिन्यांपूर्वी विद्यमान मंत्री-आमदार आणि त्यांच्या पुत्रांना विधानसभेची तिकीट काँग्रेसने देऊ नये म्हणून जाहीर भूमिका घेणाऱ्या दुसऱ्या फळीतील प्रमुख बंडखोरांपैकीच एकाला माणिकरावांनी आपल्या गृहमतदारसंघाचे काँग्रेसचे तिकीट दिले. मोघे विरोधक हा या तिकिटासाठीचा मुख्य निकष होता, हे विशेष.