शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, राष्ट्रवादी, सेनेतील गटबाजीने भाजपाची सोय

By admin | Updated: July 14, 2017 01:44 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेतही उघड गटबाजी होत असल्याने सत्ताधारी भाजपाची आयतीच सोय झाली आहे.

विरोध करणार कोण ? : वर्चस्वाची लढाई, पक्षातच शक्ती खर्चीलोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : काँग्रेस, राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेतही उघड गटबाजी होत असल्याने सत्ताधारी भाजपाची आयतीच सोय झाली आहे. हे तीनही प्रमुख पक्ष अंतर्गत सारवासारव करण्यात गुंतले आहे. त्यात त्यांची शक्ती खर्ची पडत आहे. त्यामुळे भाजपाला विरोध करणार कोण असा प्रश्न आहे. जिल्ह्यात चार प्रमुख पक्ष आहेत. त्यातील भाजपा व शिवसेना सत्तेत आहेत. त्यातही शिवसेना अधूनमधून आंदोलनाची भूमिका घेते. विरोधी बाकावर असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीवर जनतेच्या समस्या सोडविण्याची, त्यासाठी सरकारला धारेवर धरण्याची जबाबदारी आहे. परंतु प्रत्यक्षात स्थिती वेगळीच आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी या विरोधी पक्षांना अंतर्गत गटबाजीने पोखरले आहे. संपूर्ण हयात काँग्रेसमध्ये घालविलेल्या ज्येष्ठ नेत्यांमधील गटबाजी थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. संधी मिळेल तिथे नेते मंडळी एकमेकांना दिल्लीपर्यंत उघडे पाडण्याचा प्रयत्न करतात. २०१४ च्या निवडणुकीत चारही मुंड्या चित होऊनही नेते मंडळी सुधरायला तयार नाही. नेत्यांच्या या भांडणात चक्क पक्ष संपायला आला आहे. गुरुवारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शवयात्रा आंदोलन होत आहे. या आंदोलनातसुद्धा काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अशीच काहीशी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. यवतमाळ व पुसद असे दोन सत्ता केंद्र झाल्याचे दिसून येते. पक्षातील गटबाजी आधी जिल्हा परिषद आणि आता नुकत्याच झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अधोरेखीत झाली आहे. नेत्यांमध्येच एक दादाचा, एक साहेबांचा अशी विभागणी झाल्याने कार्यकर्तेही विभागले गेले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी सारखीच गटबाजी आता शिवसेनेतही उफाळून आली आहे. जिल्हा प्रमुखाची परस्पर झालेली नियुक्ती एवढा मुद्दा त्यासाठी कारणीभूत ठरला आहे. जिल्ह्यात शिवसेना अभेद्य मानली जात होती. पक्षाच्या नेत्यांमध्ये एकजूट दिसत होती. त्यामुळे कार्यकर्त्यांनी उघडपणे गटबाजी दाखविण्याची हिंमत केली नाही. परंतु आता नेतेच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहे. आता प्रमुख दोन गट पडल्याने शिवसेनेची शक्ती विभागली जाण्याची व जनतेच्या प्रश्नावर वेगवेगळ्या भूमिका घेतल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेना नेत्यांमधील या भांडणाने कार्यकर्ते आणि शासकीय यंत्रणेतसुद्धा चुकीचा संदेश जातो आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तीनही प्रमुख पक्षांना गटबाजीने पोखरले आहे. पक्षातील ही भांडणे मिटविण्यातच बहुतांश शक्ती खर्च होत आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नावर बोलणार कोण आणि भाजपाला रोखणार कोण असा प्रश्न आहे. तीन प्रमुख पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते गटबाजीत गुंतलेले आहेत. तर दुसरीकडे भाजपा त्यांच्या या ‘व्यस्ततेचा’ पुरेपूर फायदा उठविताना दिसत आहे. भाजपाने जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक, साखर कारखाना काबीज केला आहे. लगतच्या भविष्यात जिल्ह्यात बंद असलेले सहकारातील अन्य उद्योग (साखर कारखाने, सूत गिरण्या, जिनिंग-प्रेसिंग संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या, खरेदी-विक्री संघ, सेवा सोसायट्या आदी) ताब्यात घेण्याची व्युहरचना भाजपाने केली आहे. विरोधी पक्षाचा कोणताही अडथळा नसल्याने भाजपाची ही विजयी घौडदौड जिल्ह्यात सर्वदूर पोहोचण्याची चिन्हे आहेत. तीन पक्षातील गटबाजीचा भाजपाला आयताच फायदा मिळतो आहे. उलट या तीनही पक्षांना गटबाजीत आणखी गुंतवून ठेवण्याचे प्रयत्न भाजपा पडद्यामागून सतत करीत असल्याचे सांगितले जाते. वर्चस्वाच्या लढाईची झापड डोळ्यावर चढविलेले काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेतील नेते मंडळी मात्र भाजपाची ही खेळी ओळखण्यात अपयशी ठरले आहे. या मुद्यावर नेते मंडळी अद्यापही जागृत झालेली नाही.