शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला चुका भोवल्या

By admin | Updated: May 17, 2014 02:09 IST

यवतमाळ-वाशिम लोकसभेत काँग्रेसच्या दारुण पराभवासाठी अनेक घटक जबाबदार मानले जाते. काँग्रेस-राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर प्रचंड विरोधी वातावरण होते.

सुरेंद्र राऊत - यवतमाळ

यवतमाळ-वाशिम लोकसभेत काँग्रेसच्या दारुण पराभवासाठी अनेक घटक जबाबदार मानले जाते. काँग्रेस-राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर प्रचंड विरोधी वातावरण होते. थेट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात काँग्रेसने मोठा मोर्चा काढला होता. पक्षातील कुरघोडीतच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मशगूल होते. ऐन लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर समेटाची भूमिका घेण्यात आली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. याचे परिणाम या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट समोर आले आहे.

काँग्रेसने अगदी शेवटच्या क्षणी मोघे यांना उमेदवारी घोषित केली. यवतमाळ-वाशिम लोकसभा क्षेत्राबाहेरचे आमदार असलेले मोघे यांनी आपल्या सामाजिक न्यायमंत्रीपदाचा जिल्ह्याच्या जडणघडणीत कुठलाच उपयोग केला नाही. किंबहूना सलग तिनदा आदिवासी मंत्री म्हणून मोघे यांनी पद उपभोगले आहे. याचा आदिवासी समाजाच्या विकासासाठीही विशेष फायदा झाला नाही. लोकसभेला उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्यानंतर मोघेंनी आपल्या समाजबांधवांना साद घातली. यावेळी जाहीररीत्याच मोघेंची उपलब्धी काय, असा प्रश्न आदिवासी समाजबांधवांकडून विचारण्यात येवू लागला.

महायुतीने प्रचारात आघाडी घेण्यासाठी पंतप्रधानपदाचे उमदेवार नरेंद्र मोदी ‘विकास पुरुष’चा नारा देत माहोल तयार केला. शिवाय शिवसेना खासदार भावना गवळी, आमदार संजय राठोड यांनी भाजपापेक्षाही आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा धडाका सुरू ठेवला. दुर्देवाने याच काळात काँग्रेस व राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी आरोप-प्रत्यारोप करण्यात मशगूल राहिले. आर्णी विधानसभा क्षेत्रातून अचानकपणे शिवाजीराव मोघे लोकसभेच्या आखाड्यात उतरले. मुळात या जागेसाठी राहुल गांधी युवा ब्रिगेडमधून उमेदवारी निश्‍चित माणून राहुल ठाकरे यांनी वर्षभरापासून तयार केली होती. ऐन वेळेवर श्रेष्ठींकडूनच डॉज मिळाल्याने काँग्रेसच्या युवा वर्गात नाराजीची लाट पसरली. राष्ट्रवादीनेही केवळ वरिष्ठांचे आदेश म्हणून जुळवून घेतले. पण त्यांची भूमिका तळ्यात मळ्यात अशी होती. त्यामुळेच जिल्हा परिषदेत सत्ताधारी राष्ट्रवादी आणि विरोधी बाकावरील काँग्रेसच्या सदस्यांनी आपल्या सर्कलमध्ये फारसा जोर लावला नाही. याउलट शिवसेना-भाजपने ‘अभी नही तो कभी नही’ची भूमिका घेऊन प्रचार केला. परिणामी काँग्रेसच्या पारंपरिक मताला तोडण्यात यश आले. रिपाईंच्या आठवले गटामुळे राबविलेला ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रयोग बर्‍याचअंशी यशस्वी ठरला. याचा अंदाज सलग सत्ता भोगून मस्त झालेल्या आघाडीच्या स्थानिक नेत्यांना आला नाही. त्यामुळेच पराभवाचा उंबरठा पुन्हा एकदा काँग्रेस उमेदवाराला ओलांडावा लागला.