शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
5
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
6
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
7
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
8
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
9
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
10
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
11
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
12
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
13
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
14
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
16
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
17
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
18
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
19
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
20
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?

काँग्रेसला चुका भोवल्या

By admin | Updated: May 17, 2014 02:09 IST

यवतमाळ-वाशिम लोकसभेत काँग्रेसच्या दारुण पराभवासाठी अनेक घटक जबाबदार मानले जाते. काँग्रेस-राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर प्रचंड विरोधी वातावरण होते.

सुरेंद्र राऊत - यवतमाळ

यवतमाळ-वाशिम लोकसभेत काँग्रेसच्या दारुण पराभवासाठी अनेक घटक जबाबदार मानले जाते. काँग्रेस-राष्ट्रवादीत स्थानिक पातळीवर प्रचंड विरोधी वातावरण होते. थेट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात काँग्रेसने मोठा मोर्चा काढला होता. पक्षातील कुरघोडीतच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मशगूल होते. ऐन लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर समेटाची भूमिका घेण्यात आली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. याचे परिणाम या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट समोर आले आहे.

काँग्रेसने अगदी शेवटच्या क्षणी मोघे यांना उमेदवारी घोषित केली. यवतमाळ-वाशिम लोकसभा क्षेत्राबाहेरचे आमदार असलेले मोघे यांनी आपल्या सामाजिक न्यायमंत्रीपदाचा जिल्ह्याच्या जडणघडणीत कुठलाच उपयोग केला नाही. किंबहूना सलग तिनदा आदिवासी मंत्री म्हणून मोघे यांनी पद उपभोगले आहे. याचा आदिवासी समाजाच्या विकासासाठीही विशेष फायदा झाला नाही. लोकसभेला उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्यानंतर मोघेंनी आपल्या समाजबांधवांना साद घातली. यावेळी जाहीररीत्याच मोघेंची उपलब्धी काय, असा प्रश्न आदिवासी समाजबांधवांकडून विचारण्यात येवू लागला.

महायुतीने प्रचारात आघाडी घेण्यासाठी पंतप्रधानपदाचे उमदेवार नरेंद्र मोदी ‘विकास पुरुष’चा नारा देत माहोल तयार केला. शिवाय शिवसेना खासदार भावना गवळी, आमदार संजय राठोड यांनी भाजपापेक्षाही आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा धडाका सुरू ठेवला. दुर्देवाने याच काळात काँग्रेस व राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी आरोप-प्रत्यारोप करण्यात मशगूल राहिले. आर्णी विधानसभा क्षेत्रातून अचानकपणे शिवाजीराव मोघे लोकसभेच्या आखाड्यात उतरले. मुळात या जागेसाठी राहुल गांधी युवा ब्रिगेडमधून उमेदवारी निश्‍चित माणून राहुल ठाकरे यांनी वर्षभरापासून तयार केली होती. ऐन वेळेवर श्रेष्ठींकडूनच डॉज मिळाल्याने काँग्रेसच्या युवा वर्गात नाराजीची लाट पसरली. राष्ट्रवादीनेही केवळ वरिष्ठांचे आदेश म्हणून जुळवून घेतले. पण त्यांची भूमिका तळ्यात मळ्यात अशी होती. त्यामुळेच जिल्हा परिषदेत सत्ताधारी राष्ट्रवादी आणि विरोधी बाकावरील काँग्रेसच्या सदस्यांनी आपल्या सर्कलमध्ये फारसा जोर लावला नाही. याउलट शिवसेना-भाजपने ‘अभी नही तो कभी नही’ची भूमिका घेऊन प्रचार केला. परिणामी काँग्रेसच्या पारंपरिक मताला तोडण्यात यश आले. रिपाईंच्या आठवले गटामुळे राबविलेला ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रयोग बर्‍याचअंशी यशस्वी ठरला. याचा अंदाज सलग सत्ता भोगून मस्त झालेल्या आघाडीच्या स्थानिक नेत्यांना आला नाही. त्यामुळेच पराभवाचा उंबरठा पुन्हा एकदा काँग्रेस उमेदवाराला ओलांडावा लागला.