शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

उमरखेड बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:52 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. सोमवारी मतमोजणीनंतर १८ पैकी १० जागांवर काँग्रेसप्रणित परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी झाले. शिवसेना-भाजपा युतीने सात जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळविला.

ठळक मुद्देदहा जागांवर विजय : शिवसेना-भाजपा युतीला सात, तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एक जागा

दत्तात्रय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. सोमवारी मतमोजणीनंतर १८ पैकी १० जागांवर काँग्रेसप्रणित परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी झाले. शिवसेना-भाजपा युतीने सात जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळविला.काँग्रेस प्रणित परिवर्तन पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये मुळावा गटातील दगडू चव्हाण, उमरखेड गटातील माया रावते, बिटरगाव ब गटातील दत्तराव रावते, विडूळ गटातील गजानन बोन्सले, ढाणकी गटातील बाळासाहेब ऊर्फ वसंत चंद्रे, निंगनूर गटातील सुनील गव्हाळे, भवानी गटातील रघुनाथ बेले व हमाल-मापारी गटातील अजमतखाँ पठाण आणि अडते व व्यापारी गटातील राधेश्याम भट्टड, विनय कोडगिरवार यांचा समावेश आहे. शिवसेना-भाजप युतीचे बेलखेड गटातील सुदर्शन ठाकरे, पोफाळी गटातील उषाताई जाधव, मार्लेगाव गटातील नारायण नरवाडे, सुकळी ज. गटातील गौतम ऊर्फ बाळासाहेब नाईक, देवसरी गटातील शामराव वानखेडे, चातारी गटातील कृष्णा देवसरकर आणि खरबी गटातील दिलीप जाधव विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश जाधव हे एकमेव उमेदवार कुरळी गटातून विजयी झाले.सहकार प्राधिकरणाच्या नवीन नियमानुसार प्रथमच बाजार समितीची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत प्रत्येक शेतकरी सभासदाला मतदानाचा अधिकार होता. त्यामुळे मतदारांची संख्या तब्बल ६६ हजारांच्यावर होती. त्यापैकी जवळपास निम्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात सकाळी १० वाजतापासून मतमोजणी सुरू झाली. अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार भगवान कांबळे व कर्मचाऱ्यांनी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली. बाजार समितीवर वर्चस्व प्राप्त करताच जिल्हा परिषदेतील काँग्रेस गटनेते राम देवसरकर यांच्यासह विजयी उमेदवारांनी जल्लोष केला.‘गड आला पण सिंह गेला’काँग्रेसचे दत्तराव शिंदे हे सभापतीपदाचे प्रमुख दावेदार होते. मात्र देवसरी गटातून त्यांचा पराभव झाल्याने काँग्रेसची अवस्था ‘गड आला पण सिंह गेला’ अशी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमुळे काँग्रेसचे काही उमेदवार थोड्या फरकाच्या मताने पराभूत झाले आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसचे गणित बिघडविल्याने काँग्रेसला दहा जागांवरच विजय मिळाला.