शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

उमरखेड बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:52 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. सोमवारी मतमोजणीनंतर १८ पैकी १० जागांवर काँग्रेसप्रणित परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी झाले. शिवसेना-भाजपा युतीने सात जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळविला.

ठळक मुद्देदहा जागांवर विजय : शिवसेना-भाजपा युतीला सात, तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एक जागा

दत्तात्रय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. सोमवारी मतमोजणीनंतर १८ पैकी १० जागांवर काँग्रेसप्रणित परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी झाले. शिवसेना-भाजपा युतीने सात जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळविला.काँग्रेस प्रणित परिवर्तन पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये मुळावा गटातील दगडू चव्हाण, उमरखेड गटातील माया रावते, बिटरगाव ब गटातील दत्तराव रावते, विडूळ गटातील गजानन बोन्सले, ढाणकी गटातील बाळासाहेब ऊर्फ वसंत चंद्रे, निंगनूर गटातील सुनील गव्हाळे, भवानी गटातील रघुनाथ बेले व हमाल-मापारी गटातील अजमतखाँ पठाण आणि अडते व व्यापारी गटातील राधेश्याम भट्टड, विनय कोडगिरवार यांचा समावेश आहे. शिवसेना-भाजप युतीचे बेलखेड गटातील सुदर्शन ठाकरे, पोफाळी गटातील उषाताई जाधव, मार्लेगाव गटातील नारायण नरवाडे, सुकळी ज. गटातील गौतम ऊर्फ बाळासाहेब नाईक, देवसरी गटातील शामराव वानखेडे, चातारी गटातील कृष्णा देवसरकर आणि खरबी गटातील दिलीप जाधव विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश जाधव हे एकमेव उमेदवार कुरळी गटातून विजयी झाले.सहकार प्राधिकरणाच्या नवीन नियमानुसार प्रथमच बाजार समितीची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत प्रत्येक शेतकरी सभासदाला मतदानाचा अधिकार होता. त्यामुळे मतदारांची संख्या तब्बल ६६ हजारांच्यावर होती. त्यापैकी जवळपास निम्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात सकाळी १० वाजतापासून मतमोजणी सुरू झाली. अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार भगवान कांबळे व कर्मचाऱ्यांनी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली. बाजार समितीवर वर्चस्व प्राप्त करताच जिल्हा परिषदेतील काँग्रेस गटनेते राम देवसरकर यांच्यासह विजयी उमेदवारांनी जल्लोष केला.‘गड आला पण सिंह गेला’काँग्रेसचे दत्तराव शिंदे हे सभापतीपदाचे प्रमुख दावेदार होते. मात्र देवसरी गटातून त्यांचा पराभव झाल्याने काँग्रेसची अवस्था ‘गड आला पण सिंह गेला’ अशी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमुळे काँग्रेसचे काही उमेदवार थोड्या फरकाच्या मताने पराभूत झाले आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसचे गणित बिघडविल्याने काँग्रेसला दहा जागांवरच विजय मिळाला.