शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

उमरखेड बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 21:52 IST

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. सोमवारी मतमोजणीनंतर १८ पैकी १० जागांवर काँग्रेसप्रणित परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी झाले. शिवसेना-भाजपा युतीने सात जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळविला.

ठळक मुद्देदहा जागांवर विजय : शिवसेना-भाजपा युतीला सात, तर राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ एक जागा

दत्तात्रय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी अत्यंत चुरशीची निवडणूक झाली. सोमवारी मतमोजणीनंतर १८ पैकी १० जागांवर काँग्रेसप्रणित परिवर्तन पॅनलचे उमेदवार विजयी झाले. शिवसेना-भाजपा युतीने सात जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळविला.काँग्रेस प्रणित परिवर्तन पॅनलच्या विजयी उमेदवारांमध्ये मुळावा गटातील दगडू चव्हाण, उमरखेड गटातील माया रावते, बिटरगाव ब गटातील दत्तराव रावते, विडूळ गटातील गजानन बोन्सले, ढाणकी गटातील बाळासाहेब ऊर्फ वसंत चंद्रे, निंगनूर गटातील सुनील गव्हाळे, भवानी गटातील रघुनाथ बेले व हमाल-मापारी गटातील अजमतखाँ पठाण आणि अडते व व्यापारी गटातील राधेश्याम भट्टड, विनय कोडगिरवार यांचा समावेश आहे. शिवसेना-भाजप युतीचे बेलखेड गटातील सुदर्शन ठाकरे, पोफाळी गटातील उषाताई जाधव, मार्लेगाव गटातील नारायण नरवाडे, सुकळी ज. गटातील गौतम ऊर्फ बाळासाहेब नाईक, देवसरी गटातील शामराव वानखेडे, चातारी गटातील कृष्णा देवसरकर आणि खरबी गटातील दिलीप जाधव विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाश जाधव हे एकमेव उमेदवार कुरळी गटातून विजयी झाले.सहकार प्राधिकरणाच्या नवीन नियमानुसार प्रथमच बाजार समितीची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत प्रत्येक शेतकरी सभासदाला मतदानाचा अधिकार होता. त्यामुळे मतदारांची संख्या तब्बल ६६ हजारांच्यावर होती. त्यापैकी जवळपास निम्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात सकाळी १० वाजतापासून मतमोजणी सुरू झाली. अपर जिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांच्या मार्गदर्शनात तहसीलदार भगवान कांबळे व कर्मचाऱ्यांनी मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली. बाजार समितीवर वर्चस्व प्राप्त करताच जिल्हा परिषदेतील काँग्रेस गटनेते राम देवसरकर यांच्यासह विजयी उमेदवारांनी जल्लोष केला.‘गड आला पण सिंह गेला’काँग्रेसचे दत्तराव शिंदे हे सभापतीपदाचे प्रमुख दावेदार होते. मात्र देवसरी गटातून त्यांचा पराभव झाल्याने काँग्रेसची अवस्था ‘गड आला पण सिंह गेला’ अशी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमुळे काँग्रेसचे काही उमेदवार थोड्या फरकाच्या मताने पराभूत झाले आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसचे गणित बिघडविल्याने काँग्रेसला दहा जागांवरच विजय मिळाला.