शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

रेती घाट धाडीत चांदूररेल्वे काँग्रेसचे अर्थ-राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 23:24 IST

बाभूळगाव तालुक्यातील रेती घाटांवर विभागाबाहेरील एसडीओंकडून धाडी घालण्याच्या प्रकरणामागे अमरावती जिल्ह्याच्या चांदूररेल्वे येथील काँग्रेसचे राजकारण आडवे आल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देबाभूळगाव तहसीलदार निलंबित : शिवसेना कार्यकर्त्याचा घाट

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बाभूळगाव तालुक्यातील रेती घाटांवर विभागाबाहेरील एसडीओंकडून धाडी घालण्याच्या प्रकरणामागे अमरावती जिल्ह्याच्या चांदूररेल्वे येथील काँग्रेसचे राजकारण आडवे आल्याचे सांगितले जाते. दरम्यान या प्रकरणात निष्क्रीयतेचा ठपका ठेवत बाभूळगावचे तहसीलदार दिलीप झाडे यांना विभागीय आयुक्तांनी बुधवारी निलंबित केले.बाभूळगाव तालुक्याच्या वाटखेड येथील दोनही रेती घाटांवर पुसदचे एसडीओ नितीन हिंगोले यांच्या नेतृत्वातील महसूल पथकाने धाडी घातल्या होत्या. याच प्रकरणात बाभूळगाव तहसीलदार दिलीप झाडे निलंबित झाल्याने आता या धाडींमागील राजकारण व अर्थकारण पुढे येऊ लागले आहे. सूत्रानुसार, यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव, राळेगावच्या रेती घाटांबाबत चांदूररेल्वेतील काँग्रेसच्या नेत्याकडून सातत्याने तक्रारी केल्या जातात. वरवर याला काँग्रेसविरुद्ध सेना या राजकारणाची झालर दिसत असली तरी प्रत्यक्षात त्याचे मूळ अर्थकारणात दडून असल्याचे सांगितले जाते. वाटखेडचा घाट क्र. १ हा शिवणी-रसूलापूर (ता. नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती) येथील शिवसेना कार्यकर्त्याने घेतला आहे. तर तेथीलच दुसऱ्या घाटाचे कनेक्शन पुलगावमध्ये आहे.या घाटांबाबत बाभूळगाव, यवतमाळचे महसूल अधिकारी सलोख्याची भूमिका घेत असल्याचे सांगत थेट विभागीय महसूल आयुक्तांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. आयुक्तांच्या आदेशावरून मग दुसऱ्या विभागातील एसडीओंमार्फत घाटावर धाडी घालण्यात आल्या. तेथून ३१ ट्रक जप्त करण्यात आले. हे सर्व ट्रक रिकामे असून केवळ एकामध्ये दोन ब्रास रेती आहे. त्याचीही रॉयल्टी भरलेली आहे. घाटावरून अन्य सात ट्रक पसार झाले. या प्रकरणात घाट मालकाविरुद्ध भादंवि ३७९ कलमान्वये चोरीचा गुन्हा नोंदविला गेला. त्याचवेळी प्रत्येक ट्रकला एक लाखांचा दंड लावण्यात आला. एकाच प्रकरणात दोन प्रकारची कारवाई कशी असा प्रश्न उपस्थित करीत घाट मालकांनी आता थेट उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी चालविली आहे. नियमानुसार ६ वाजेपर्यंत घाटावर वाहने उभी राहू शकतात. एसडीओंची धाड ५ वाजता पडली होती. त्यावेळेतील पंचनामा, चालकांनी घाट मालकांना केलेल्या मोबाईल कॉलचे रेकॉर्ड आहे. असे असताना कागदावर या धाडी सायंकाळी ७ वाजता दाखवून सर्व ट्रकवर जप्तीची कारवाई करण्यात आली. हे ट्रक बाभूळगाव पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहे.राळेगाव तालुक्यातील रेती घाटांवर सर्वाधिक ‘उलाढाल’जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात रेती घाट सुरू असून उत्खननही मोठ्या प्रमाणात होत आहे. बाभूळगाव व राळेगाव या दोनच तालुक्यात डझनावर घाट आहेत. त्यातही राळेगाव तालुक्यात रेती घाटावर सर्वाधिक ‘उलाढाल’ होत असल्याची माहिती आहे. उलाढालीचा हा आकडा पाहूनच घाटावर खंडणी, धमक्या, मारहाण, गोळीबार, पोलिसात तक्रारी, जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईचे निवेदन ंआदी प्रकार होत आहे. चांदूररेल्वेतील काँग्रेसच्या गोटातून होणारे राजकारण, अर्थकारण व त्यातील तक्रारींना कंटाळून अनेक घाट मालकांनी तो तालुका सोडून आता यवतमाळ जिल्ह्यात बाभूळगाव, राळेगाव तालुक्यातील घाटांवर लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र त्यानंतरही चांदूररेल्वेतून त्यांचा पिच्छा पुरविला जात आहे.

टॅग्स :sandवाळू