शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

काँग्रेसच सर्वसामान्यांना न्याय देऊ शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 23:59 IST

केंद्रात आणि राज्यातील भाजपा सरकार घोषणा करण्यापलिकडे काहीच करीत नाही. या सरकारच्या विरोधात कुणी बोलले तर त्याला थेट देशद्रोही ठरविले जाते.

ठळक मुद्देअशोक चव्हाण : जिल्हा काँग्रेस कमिटीचे ‘व्हीजन-२०१९’ शिबिर

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : केंद्रात आणि राज्यातील भाजपा सरकार घोषणा करण्यापलिकडे काहीच करीत नाही. या सरकारच्या विरोधात कुणी बोलले तर त्याला थेट देशद्रोही ठरविले जाते. सर्वसामान्य माणसाला काँग्रेसच न्याय देऊ शकते, कार्यकर्त्यांनी भाजपाची जुलमी राजवट उलथविण्यासाठी कामाला लागला, असे आवाहन महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांनी येथे केले.जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने ‘व्हीजन-२०१९’ अंतर्गत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन येथील आर्णी मार्गावरील वादाफळे पॅलेसमध्ये शुक्रवारी करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. भाजपा सरकारने दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. उलट शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, नोकरदार आणि बेरोजगार युवकांच्या समस्यात भर घातली. शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन दिले होते. आज बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. कधी नव्हे इतक्या आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. यवतमाळात कीटकनाशक फवारणीमुळे शेतकºयांचे मृत्यू तांडव घडले. शासनाने चौकशीचा देखावा केला. मात्र अहवालात कुणाचीच चूक नसल्याचे सांगितले. यावरून हे सरकार कोणासाठी काम करते, हे स्पष्ट होते, असे ते म्हणाले.काँग्रेसच सर्वसामान्य माणसाला न्याय देऊ शकते, यासाठी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात पीक विमा, शेतमालाचे आधारभूत मूल्य, रोजगार निर्मिती यावर फोकस केला जाणार आहे. अडचणीत असलेल्या जनतेला काँग्रेस कार्यकर्त्यांनी विश्वास देण्याचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.शिबिराच्या पहिल्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, नियोजन आयोगाचे माजी सदस्य भालचंद्र मुनगेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मार्गदर्शन केले. शिबिराला विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, खासदार राजीव सातव, एनएसयुआयचे राज्याध्यक्ष आमीर शेख, आमदार हरिभाऊ राठोड, प्रकाश साबळे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, कीर्ती गांधी, विजय खडसे, विजयाताई धोटे, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष माधुरी अराठे, संध्याताई सव्वालाखे, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष सुनील भेले, राहुल ठाकरे, अशोक बोबडे, चंद्रशेखर चौधरी, अनिल गायकवाड अजय किन्हकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेस