शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

काँग्रेसच सर्वसामान्यांना न्याय देऊ शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 23:59 IST

केंद्रात आणि राज्यातील भाजपा सरकार घोषणा करण्यापलिकडे काहीच करीत नाही. या सरकारच्या विरोधात कुणी बोलले तर त्याला थेट देशद्रोही ठरविले जाते.

ठळक मुद्देअशोक चव्हाण : जिल्हा काँग्रेस कमिटीचे ‘व्हीजन-२०१९’ शिबिर

ऑनलाईन लोकमतयवतमाळ : केंद्रात आणि राज्यातील भाजपा सरकार घोषणा करण्यापलिकडे काहीच करीत नाही. या सरकारच्या विरोधात कुणी बोलले तर त्याला थेट देशद्रोही ठरविले जाते. सर्वसामान्य माणसाला काँग्रेसच न्याय देऊ शकते, कार्यकर्त्यांनी भाजपाची जुलमी राजवट उलथविण्यासाठी कामाला लागला, असे आवाहन महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री, खासदार अशोक चव्हाण यांनी येथे केले.जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने ‘व्हीजन-२०१९’ अंतर्गत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन येथील आर्णी मार्गावरील वादाफळे पॅलेसमध्ये शुक्रवारी करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. भाजपा सरकारने दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. उलट शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, नोकरदार आणि बेरोजगार युवकांच्या समस्यात भर घातली. शेतमालाला किमान आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन दिले होते. आज बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. कधी नव्हे इतक्या आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. यवतमाळात कीटकनाशक फवारणीमुळे शेतकºयांचे मृत्यू तांडव घडले. शासनाने चौकशीचा देखावा केला. मात्र अहवालात कुणाचीच चूक नसल्याचे सांगितले. यावरून हे सरकार कोणासाठी काम करते, हे स्पष्ट होते, असे ते म्हणाले.काँग्रेसच सर्वसामान्य माणसाला न्याय देऊ शकते, यासाठी दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात पीक विमा, शेतमालाचे आधारभूत मूल्य, रोजगार निर्मिती यावर फोकस केला जाणार आहे. अडचणीत असलेल्या जनतेला काँग्रेस कार्यकर्त्यांनी विश्वास देण्याचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.शिबिराच्या पहिल्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, नियोजन आयोगाचे माजी सदस्य भालचंद्र मुनगेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मार्गदर्शन केले. शिबिराला विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, खासदार राजीव सातव, एनएसयुआयचे राज्याध्यक्ष आमीर शेख, आमदार हरिभाऊ राठोड, प्रकाश साबळे, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, कीर्ती गांधी, विजय खडसे, विजयाताई धोटे, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ. वजाहत मिर्झा, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष माधुरी अराठे, संध्याताई सव्वालाखे, अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष सुनील भेले, राहुल ठाकरे, अशोक बोबडे, चंद्रशेखर चौधरी, अनिल गायकवाड अजय किन्हकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेस