शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
4
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
5
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
6
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
7
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
8
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
9
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
10
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
11
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
12
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
13
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
14
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
15
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
16
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
17
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
18
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

काँग्रेसची सत्ता गेली पण गटबाजी कायम

By admin | Updated: August 11, 2015 02:44 IST

गटबाजी, हेवेदावे, पाय ओढणे, एकमेकांना उघडे पाडणे अशा प्रवृत्तीमुळे राज्यात काँग्रेसची सत्ता गेली. मात्र

यवतमाळ : गटबाजी, हेवेदावे, पाय ओढणे, एकमेकांना उघडे पाडणे अशा प्रवृत्तीमुळे राज्यात काँग्रेसची सत्ता गेली. मात्र त्यानंतरही काँग्रेस नेत्यांच्या प्रवृत्तीत बदल झाला नाही. त्यांच्यातील गटबाजी कायम असल्याचे ‘रुमणे मोर्चा’ने सिध्द केले. काँग्रेसच्यावतीने १० आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रुमणे मोर्चा आयोजित केला गेला होता. या मोर्चाची व्यापक प्रसिद्ध झाली होती. सर्वांना मोबाईलवर संदेश पाठविले. माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वातील हा काँग्रेसचा मोर्चा भव्य-दिव्य निघेल, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र ‘फ्लॉश शो’ ठरला. या मोर्चाकडे शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, विजयराव खडसे, वामनराव कासावार या प्रमुख माजी आमदारांनी पाठ फिरविली. हीच अवस्था पक्षाच्या व जिल्हा कार्यकारिणीतील अन्य पदाधिकाऱ्यांची होती. त्यांनीसुद्धा या मोर्चाकडे पाठ फिरविली. अखेर लिमिटेड कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढला गेला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माणिकराव ठाकरेंनी या मोर्चाला संबोधित केले. काँग्रेसचा गेल्या कित्येक वर्षांनंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा निघणार असल्याने तो भला मोठा राहील, असे समजून जिल्हा कचेरीवर तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या दृष्टीने हा रूमणे मोर्चा फुसका बार ठरला. माणिकराव ठाकरे व राहुल ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार असल्याचे जाहीर झाल्यामुळे तर जिल्ह्यातील अन्य काँग्रेस नेत्यांनी या मोर्चावर अघोषित बहिष्कार घातला नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. कारणे काहीही असो, मात्र काँग्रेसमधील गटबाजी अद्याप कायम असल्याचे या मोचाने सिध्द केले. पक्षातील हेवेदावे त्यांच्यासाठी शेतकरी व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांपेक्षा अधिक महत्वपूर्ण ठरत असल्याचे दिसून येते. खुद्द माणिकराव ठाकरे उपस्थित असताना काँग्रेसचा रूमणे मोर्चा फ्लॉप ठरल्याने त्यांच्या निकटवर्तीयांनी आता वेगवेगळी कारणे पुढे करून स्व:ताचा बचाव करणे सुरू केले आहे. मुळात हा काँग्रेसचा मोर्चा नव्हताच, त्या पदाधिकाऱ्याने केवळ यवतमाळ तालुक्यापुरते या मोर्चाचे आयोजन केले होते, ती प्रेसनोट चुकून काँग्रेसचा मोर्चा म्हणून काढली गेली, अशा सबबी सांगत ठाकरे समर्थकांनी आपली इभ्रत वाचविण्याचा प्रयत्न चालविला आहे. या फ्लॉप शोसाठी त्या अल्पसंख्यक पदाधिकाऱ्याला आता दोष दिला जात आहे. हा रूमणे मोर्चा नेमका जिल्हा काँग्रेसचा, युवक काँग्रेसचा तसेच जिल्ह्याचा की यवतमाळ तालुक्याचा हा संभ्रम कायम आहे. मोर्चा तालुक्यापुरता मर्यादित असेल तर त्यात जिल्ह्याच्या टोकावरील नेते मंडळी उपस्थित कशी आणि मार्गदर्शनासाठी थेट माणिकराव ठाकरे प्रकटले कसे हा प्रश्न आहे.प्रदेशाध्यक्ष राहिलेले माणिकराव साध्या तालुक्याच्या मोर्चाला (निवडणुकीचा काळ नसताना) संबोधित करण्यासाठी येत असतील तर पक्षातील त्यांच्या वजनाबाबत न बोललेलेच बरे. (जिल्हा प्रतिनिधी)