शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
5
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
6
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
7
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
8
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
9
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
10
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
11
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
12
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
13
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
14
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
15
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
16
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
17
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
18
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
19
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
20
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

काँग्रेसची सत्ता गेली पण गटबाजी कायम

By admin | Updated: August 11, 2015 02:44 IST

गटबाजी, हेवेदावे, पाय ओढणे, एकमेकांना उघडे पाडणे अशा प्रवृत्तीमुळे राज्यात काँग्रेसची सत्ता गेली. मात्र

यवतमाळ : गटबाजी, हेवेदावे, पाय ओढणे, एकमेकांना उघडे पाडणे अशा प्रवृत्तीमुळे राज्यात काँग्रेसची सत्ता गेली. मात्र त्यानंतरही काँग्रेस नेत्यांच्या प्रवृत्तीत बदल झाला नाही. त्यांच्यातील गटबाजी कायम असल्याचे ‘रुमणे मोर्चा’ने सिध्द केले. काँग्रेसच्यावतीने १० आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रुमणे मोर्चा आयोजित केला गेला होता. या मोर्चाची व्यापक प्रसिद्ध झाली होती. सर्वांना मोबाईलवर संदेश पाठविले. माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वातील हा काँग्रेसचा मोर्चा भव्य-दिव्य निघेल, अशी अपेक्षा असताना प्रत्यक्षात मात्र ‘फ्लॉश शो’ ठरला. या मोर्चाकडे शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, विजयराव खडसे, वामनराव कासावार या प्रमुख माजी आमदारांनी पाठ फिरविली. हीच अवस्था पक्षाच्या व जिल्हा कार्यकारिणीतील अन्य पदाधिकाऱ्यांची होती. त्यांनीसुद्धा या मोर्चाकडे पाठ फिरविली. अखेर लिमिटेड कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोर्चा काढला गेला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माणिकराव ठाकरेंनी या मोर्चाला संबोधित केले. काँग्रेसचा गेल्या कित्येक वर्षांनंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा निघणार असल्याने तो भला मोठा राहील, असे समजून जिल्हा कचेरीवर तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या दृष्टीने हा रूमणे मोर्चा फुसका बार ठरला. माणिकराव ठाकरे व राहुल ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघणार असल्याचे जाहीर झाल्यामुळे तर जिल्ह्यातील अन्य काँग्रेस नेत्यांनी या मोर्चावर अघोषित बहिष्कार घातला नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. कारणे काहीही असो, मात्र काँग्रेसमधील गटबाजी अद्याप कायम असल्याचे या मोचाने सिध्द केले. पक्षातील हेवेदावे त्यांच्यासाठी शेतकरी व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांपेक्षा अधिक महत्वपूर्ण ठरत असल्याचे दिसून येते. खुद्द माणिकराव ठाकरे उपस्थित असताना काँग्रेसचा रूमणे मोर्चा फ्लॉप ठरल्याने त्यांच्या निकटवर्तीयांनी आता वेगवेगळी कारणे पुढे करून स्व:ताचा बचाव करणे सुरू केले आहे. मुळात हा काँग्रेसचा मोर्चा नव्हताच, त्या पदाधिकाऱ्याने केवळ यवतमाळ तालुक्यापुरते या मोर्चाचे आयोजन केले होते, ती प्रेसनोट चुकून काँग्रेसचा मोर्चा म्हणून काढली गेली, अशा सबबी सांगत ठाकरे समर्थकांनी आपली इभ्रत वाचविण्याचा प्रयत्न चालविला आहे. या फ्लॉप शोसाठी त्या अल्पसंख्यक पदाधिकाऱ्याला आता दोष दिला जात आहे. हा रूमणे मोर्चा नेमका जिल्हा काँग्रेसचा, युवक काँग्रेसचा तसेच जिल्ह्याचा की यवतमाळ तालुक्याचा हा संभ्रम कायम आहे. मोर्चा तालुक्यापुरता मर्यादित असेल तर त्यात जिल्ह्याच्या टोकावरील नेते मंडळी उपस्थित कशी आणि मार्गदर्शनासाठी थेट माणिकराव ठाकरे प्रकटले कसे हा प्रश्न आहे.प्रदेशाध्यक्ष राहिलेले माणिकराव साध्या तालुक्याच्या मोर्चाला (निवडणुकीचा काळ नसताना) संबोधित करण्यासाठी येत असतील तर पक्षातील त्यांच्या वजनाबाबत न बोललेलेच बरे. (जिल्हा प्रतिनिधी)