शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांविरोधात भाजपा देतंय विरोधकांना बळ?; २ मतदारसंघात टाकला डाव
4
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
5
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
6
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
7
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
8
Sonam Raghuvanshi : "माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
9
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
10
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
11
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
12
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
13
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
14
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
15
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
16
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
17
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
18
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
19
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
20
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या

शिक्षकांच्या समुपदेशनात गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 06:00 IST

बदलीत अन्याय झाल्याने उच्च न्यायालयात गेलेले आणि गेल्यावर्षी विस्थापित झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्यासाठी समुपदेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र या प्रक्रियेत यवतमाळसह काही महत्त्वाच्या पंचायत समितीमधील रिक्त जागाच प्रशासनाने खुल्या केल्या नाही.

ठळक मुद्देप्रक्रियेवर अघोषित बहिष्कार : अंशकालीन निदेशकांना मिळाली पदस्थापना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेने मंगळवारपासून शिक्षकांचे समुपदेशन सुरू केले. मात्र यात सावळागोंधळ निर्माण झाल्याने मंगळवारी ते तात्पुरते रद्द करण्यात आले. त्यानंतर बुधवारी अनेक शिक्षकांनी नकार दिल्याने ही प्रक्रियाच संकटात सापडली आहे.बदलीत अन्याय झाल्याने उच्च न्यायालयात गेलेले आणि गेल्यावर्षी विस्थापित झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्यासाठी समुपदेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र या प्रक्रियेत यवतमाळसह काही महत्त्वाच्या पंचायत समितीमधील रिक्त जागाच प्रशासनाने खुल्या केल्या नाही. त्यामुळे अन्यायग्रस्त शिक्षकांनी संताप व्यक्त केला. परिणामी प्रशासनाला मंगळवारी ही प्रक्रिया तात्पुरती रद्द करावी लागली. त्यानंतर बुधवारी पुन्हा ही प्रक्रिया सुरू झाली. त्यावरही शिक्षकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.जवळपास २७ शिक्षकांचा या प्रक्रियेत सहभाग होता. त्यापैकी केवळ ३ ते ४ जणांनी समुपदेशनाद्वारे आपली पदस्थापना करवून घेतली. उर्वरित शिक्षकांनी महत्त्वाच्या पंचायत समितीत जागा रिक्त न दाखविल्याने या प्रक्रियेवरच बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली. जिल्हा परिषदेच्या बगीच्यात सर्वांनी एकत्र येऊन प्रक्रियेबद्दल संताप व्यक्त केला. त्यानंतर शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांचीही भेट घेतली. मात्र तेथेही तोडगा निघाला नाही. काहींनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रक्रियेबाबत नाराजी दर्शविली. मात्र त्यांनीही ठरल्यानुसारच पदस्थापना होणार असल्याचे स्पष्ट केले.दरम्यान तब्बल १७० अंशकालीन कलानिदेशकांच्या पदस्थापनेसाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात रात्री उशिरापर्यंत समुपदेशन सुरू होते. या निदेशकांना कंत्राटी तत्त्वावर दरमहा सहा हजारांच्या मानधनावर पदस्थापना दिली जात आहे. त्यासाठीही जिल्हा परिषदेत बुधवारी एकच गर्दी उसळली होती. जिल्हा परिषदेला अक्षरश: जत्रेचे स्वरूप आले होते.अनुशेषाची चूक कुणाची?प्रशासनाने अनुशेषाचे कारण देत शिक्षकांना लांबच्या पंचायत समितीत पाठविण्याचा डाव आखला. मात्र हा अनुशेष आतापर्यंत का राहिला, तो का लपविण्यात आला असा प्रश्न विस्थापित शिक्षकांनी उपस्थित केला. या अनुशेषासाठी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. यापूर्वीच अनुशेषानुसार बदल्या केल्या असत्या तर आता न्यायालयात गेलेल्या व विस्थापित झालेल्या शिक्षकांवर अन्याय झाला नसता, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान उपशिक्षणाधिकारी दिलीप रावते यांनी जवळपास २७ पैकी केवळ तीन ते चारच शिक्षकांनी पदस्थापना स्वीकारल्याचे कबूल केले. उर्वरित शिक्षकांनी प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याचे यावरून स्पष्ट झाले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद