शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

शिक्षकांच्या समुपदेशनात गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 06:00 IST

बदलीत अन्याय झाल्याने उच्च न्यायालयात गेलेले आणि गेल्यावर्षी विस्थापित झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्यासाठी समुपदेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र या प्रक्रियेत यवतमाळसह काही महत्त्वाच्या पंचायत समितीमधील रिक्त जागाच प्रशासनाने खुल्या केल्या नाही.

ठळक मुद्देप्रक्रियेवर अघोषित बहिष्कार : अंशकालीन निदेशकांना मिळाली पदस्थापना

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेने मंगळवारपासून शिक्षकांचे समुपदेशन सुरू केले. मात्र यात सावळागोंधळ निर्माण झाल्याने मंगळवारी ते तात्पुरते रद्द करण्यात आले. त्यानंतर बुधवारी अनेक शिक्षकांनी नकार दिल्याने ही प्रक्रियाच संकटात सापडली आहे.बदलीत अन्याय झाल्याने उच्च न्यायालयात गेलेले आणि गेल्यावर्षी विस्थापित झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्यासाठी समुपदेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र या प्रक्रियेत यवतमाळसह काही महत्त्वाच्या पंचायत समितीमधील रिक्त जागाच प्रशासनाने खुल्या केल्या नाही. त्यामुळे अन्यायग्रस्त शिक्षकांनी संताप व्यक्त केला. परिणामी प्रशासनाला मंगळवारी ही प्रक्रिया तात्पुरती रद्द करावी लागली. त्यानंतर बुधवारी पुन्हा ही प्रक्रिया सुरू झाली. त्यावरही शिक्षकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.जवळपास २७ शिक्षकांचा या प्रक्रियेत सहभाग होता. त्यापैकी केवळ ३ ते ४ जणांनी समुपदेशनाद्वारे आपली पदस्थापना करवून घेतली. उर्वरित शिक्षकांनी महत्त्वाच्या पंचायत समितीत जागा रिक्त न दाखविल्याने या प्रक्रियेवरच बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली. जिल्हा परिषदेच्या बगीच्यात सर्वांनी एकत्र येऊन प्रक्रियेबद्दल संताप व्यक्त केला. त्यानंतर शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांचीही भेट घेतली. मात्र तेथेही तोडगा निघाला नाही. काहींनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन प्रक्रियेबाबत नाराजी दर्शविली. मात्र त्यांनीही ठरल्यानुसारच पदस्थापना होणार असल्याचे स्पष्ट केले.दरम्यान तब्बल १७० अंशकालीन कलानिदेशकांच्या पदस्थापनेसाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात रात्री उशिरापर्यंत समुपदेशन सुरू होते. या निदेशकांना कंत्राटी तत्त्वावर दरमहा सहा हजारांच्या मानधनावर पदस्थापना दिली जात आहे. त्यासाठीही जिल्हा परिषदेत बुधवारी एकच गर्दी उसळली होती. जिल्हा परिषदेला अक्षरश: जत्रेचे स्वरूप आले होते.अनुशेषाची चूक कुणाची?प्रशासनाने अनुशेषाचे कारण देत शिक्षकांना लांबच्या पंचायत समितीत पाठविण्याचा डाव आखला. मात्र हा अनुशेष आतापर्यंत का राहिला, तो का लपविण्यात आला असा प्रश्न विस्थापित शिक्षकांनी उपस्थित केला. या अनुशेषासाठी प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. यापूर्वीच अनुशेषानुसार बदल्या केल्या असत्या तर आता न्यायालयात गेलेल्या व विस्थापित झालेल्या शिक्षकांवर अन्याय झाला नसता, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान उपशिक्षणाधिकारी दिलीप रावते यांनी जवळपास २७ पैकी केवळ तीन ते चारच शिक्षकांनी पदस्थापना स्वीकारल्याचे कबूल केले. उर्वरित शिक्षकांनी प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याचे यावरून स्पष्ट झाले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद