शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

बियाणे कंपन्यांच्या प्रचार युद्धामुळे संभ्रम

By admin | Updated: May 24, 2014 00:13 IST

खरीप हंगाम तोंडावर आला असून विविध बियाणे कंपन्यांनी शेतकर्‍यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रचाराचा फंडा वापरणे सुरू केले आहे. एकमेकांशी स्पर्धा करीत आपलेच वाण कसे श्रेष्ठ आहे,

यवतमाळ : खरीप हंगाम तोंडावर आला असून विविध बियाणे कंपन्यांनी शेतकर्‍यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी प्रचाराचा फंडा वापरणे सुरू केले आहे. एकमेकांशी स्पर्धा करीत आपलेच वाण कसे श्रेष्ठ आहे, हे दाखविण्याचा प्रकार जाहिरातीच्या माध्यमातून होत आहे. आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून नावारुपास आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकर्‍यांना खरीप आणि रबी या दोनही हंगामात जबरदस्त नैसर्गिक तडाखा बसला आहे. पीक विम्याची रक्कम अजूनही शेतकर्‍यांना मिळालेली नाही. पिक विम्यादाखल लाखो रुपये शेतकर्‍यांनी बँकांमध्ये जमा केले. जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना व खरीप हंगाम तोंडावर आला असतानाही ही रक्कम मात्र शेतकर्‍यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत आहे. अशातच शेतकर्‍यांना भुलविण्यासाठी विविध कंपन्यांनी आपले बियाणे शेतकर्‍यांच्या माथी मारण्यासाठी प्रचार तंत्राचा वापर सुरू केला आहे. विशेष म्हणजे यंदा सोयाबीनच्या बियाण्याचा प्रचंड तुटवडा पडल्यामुळे बियाण्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. सोयाबीन काढणीच्यावेळी पाऊस सतत सुरू होता. यामुळे सोयाबीनचे बियाणे पूर्णत: खराब झाले. आता सोयाबीन तुटवड्याच्या नावाखाली बियाण्याच्या किमती वाढविण्यात आल्या आहे. या बियाण्यांच्या उगवण शक्तीवर प्रश्नचिन्ह लागले असताना बियाणे कंपन्या मात्र आपले बियाणे कसे श्रेष्ठ आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. सार्वजनिक स्थळावर भरघोस उत्पादनाचे दावे करणारे पत्रक चिकटविण्यात आले आहे. काही कंपन्यांनी गावोगाव जाऊन पथनाट्य सादर करण्याचा फंडा वापरला आहे. काही बियाणे कंपन्यांनी कृषी केंद्र संचालकांना हाताशी धरून शेतकर्‍यांना आकृष्ट करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. रस्त्याच्या कडेवर असलेल्या झाडांवरही विविध फलके लावण्यात आली आहे. यातून शेतकर्‍यांची फसवणूक होण्याची शक्यता बळावली आहे. कृषी विभागाने या संदर्भात भरारी पथकांची निर्मिती केली असली तरी एकदा शेतात पेरलेले बियाणे उगवण शक्तीत कमी पडले तर शेतकर्‍याचे समोरचे नियोजन पूर्णत: कोलमडून जाते. बियाण्यांचा तुटवडा लक्षात घेता शेतकर्‍यांनी घरचे बियाणे वापरावे, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात येत आहे. मात्र यंंदा सोयाबीन पिकाची झालेली दुर्दशा लक्षात घेता कुठल्याच शेतकर्‍याकडे सोयाबीन शिल्लक असण्याची शक्यता नाही. त्यामुळे कृषी विभागाने दिलेले सल्ले किती निराधार आहे, हे सिद्ध होते. बियाणे कंपन्यांच्या प्रचार युद्धात शेतकर्‍यांच्या होणार्‍या संंभाव्य फसवणुकीबाबत शासन, प्रशासनासह लोकप्रतिनिधी दक्ष असल्याचे दिसून येत नाही. विदर्भात येणारे सोयाबीनचे बियाणे बुलढाणा जिल्ह््यात सील करण्यात आले होते. (शहर प्रतिनिधी)