शहरं
Join us  
Trending Stories
1
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
2
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
3
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
4
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
5
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
6
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
7
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
8
Bigg Boss 19: क्रिकेटपटू दीपक चहरच्या बहिणीवर संतापला सलमान खान, सारेच झाले अवाक्, कारण काय? 
9
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
10
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
11
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
12
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
13
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
14
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
15
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
16
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
17
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
18
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
19
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
20
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू

कापूस खरेदीत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने पूर्ण राज्यात अटी व शर्तीला अनुसरून सीसीआयमार्फत कापूस खरेदी सुरू केली. मात्त येथील सीसीआयच्या केंद्र प्रमुखांनी खासगी व्यापाऱ्यांसोबत संगनमत करून शेतकऱ्यांना लुटण्याचा कार्यक्रम हुरू केल्याचा आरोप त्यांनी केला. २१ एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीचे आवाहन केले.

ठळक मुद्देघाटंजी तालुका : सीआयडी चौकशीची ‘सीएम’कडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : येथे सीसीआयमार्फत झालेल्या कापूस खरेदीत गोंधळ झाला. त्याची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने पूर्ण राज्यात अटी व शर्तीला अनुसरून सीसीआयमार्फत कापूस खरेदी सुरू केली. मात्त येथील सीसीआयच्या केंद्र प्रमुखांनी खासगी व्यापाऱ्यांसोबत संगनमत करून शेतकऱ्यांना लुटण्याचा कार्यक्रम हुरू केल्याचा आरोप त्यांनी केला. २१ एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीचे आवाहन केले. त्याचवेळी व्यापाऱ्यांनी आपले नातेवाईक, मित्र आदींच्या नावाने सातबारे ऑनलाईन करून घेतले. त्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी आला की, तो त्रुटी काढून परत करायचा आणि तोच कापूस हतबल झालेल्या शेतकऱ्यांजवळून दोन ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटलने खरेदी करून जवळच्या नातेवाईकांच्या नावाने सीसीआयला विकायचा, असा फंडा व्यापाऱ्यांनी वापरला.हा गोरखधंदा अनेक दिवसांपासून सुरू आहे. यात समाविष्ट असलेल्या सर्वांना ‘वाटा’ मिळत असल्याने कुणाचीही कुठे तक्रार झाली नाही. सोबतच सीसीआयने उच्च प्रतीच्या कापसापासून व हलक्या प्रतीच्या कापसापासून तयार झालेल्या गठाणीत हेराफेरी करून शासनाची आर्थिक लूट केली. बाजार समीतीने गावांची एबीसीडीप्रमाणे कापूस खरेदी सुरू केली. या प्रक्रियेत चार गावे व्हायला महिला लागला. आता शेतकऱ्यांच्या घरी जाऊन पंचनामा होणार असल्याचा नवा आदेश येऊन धडकला. त्यामुळे आपला कापूस कधी घेणार, कधी चुकारे मिळणार, त्यातून कधी बियाणे खरेदी करणार, असे प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. दुसरीकडे सीसीआय, खासगी व्यापारी, बाजार समितीचा एक अधिकारी आदी शेतकरी गळाला कसे लागतील, व त्यांना कसे लुटायचे, याचे नियोजन करीत आहे. यात प्रचंड भ्रष्टाचार होत असून सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी मोरेश्वर वातीले यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.बाजार समिती शेतकºयांच्या पाठीशीयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिषेक ठाकरे यांनी समिती सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. सीसीआयच्या कापूस खरेदीमध्ये कापसाचा काटा होईपर्यंत बाजार समितीची भूमिका असते. ती भूमिका बाजार समिती चोखपणे बजावत आहे. त्रुटी काढून शेतकऱ्यांचा कापूस परत करणे, तोच कापूस पुन्हा घेणे, गठाणीची हेराफेरी करणे हा विषय पूर्णपणे सीसीआय केंद्रप्रमुखाचा आहे. याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाबाबत बाजार समिती आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सभापती अभिषेक ठाकरे यांनी सांगितले.

टॅग्स :cottonकापूसMarket Yardमार्केट यार्ड