शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

गहाण दागिन्यांवरील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 14:35 IST

एकट्या अमरावती विभागाचा विचार केल्यास ३० नोव्हेंबर २०१४ पर्यंत परवाना क्षेत्राबाहेर परंतु जिल्ह्यात गहाण दागिन्यांवर कर्ज देणाऱ्या सावकारांची संख्या पाच जिल्ह्यात ४४१ एवढी आहे.

ठळक मुद्देस्पष्ट आदेशाची प्रतीक्षा पाच वर्षांपूर्वीची यादी, सावकाराच्या कार्यक्षेत्राबाहेरील कर्ज

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सोन्या-चांदीचे दागिने परवाना प्राप्त सावकाराकडे तारण ठेऊन शेतकऱ्यांनी खरीप-रबी हंगामात शेतीसाठी कर्ज उचलले. मात्र या कर्जाची माफी देताना आता नेमका कोणता निकष लावला जाईल, याबाबत सहकार प्रशासनात संभ्रमाची स्थिती पाहायला मिळते.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप-सेना युती सरकारने दोन दिवसांपूर्वीच्या कॅबिनेट बैठकीत तब्बल ३७ निर्णय घेतले. त्यात परवाना प्राप्त सावकाराच्या कार्यक्षेत्राबाहेरील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचाही निर्णय घेतला गेला. या निर्णयानंतर सहकार प्रशासनात या कर्जाचा ताळेबंद जुळविण्याची धडपड सुरू झाली. परंतु अद्याप स्पष्ट आदेश जारी न झाल्याने सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांयांमध्येही किती शेतकऱ्यांना नेमक्या किती रकमेची कर्जमाफी मिळणार याबाबत संभ्रमाची स्थिती पाहायला मिळेत आहे.आजच्या घडीला सहकार प्रशासनाकडे ३० नोव्हेंबर २०१४ ला बनलेली यादी उपलब्ध आहे. त्यावेळी शेतकऱ्यांनी सराफ-सुवर्णकार अर्थात परवाना प्राप्त सावकारांकडे (मनीलेंडर्स) तारण ठेवलेल्या दागिन्यांवरील कर्जाचा हिशेब केला गेला होता. अनेक महिनेपर्यंत या सावकारांचे अभिलेखे ताब्यात घेऊन त्याची तपासणी केली गेली होती. सावकारांना सहनिबंधकांनी समक्ष पाचारण करून हिशेबाची खातरजमा केली होती. या संपूर्ण तपासणीनंतर सहकार प्रशासनाने सरकारला अहवाल सादर केला. त्यात सावकाराच्या परवाना क्षेत्राबाहेरील परंतु जिल्ह्यांतर्गत आणि परवाना क्षेत्राबाहेरील पण जिल्ह्याच्या बाहेर अशा दोन प्रकारात यादी बनविली गेली होती. या यादीतील कर्जमाफी गेल्या पाच वर्षांपासून सरकारच्या विचाराधीन होती. अखेर त्याला मुहूर्त भेटला व कॅबिनेटमध्ये निर्णय झाला. आता या निर्णयानुसार शासन आदेश (जीआर) जारी होण्याची सहकार प्रशासनाला प्रतीक्षा आहे.अमरावती विभागाचा आकडा ४४ कोटीएकट्या अमरावती विभागाचा विचार केल्यास ३० नोव्हेंबर २०१४ पर्यंत परवाना क्षेत्राबाहेर परंतु जिल्ह्यात गहाण दागिन्यांवर कर्ज देणाऱ्या सावकारांची संख्या पाच जिल्ह्यात ४४१ एवढी आहे. त्यांनी ३९ हजार २१२ शेतकऱ्यांना कर्ज दिले आहे. या कर्जाची रक्कम ४३ कोटी २७ लाख ५९ हजार एवढी आहे.परवान्याच्या हद्दीबाहेर आणि बाहेरील जिल्ह्यात कर्ज वाटणाऱ्या सावकारांची संख्या ११६, शेतकरी संख्या एक हजार ५३१, तर कर्जाची रक्कम एक कोटी ३८ लाख १८ हजार एवढी आहे.जिल्ह्याबाहेरील व जिल्ह्यातील मिळून परवाना प्राप्त सावकार एकुण ५४१, कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या ४० हजार ७४३, तर कर्जाची रक्कम ४४ कोटी ६५ लाख ७६ हजार एवढी होत आहे.सरसकट माफी मिळाल्यास अमरावती विभागात ४४ कोटी ६५ लाखांची माफी मिळण्याची शक्यता सहकार प्रशासनात व्यक्त केली जात आहे.सावकाराच्या परवाना क्षेत्राबाहेरील कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी त्याबाबत नेमके आदेश जाहीर झालेले नाहीत. नेमके कोणते कर्ज ग्राह्य धरायचे, त्यावर व्याज किती हे स्पष्ट झाल्यानंतरच माफीचा नेमका आकडा सांगणे शक्य होणार आहे.- राजेश दाभेराव, विभागीय सहनिबंधक (सहकारी संस्था), अमरावती

टॅग्स :Farmerशेतकरी