शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

नेर येथे काँग्रेस पक्षात दुफळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 21:58 IST

शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली युती काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यांनी या युतीला विरोधच नव्हे तर चक्क निषेध नोंदविला आहे. नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच घडलेला हा प्रकार कुठल्या टोकाला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांकडून निषेध : नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडीला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली युती काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यांनी या युतीला विरोधच नव्हे तर चक्क निषेध नोंदविला आहे. नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच घडलेला हा प्रकार कुठल्या टोकाला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहे. नामांकन अर्ज दाखल झाले आहे. शहरात राजकीय वातावरण तापत आहे. युती, आघाडी होत आहे. मात्र काही बाबी कार्यकर्त्यांच्या असंतोषालाही कारणीभूत ठरत आहे. नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली युती त्यातीलच एक प्रकार आहे. शहरात काँग्रेसची तेवढी ताकद राहिली नाही. म्हणूनच राष्ट्रवादीची सोबत घेतली, असे खुद्द कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिल्हा पातळीवरील नेत्यांनी पालिकेत युती केली. माजी मंत्री माणिकराव ठाकरे, अशोक बोबडे, वसंत घुईखेडकर यांच्यात बैठक होऊन युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी नऊ जागा आणि नगराध्यक्षपदाची उमेदवारी काँग्रेसला या मुद्यावर ही युती घडली. बसपाचा उमेदवार म्हणून सर्वत्र जाहीर झालेल्या एका व्यक्तीलाही काँग्रेसने उमेदवारी दिली.या सर्व घडामोडी होत असतानाच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष खदखदत होता. त्यांनी चक्क निषेध नोंदविला. विश्वासात न घेता युती करण्यात आली, असा त्यांचा आरोप आहे. शिवाय काँग्रेसमधील अंतर्गत वादही यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. निषेध सभेला काँग्रेसचे पंजाबराव खोडके, सत्यविजय गुल्हाने, अनिल चव्हाण, मोहन खोडके, अन्सार उल्ला खान, सतीश तलवारे, बाबाराव पडोळे, अनिल चव्हाण, पीयूष अजमिरे, साजित खान, कुणाल मिसळे, विनोद पाटमासे, सुरेश बगमारे, राहुल मिसळे, नजीर खाँ राही, जफर खान आदी उपस्थित होते.प्रामाणिकतेवर शंकायुतीमध्ये दोनही पक्षाला प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या. कुठल्या वॉर्डात कुणाला उमेदवारी द्यायची हे अद्याप निश्चित नाही.मात्र दोन्ही पक्ष एकमेकाला सुटलेल्या जागांचा प्रामाणिकपणे प्रचार करतील की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. निवडणुकीपूर्वीच एवढा असंतोष असेल तर पुढील चित्र कसे राहील याचा अंदाज येतो.

टॅग्स :congressकाँग्रेस