शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

नेर येथे काँग्रेस पक्षात दुफळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 21:58 IST

शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली युती काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यांनी या युतीला विरोधच नव्हे तर चक्क निषेध नोंदविला आहे. नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच घडलेला हा प्रकार कुठल्या टोकाला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांकडून निषेध : नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडीला विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससोबत केलेली युती काँग्रेस कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यांनी या युतीला विरोधच नव्हे तर चक्क निषेध नोंदविला आहे. नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच घडलेला हा प्रकार कुठल्या टोकाला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले आहे. नामांकन अर्ज दाखल झाले आहे. शहरात राजकीय वातावरण तापत आहे. युती, आघाडी होत आहे. मात्र काही बाबी कार्यकर्त्यांच्या असंतोषालाही कारणीभूत ठरत आहे. नगरपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली युती त्यातीलच एक प्रकार आहे. शहरात काँग्रेसची तेवढी ताकद राहिली नाही. म्हणूनच राष्ट्रवादीची सोबत घेतली, असे खुद्द कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जिल्हा पातळीवरील नेत्यांनी पालिकेत युती केली. माजी मंत्री माणिकराव ठाकरे, अशोक बोबडे, वसंत घुईखेडकर यांच्यात बैठक होऊन युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी नऊ जागा आणि नगराध्यक्षपदाची उमेदवारी काँग्रेसला या मुद्यावर ही युती घडली. बसपाचा उमेदवार म्हणून सर्वत्र जाहीर झालेल्या एका व्यक्तीलाही काँग्रेसने उमेदवारी दिली.या सर्व घडामोडी होत असतानाच काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये असंतोष खदखदत होता. त्यांनी चक्क निषेध नोंदविला. विश्वासात न घेता युती करण्यात आली, असा त्यांचा आरोप आहे. शिवाय काँग्रेसमधील अंतर्गत वादही यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. निषेध सभेला काँग्रेसचे पंजाबराव खोडके, सत्यविजय गुल्हाने, अनिल चव्हाण, मोहन खोडके, अन्सार उल्ला खान, सतीश तलवारे, बाबाराव पडोळे, अनिल चव्हाण, पीयूष अजमिरे, साजित खान, कुणाल मिसळे, विनोद पाटमासे, सुरेश बगमारे, राहुल मिसळे, नजीर खाँ राही, जफर खान आदी उपस्थित होते.प्रामाणिकतेवर शंकायुतीमध्ये दोनही पक्षाला प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या. कुठल्या वॉर्डात कुणाला उमेदवारी द्यायची हे अद्याप निश्चित नाही.मात्र दोन्ही पक्ष एकमेकाला सुटलेल्या जागांचा प्रामाणिकपणे प्रचार करतील की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. निवडणुकीपूर्वीच एवढा असंतोष असेल तर पुढील चित्र कसे राहील याचा अंदाज येतो.

टॅग्स :congressकाँग्रेस