शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
3
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
4
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
5
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
6
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
7
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
8
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
9
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
10
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
11
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
12
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
13
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
14
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
15
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
16
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
17
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
18
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
19
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
20
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली

तळणी येथे धम्म परिषदेचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 21:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : लगतच्या कुऱ्हा येथे आयोजित तिसऱ्या धम्म परिषदेचा थाटात समारोप झाला.समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, अख्ख्या विश्वाला शांतीचा संदेश देणारा एकमेव बौद्ध धर्म आहे. त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्विकारल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार राजू तोडसाम, पपिता भाकरे, विपिन राठोड, रेखा बोटरे, ...

ठळक मुद्देविविध परिसंवाद : दोन दिवस प्रबोधनपर कार्यक्रम, विविध विषयांवर विचारमंथन

लोकमत न्यूज नेटवर्कतळणी : लगतच्या कुऱ्हा येथे आयोजित तिसऱ्या धम्म परिषदेचा थाटात समारोप झाला.समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले, अख्ख्या विश्वाला शांतीचा संदेश देणारा एकमेव बौद्ध धर्म आहे. त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्विकारल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार राजू तोडसाम, पपिता भाकरे, विपिन राठोड, रेखा बोटरे, प्रमोद राठोड, दादाराव बोटरे, दयाशंकर भाकरे, महेंद्र भरणे, गौतम वाकोडे मंचावर उपस्थित होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ वी जंयती वर्ष व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून कुºहा (तळणी) येथील त्रिरत्न बुद्ध विहार, डॉ.बी.आर. फाउंडेशनतर्फे ही दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली. धम्म ध्वजरोहणानंतर परिषदेला सुरूवात झाली. भंते संघरत्न मानके, भंते खेमोधम्मो महास्थवीर, भंते सुबोध आणि भंते अश्वजित यांनी मार्गदर्शन केले.उदघाटनाला माजीमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी अनिल आडे, अनिल आडे, डॉ.महेंद्र रामटेके, पी.यू. लोखंडे, बी.के. गायकवाड, अविनाश बन्सोड, अनिल कांबळे आदी उपस्थित होते. सतीश रामटेके यांनी ‘अहिंसक अंगुलीमाल’चे सादरीकरण केले. सर्वर जानी, रेखा भारती, आकाश राजा आदींनी बुद्ध-भीम गीतांवर आधारित प्रबोधनपर कव्वाली सादर केली. व्दितीय सत्रातील परिसंवादात सुदर्शन इंगळे, प्रा.विलास भवरे, रमेश बुरबुरे आदींनी सहभाग घेतला. नंतर उपवर-वधू परिचय मेळावा घेण्यात आला. अनिल इंगोले, सतीश पाटील, प्रभाकर भगत, उत्तमराव रहाटे, सागर भरणे, नमुबाई खरतडे यांचा सत्कार करण्यात आला. क्रांती मिलन, राजेंद्र मगर, कैलास दादा व संच हातगांव यानी प्रबोधनात्मक कार्यक्रम सादर केले.संचालन सहदेव चहांदे, आभार एन.एस. कोम्पलवार यांनी मानले. चिंतामण चहांदे, भास्कर भरणे, राजू चहांदे, लिलाधर भरणे, अनुप डांगे, नरेंद्र चहांदे, आकाश चहांदे, सुधीर भरणे, संदीप वाकोडे, निखील लढे, आशिष मेश्राम, रोनित भरणे, अरुण मेश्राम, दुर्वास वाघमारे, नीलेश चहांदे, गोलू वानखडे, गुलशन डांगे, निशांत चहांदे, कुंडलिक देवतळे, सम्यक भरणे, कैलास धोंगडे, अभय खरतडे, वैभव खरतडे आदींनी परिश्रम घेतले.