शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

जिल्हा परिषदेतील संमिश्र सत्ता डळमळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:22 IST

जिल्हा परिषदेतील सत्ता डळमळीत झाली असून काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यवतमाळात केलेल्या वक्त्व्यामुळे सत्तेचे सिंहासन दोलायमान झाले आहे.

ठळक मुद्देस्थानिक काँग्रेस नेत्यांकडे लक्ष : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सूचक इशारा, भाजपाशी संगत ठरणार घातक

रवींद्र चांदेकर।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेतील सत्ता डळमळीत झाली असून काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यवतमाळात केलेल्या वक्त्व्यामुळे सत्तेचे सिंहासन दोलायमान झाले आहे.निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाने आपल्या सदस्यांची मोट बांधून सत्तेचा सोपान सर केला. यात अनपेक्षितपणे काँग्रेसला अध्यक्षपदाची लॉटरी लागली. सोबतच एक सभापतीपदही मिळाले. मात्र ही पदे प्राप्त करून घेताना काँग्रेसने देश आणि राज्य पातळीवर काँग्रेसचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला सत्तेची दारे मोकळी करून दिली. या विचित्र युतीमुळे प्रथमच भाजपाला जिल्हा परिषदेत सत्तेची संधी मिळाली. जिल्हा परिषदेतील भाजपाचा हा चंचूप्रवेश आता काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे. पक्षाची ध्येयधोरणे खुंटीला टांगून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी जिल्हा परिषद ताब्यात घेतली. ही बाब नुकतेच यवतमाळात येऊन गेलेल्या प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी ही स्थानिक पातळीवरील तडजोड असल्याचे सांगून वेळ निभावून नेली.दरम्यान, राज्य पातळीवर आता यवतमाळातील जिल्हा परिषद सत्तेची चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते. राज्य पातळीवरील नेत्यांना यवतमाळातील ही युतीची भूमिका पक्षाला मारक ठरण्याची शक्यता वाटत आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत यवतमाळातील सत्ता डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसताच काँग्रेसच्या नेत्यांनी विचारमंथन सुरू केल्याचे सांगितले जाते. त्यातूनच येथील जिल्हा परिषदेची सत्ता सध्या डळमळीत झाली आहे. नेमके काय होईल, याबाबत कुणीच बोलायला तयार नाही. तथापि पक्षाने आदेश दिल्यास क्षणाचाही विलंब न करता राजीनामे देण्यास काँग्रेसचे पदाधिकारी तयार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सत्तेचे सिंहासन सध्या दोलायमान झाले आहे.विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपांचा परिणामविधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांनी यवतमाळतील भाईगिरीचा उल्लेख केला. या उल्लेखाने जिल्हा परिषदेतील राजकारण ढवळून निघाले. विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपांचा जिल्हा परिषदेतील सत्ताकारणावर परिणाम होत आहे. राज्यस्तरावर आरोप करायचे आणि जिल्हा परिषदेत मात्र सोबत काम करायचे, ही कुठली नितीमत्ता असा प्रश्न खुद्द काँग्रेसचेच काही सदस्य खासगीत उपस्थित करीत आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात जिल्हा परिषदेतील राजकीय चित्र पालटण्याची चिन्हे दिसून येत आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद