शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील संमिश्र सत्ता डळमळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:22 IST

जिल्हा परिषदेतील सत्ता डळमळीत झाली असून काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यवतमाळात केलेल्या वक्त्व्यामुळे सत्तेचे सिंहासन दोलायमान झाले आहे.

ठळक मुद्देस्थानिक काँग्रेस नेत्यांकडे लक्ष : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सूचक इशारा, भाजपाशी संगत ठरणार घातक

रवींद्र चांदेकर।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेतील सत्ता डळमळीत झाली असून काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यवतमाळात केलेल्या वक्त्व्यामुळे सत्तेचे सिंहासन दोलायमान झाले आहे.निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाने आपल्या सदस्यांची मोट बांधून सत्तेचा सोपान सर केला. यात अनपेक्षितपणे काँग्रेसला अध्यक्षपदाची लॉटरी लागली. सोबतच एक सभापतीपदही मिळाले. मात्र ही पदे प्राप्त करून घेताना काँग्रेसने देश आणि राज्य पातळीवर काँग्रेसचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला सत्तेची दारे मोकळी करून दिली. या विचित्र युतीमुळे प्रथमच भाजपाला जिल्हा परिषदेत सत्तेची संधी मिळाली. जिल्हा परिषदेतील भाजपाचा हा चंचूप्रवेश आता काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे. पक्षाची ध्येयधोरणे खुंटीला टांगून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी जिल्हा परिषद ताब्यात घेतली. ही बाब नुकतेच यवतमाळात येऊन गेलेल्या प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी ही स्थानिक पातळीवरील तडजोड असल्याचे सांगून वेळ निभावून नेली.दरम्यान, राज्य पातळीवर आता यवतमाळातील जिल्हा परिषद सत्तेची चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते. राज्य पातळीवरील नेत्यांना यवतमाळातील ही युतीची भूमिका पक्षाला मारक ठरण्याची शक्यता वाटत आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत यवतमाळातील सत्ता डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसताच काँग्रेसच्या नेत्यांनी विचारमंथन सुरू केल्याचे सांगितले जाते. त्यातूनच येथील जिल्हा परिषदेची सत्ता सध्या डळमळीत झाली आहे. नेमके काय होईल, याबाबत कुणीच बोलायला तयार नाही. तथापि पक्षाने आदेश दिल्यास क्षणाचाही विलंब न करता राजीनामे देण्यास काँग्रेसचे पदाधिकारी तयार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सत्तेचे सिंहासन सध्या दोलायमान झाले आहे.विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपांचा परिणामविधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांनी यवतमाळतील भाईगिरीचा उल्लेख केला. या उल्लेखाने जिल्हा परिषदेतील राजकारण ढवळून निघाले. विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपांचा जिल्हा परिषदेतील सत्ताकारणावर परिणाम होत आहे. राज्यस्तरावर आरोप करायचे आणि जिल्हा परिषदेत मात्र सोबत काम करायचे, ही कुठली नितीमत्ता असा प्रश्न खुद्द काँग्रेसचेच काही सदस्य खासगीत उपस्थित करीत आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात जिल्हा परिषदेतील राजकीय चित्र पालटण्याची चिन्हे दिसून येत आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद