शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जिल्हा परिषदेतील संमिश्र सत्ता डळमळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:22 IST

जिल्हा परिषदेतील सत्ता डळमळीत झाली असून काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यवतमाळात केलेल्या वक्त्व्यामुळे सत्तेचे सिंहासन दोलायमान झाले आहे.

ठळक मुद्देस्थानिक काँग्रेस नेत्यांकडे लक्ष : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सूचक इशारा, भाजपाशी संगत ठरणार घातक

रवींद्र चांदेकर।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेतील सत्ता डळमळीत झाली असून काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यवतमाळात केलेल्या वक्त्व्यामुळे सत्तेचे सिंहासन दोलायमान झाले आहे.निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपाने आपल्या सदस्यांची मोट बांधून सत्तेचा सोपान सर केला. यात अनपेक्षितपणे काँग्रेसला अध्यक्षपदाची लॉटरी लागली. सोबतच एक सभापतीपदही मिळाले. मात्र ही पदे प्राप्त करून घेताना काँग्रेसने देश आणि राज्य पातळीवर काँग्रेसचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला सत्तेची दारे मोकळी करून दिली. या विचित्र युतीमुळे प्रथमच भाजपाला जिल्हा परिषदेत सत्तेची संधी मिळाली. जिल्हा परिषदेतील भाजपाचा हा चंचूप्रवेश आता काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे. पक्षाची ध्येयधोरणे खुंटीला टांगून काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी जिल्हा परिषद ताब्यात घेतली. ही बाब नुकतेच यवतमाळात येऊन गेलेल्या प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी ही स्थानिक पातळीवरील तडजोड असल्याचे सांगून वेळ निभावून नेली.दरम्यान, राज्य पातळीवर आता यवतमाळातील जिल्हा परिषद सत्तेची चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते. राज्य पातळीवरील नेत्यांना यवतमाळातील ही युतीची भूमिका पक्षाला मारक ठरण्याची शक्यता वाटत आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत यवतमाळातील सत्ता डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसताच काँग्रेसच्या नेत्यांनी विचारमंथन सुरू केल्याचे सांगितले जाते. त्यातूनच येथील जिल्हा परिषदेची सत्ता सध्या डळमळीत झाली आहे. नेमके काय होईल, याबाबत कुणीच बोलायला तयार नाही. तथापि पक्षाने आदेश दिल्यास क्षणाचाही विलंब न करता राजीनामे देण्यास काँग्रेसचे पदाधिकारी तयार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे सत्तेचे सिंहासन सध्या दोलायमान झाले आहे.विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपांचा परिणामविधानसभेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांनी यवतमाळतील भाईगिरीचा उल्लेख केला. या उल्लेखाने जिल्हा परिषदेतील राजकारण ढवळून निघाले. विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपांचा जिल्हा परिषदेतील सत्ताकारणावर परिणाम होत आहे. राज्यस्तरावर आरोप करायचे आणि जिल्हा परिषदेत मात्र सोबत काम करायचे, ही कुठली नितीमत्ता असा प्रश्न खुद्द काँग्रेसचेच काही सदस्य खासगीत उपस्थित करीत आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात जिल्हा परिषदेतील राजकीय चित्र पालटण्याची चिन्हे दिसून येत आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद